जालना दि. 13 (जिमाका) :- आपत्ती निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात
आज आपत्ती प्रतिसादासाठी कटीबध्द होण्यासंदर्भात अधिकारी
व कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञा घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनिषा दांडगे, सहायक
जिल्हा पुरवठा अधिकारी वैभव महेंद्रकर, नायब तहसिलदार तुषार निकम, नायब तहसिलदार संतोष
अनर्थे आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संयुक्त
राष्ट्र संघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्याच्या
दृष्टीने 13 ऑक्टोबर हा आपत्ती निवारण दिन म्हणून
घोषित केला आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment