जालना, दि. 3 (जिमाका) :- नेहरू युवा केंद्राच्या ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम
जिल्हाभरात स्वयंसेवकांच्या वतीने घेण्यात आला. यावेळी परतूर तालुक्यामध्ये स्वयंसेवक
रुपाली भापकर, जाफ्राबाद येथे अजय पैठणे व शुभम शुक्ल, भोकरदन येथे तैय्यबा शाह,
जालना शेवली येथे पठाण रुक्सर, बदनापुर येथे जितेंद्र खंडाळे व रवि दळे तर मंठा येथे मयुरी थोरवे व
वैभव कांगणे या तालुक्यातील सर्व स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन अमृत कलशमध्ये माती
जमा केली व सेल्फी घेण्यात आली व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार
देशभरात 'अमृत कलश यात्रा सुरु आहे. या
अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, बलिदान दिलेल्या त्या
सर्व ज्ञात, अज्ञात देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची, अभिवादन करण्याची संधी आपल्या
प्रत्येकाला मिळत आहे अशा प्रकारे स्वयंसेवकांनी गावातील लोकांना या उपक्रमाचे
महत्व़ पटवून सांगितले. असे जिल्हा युवा अधिकारी,
नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment