जालना, दि. 31 – सरदार वल्लभभाई
पटेल यांच्या जयंती निमित्ताने स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शहरात
एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मस्तगड येथे सरदार वल्लभभाई पटेल तसेच
स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व एकता दौडला
हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ केला.
याप्रसंगी पशुसंवर्धन व दुग्ध
व्यवसाय राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष
राजेश राऊत, महावीर ढाका,रामेश्वर भांदरगे,
सिद्धीविनायक मुळे, रवी अग्रवाल, चम्पालाल भगत, सुनील दायमा, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, निवासी उपजिल्हाधिकारी
राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, तहसिलदार संतोष बनकर, बीपीन पाटील,
उप विभागीय अधिकारी केशव नेटके, मनोज देशमुख,
जिल्हा शल्य चिकित्सक एम के राठोड आदींनी
वल्लभभाई पटेल तसेच स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
केले व एकता दौडमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी उपस्थितांना
राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
मस्तगड येथुन सुरु झालेली ही रॅली
मंमादेवी, सुभाषचंद्र बोस पुतळा, पाणीवेस, काद्राबादमार्गे शिवाजी पुतळा येथे येऊन
विसर्जित करण्यात आली. या दौडमध्ये जिल्हा परिषद प्रशाला (मुलांची), इंडस बालकामगार
प्रकल्पातील महिला, नर्सिंगचे विद्यार्थी,
शाळेचे विद्यार्थी, डॉक्टर्स, पोलीस दलाचे जवान, एसआरपीएफचे जवान, यांच्यासह रोटरी
क्लब, लायन्स क्लबचे पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी
उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.
No comments:
Post a Comment