Friday 12 October 2018

शासनाचा पुढाकार व लोकसहभागामुळे महाराष्ट्र हागणदारीमुक्त - पालकमंत्री बबनराव लोणीकर




जालना दि.12- राज्य शासनाचा पुढाकार व जनतेच्या सक्रीय सहभागामुळे महाराष्ट्र  हागणदारी मुक्त झाला आहे  सन 2019 अखेर राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येकाला स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर  यांनी आज परतूर येथे आयोजित स्वछता दिंडी कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले .
यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, स्वच्छतेचे महत्व जाणून प्रथमत: महात्मा गांधी यासाठी समाजाला जागृत करण्याचे काम केले. महाराष्ट्रामध्ये देखील संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांनी आपले पूर्ण जीवनभर त्या काळात साधानांची कमतरता असतानाही फार मोठे कार्य केले आहे. यामुळे त्यांच्या नावाने राबविलेलया अभियानामध्ये सर्वजण जात, धर्म, पंथ विसरुन सर्व महाराष्ट्र एक होऊन काम करु लागला यापूर्वी 50 टक्के गाव हागणदारीमुक्त झाले की निर्मलग्राम पुरस्कार दिला जायचा व पुरस्कार मिळाला की स्वच्छतेच काम थांबायचे.यामुळे आता निकष बदलले यातून आदर्श गावे निर्माण व्हावी असा प्रयास केला गेला आहे. त्याचबरोबर शौचालये उभारणीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानातून 4 हजार रुपयांवरुन 12 हजार रुपये अशी वाढ केली. समाजातील गरीब, मागास, दुर्बल घटकांना महिलांना वैयक्तिक शौचालय उभारता यावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन मोठा निधी  मिळविण्यात राज्याला यश मिळाले. यामुळे वंचित असलेल्या 56 लाख कुटुंबांना शौचालये देता येणे शक्य झाले आहे  महाराष्ट्र हे असे काम करणारे प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 2019 पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये सर्व राज्य सरकारे, मंत्री खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधींनी योगदान देण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला मार्च 2018 पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट दिले होते. यासाठी जनजागृती बरोबरच प्रत्येकाच्या सहभाग घेण्यासाठी गावागावात प्रयत्न केल गेले असे त्यांनी सांगितले.ते म्हणाले आरोग्यपूर्ण जिवनासाठी शौचालये उभारणी बरोबरच जिवनशैलीमध्ये सुधार होण्याची गरज आहे. दूषीत पाण्यामुळे रोगराई, आजार व कुपोषण वाढते. नद्या नाले, विहीरी प्रदुषित होतात. देशाला बलशाली बनविण्यासाठी रोगराईमुक्त करण्याचे गरज आहे. शौचालये उभारणीसाठी मग्रारोहयो मधून देखील कामे केली जावीत असे प्रतिपादन श्री लोणीकर केले.  मागील चार वर्षात बांधण्यात आलेल्या शौचालयाची माहिती त्यांनी दिली. यामध्ये सन 2013-17 मध्ये 2 लाख 21 हजार 849, सन 2014-15 मध्ये 4 लाख 88 हजार 402, सन 2015-16 मध्ये 8 लाख 82 हजार 053, सन 2016-17 मध्ये 19 लाख 16 हजार 461 तर सन 2017-18 मध्ये 22 लाख 51 हजार 081 तर सार्वजनिक व सामुहिक शौचालय 2 लाख 81 हजार 292 अशी मिळून वैयक्तिक व सार्वजनिक 60 लाख 41 हजार 138 शौचालय बांधण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले 351 तालुके, 27 हजार 667 ग्रामपंचायती, 40 हजार 500 गावे हागणदारीमुक्त झाली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये सर्व समाजघटकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही श्री.लोणीकर यांनी यावेळी केले. यावेळी नगराध्यसक्ष सौ विमल जेथलियां, राहुल लोणीकर,एसडीएम ब्रिजेश पाटील तहसीलदार राजाभाऊ कदम, रामेश्वर तणपुरे, गटविकास अधिकारी विलास गंगावणे, माधवराव कदम, सुदाम प्रधान, रमेश भापकर, सिद्धेश्वर सोळंके, प्रदीप ढवळे, दिगंबर मुजमुले, रामप्रसाद थोरात, शहाजी राक्षे  शिवाजी पाइकराव, रंगनाथ येवले, तुकाराम सोळंके नामदेवराव काळदाते, बाबाराव थोरात, भागवानराव मोरे, संदीप बाहेकर, सुधाकर सातोनकर,प्रकाश चव्हाण, जगन बागल, कृष्णा अरगडे,अंकुशराव तेलगड, राजेंद्र मुंदडा, ओम मोर, नारायण सुरुंग, संपत टाकले, विष्णु बरकुले,विठ्ठल बिडवे, आदीं उपस्थित होते
-*-*-*-*-*-*-*-*




No comments:

Post a Comment