जालना दि.23 (जिमाका) :- शासनाकडून व प्रत्येक नियंत्रक अधिका-यांकडून विविध लेखाशीर्षा अंतर्गत प्राप्त झालेली
अनुदाने व सुधारीत मागणीनुसार दि. 31 मार्च 2022 अखेर प्राप्त व्हावे व ती व्यपगत
होऊ नयेत, तसेच शासकीय रक्कमांचा जास्तीत जास्त भरणा करणे सुलभ व्हावे या दृष्टीने
महाराष्ट्र कोषागार नियम 1968 चे नियम क्रमांक 409 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी
डॉ. विजय राठोड, यांनी जालना जिल्ह्यातील शासकीय आदान प्रदानाचा व्यवहार करणारी
स्टेट बँक ऑफ इंडिया शिवाजी चौक, जालना ही दि. 31 मार्च 2022 रोजी 12.00
वाजेपर्यंत व तालुका स्तरावरील शासनाचे
कामकाज सुरु ठेवतील.
जिल्ह्यातील सर्व आहरण संवितरण अधिकारी तसेच वरील बँकाचे सर्व व्यवस्थापक स्टेट
बँक ऑफ इंडिया शिवाजी चौक, जालना तालुका स्तरावरील कोषागाराचे आर्थिक व्यवहार पाहणा-या
अंबड, परतूर, भोकरदन,
मंठा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखा तसेच जाफ्राबाद, बदनापुर व घनसावंगी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा यांनी वरील आदेशाचे पालन
करण्याचे आणि प्राप्त अनुदान व्यपगत होणार
नाही शासकीय वसुलीचा जास्तीत जास्त भरणा शासनखाती होईल कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment