Wednesday 30 November 2022

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

 


 

            जालना दि. 30 (जिमाका) :-   भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2022-23 वर्षात प्रवेशित असलेले सर्व अनुसूचित जाती ,विजा, भज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीवर तात्काळ अर्ज नोंदणी करावेत, आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र अनुसूचित जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणी करीता जालना जिल्ह्यातील महाविद्यालयांचे दि. 24 नोव्हेंबर 2022 पासून तालुकानिहाय कॅम्प घेण्यात येत आहेत. दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी जे. ई.एस. महाविद्यालय जालना येथे जालना तालुक्यामधील महाविद्यालयांची बैठक सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे. सन 2022 -23 मधील प्रवेशित विद्यार्थ्यांची तात्काळ अर्ज नोंदणी, शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांकडुन शिक्षण शुल्क वसुल न करणे तसेच समान संधी केंद्र स्थापन करण्याबाबत समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी महाविद्यालयांचे प्राचार्य यांना सुचना दिल्या.

           दि. 25 नोव्हेंबर 2022 रोजी अंबड तालुका, दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी घनसावंगी तालुका आणि दि. 29 नोव्हेंबर 2022 रोजी बदनापूर तालुकामधील इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, बदनापूर महाविद्यालयांत कार्यशाळा घेऊन शिष्यवृत्ती विभाग प्रमुख एस. जी. कांबळे, तालुका समन्वयक  मिलिंद गाडे यांनी सुचना दिल्या. तसेच उपायुक्त, जिल्हा जात पडताळणी समिती यांनी महाविद्यालयांना कळविल्यानुसार इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखामधील प्रवेशित अनुसूचित जाती,इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याबाबत समतादुत मांडलिक यांनी सर्व महाविद्यालयांना आवाहन केले. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment