जालना, दि. 29 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत दि. 26 नोव्हेंबर 2022,
संविधान दिन ते दि. 6 डिसेंबर 2022, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण
दिन या कालावधीत "समता पर्व" साजरे करण्यात येणार आहे. या निमित्ताने
पत्रकारांसाठी बुधवार, दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वा. डॉ. बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे “सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा” या विषयावर आयोजित कार्यशाळेत मान्यवरांच्या
व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ
पत्रकार अंकुशराव देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून सचिव, (जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण, जालना) राजेश अहिर तर प्रमुख वक्ते म्हणून जे. ई. एस. महाविद्यालयाचे
सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. बी. वाय. कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत.
पत्रकारांनी या कार्यशाळेस अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज
कल्याण अमित घवले यांनी केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment