Wednesday 23 November 2022

ग्रंथोत्सवात वाचकप्रेमींसाठी विविध कार्यक्रमांची मेजवाणी - दि. 25 व 26 नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सव - परिसंवाद, अनुभवकथन, जागर कवितेचा, प्रगट मुलाखत, कवि संमेलनाचे आयोजन

 


 

जालना, दि. 23 (जिमाका) :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. 25 व 26 नोव्हेंबर 2022 रोजी जालन्यातील टॉऊन हॉल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे  दोन दिवसीय  ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवात ग्रंथ दिंडी, परिसंवाद, अनुभवकथन, जागर कवितेचा, प्रगट मुलाखत, कवि संमेलन, आदी कार्यक्रम होणार आहेत. सोबतच कार्यक्रमस्थळी सदर दोन्ही दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 6  या कालावधीत ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.  सदर दोन्ही दिवस वाचकप्रेमींसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवाणी राहणार आहे.  

दोन दिवसीय ग्रंथोत्सव कार्यक्रमाची संपूर्ण रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे. ग्रंथोत्सवाचे उदघाटन शुक्रवार, दि. 25 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली तर सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होईल. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व खासदार संजय जाधव, आमदार सतिश चव्हाण, आमदार ‍विक्रम काळे, आमदार राजेश राठोड, आमदार‍ राजेश टोपे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर  यांची प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमात  प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक लहुजी कानडे मार्गदर्शन करणार आहेत. तर  सूत्रसंचालन प्रा. प्रदीप देशमुख हे करतील.

तत्पुर्वी सकाळी 9.30 वा. ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही ग्रंथदिंडी विनीत साहनी, संगीताताई गोरंट्याल, मंगला धुपे, सुनिल हुसे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी चमन येथील   महात्मा गांधीच्या पुतळयापासून काढण्यात येणार आहे.  

दि. 25 नोव्हेंबर  रोजी दुपारी 1 ते 2 या कालावधीत  ‘स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशासमोरील आव्हाने’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे   अध्यक्ष म्हणून देविदास फुलारी तर  वक्ते म्हणून प्रा. बी. वाय. कुलकर्णी, मधुकर जोशी, डॉ. मधूकर गरड, प्रा.शशिकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.  तर सूत्रसंचालन प्रा.रंगनाथ खेडेकर करणार आहेत.

 दुपारी 2.30 ते 3.30 या कालावधीत ‘ग्रंथाने मला काय दिले’ हे या विषयावरील अनुभवकथन होणार आहेत. सुनिल हुसे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात   डॉ. राजशेखर बालेकर, अण्णासाहेब खंदारे, संतोष धारे, डी.बी.देशपांडे यांचा सहभाग राहणार आहे.  तर सूत्रसंचालन शाम शेलगांवकर करणार आहेत.

दुपारी 3.30 ते 5 या कालावधीत ‘जागर कवितेचा’  हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची  संकल्पना सतीश लिंगडे यांची असून दिनेश सन्यांसी, सुमित शर्मा, अंजली काजळकर,  प्रतिभा दहिवाळ शहाणे, रेखा चव्हाण, ओंकार बिनीवाले हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. निवेदक म्हणून  प्रा.रविंद्र मगर हे उपस्थित राहणार आहेत.

शनिवार, दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते 12 या कालावधीत चित्रकार श्रीधर अंभोरे यांची प्रगट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. प्रा. डॉ. सतीश बडवे व रविंद्र सातपुते हे त्यांची मुलाखत घेणार आहेत.  सूत्रसंचालन विनोद जैतमहाल करणार आहेत. तर  दुपारी 12 ते 1.30 या कालावधीत भारतीय संविधान  व आपण : काल, आज आणि उद्या या विषयावर विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात  राजेश राऊत, प्रा.डॉ. रावसाहेब ढवळे, एस.एन.कुलकर्णी, अरुण प्रधान हे सहभागी होणार आहेत.  सूत्रसंचालन राजीव हजारे करणार आहेत.

दुपारी 2 ते 4 या कालावधीत बश्वराज कोरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. निवेदक म्हणून राज रणधीर व सुहास पोतदार हे असणार आहेत.  या कविसंमेलनात शिवाजी कायन्दे, राम गायकवाड, सत्यशिला तौर, प्रणिता लवटे, श्रीकांत गायकवाड, लक्ष्मीकांत दाभाडकर, बाबू श्रीरामे, रेखा बैजल, ज्योती धर्माधिकारी, रमाकांत कुलकर्णी, कैलास भाले, सदाशिव कमळकर, डॉ.एकनाथ शिंदे, कविता नरवडे, सत्यभूषण अवस्थी, भिमराव सपकाळ, राजाराम जाधव, सुहास सदावर्ते, प्रभाकर शेळके, गणेश खरात, रेखा गतखने, जिजा वाघ, कैलास कोळेकर, मनोहर गाढवे, श्रीमंत ढवळे आणि कृष्णा कदम यांचा सहभाग राहणार आहे.

ग्रंथोत्सव समारोप कार्यक्रम दुपारी 4 वाजता अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या अध्यक्षतेखाली तर निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले,  उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील सर्व वाचनप्रेमींसह नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील यांनी केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment