जालना,
दि. 14 – महिला व बालविकास विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात
आलेल्या चाचा नेहरु बालमहोत्सवाचे उदघाटन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा
जिल्ह्याचे पालकमंत्री बबबनराव लोणीकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी महाराष्ट्र बालहक्क आयोगाचे अध्यक्ष
प्रवीण घुगे, जिल्हा महिला व बालविकास असधिकारी श्रीमती एस.डी. लोंढे, बालकल्याण समितीचे
अध्यक्ष संजय काळबांडे, बालकल्याण समिती सदस्या अनया अग्रवाल, श्री गुंजाळ, श्री चौरे,
बालन्यायमंडळाचे सदस्य रोजकोमल ओहोळ, श्रीमती ज्योती देशमुख आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, अनाथ
बालकांच्या शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी शासनाने घेतली असुन शिक्षणपासुन एकही बालक
वंचित राहू नये यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल आहोत. जिल्ह्यात अनाथ बालकांचे पालन पोषण करण्यासाठी कार्यरत
असलेल्या बालगृहांच्या समस्या प्राधान्याने
सोडविण्याबरोबरच समाजातील शेतकरी व कामगारांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळुन चांगल्या
हुद्यावर जावे अशी अपेक्षाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केली.
बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी
ससा व कासवाच्या शर्यतीची गोष्ट सांगुन जीवनात यशस्वी होण्यासाठी बुद्धीचातुर्य किती
महत्वाचे असते हे पटवुन देत स्वत:ला कधीही कमी न लेखता यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत
रहावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बालकल्याण समितीचे अध्यक्ष संजय काळबांडे
म्हणाले की, अनाथ व निराधार बालकांना समाजाच्या
प्रवाहात आणणे आवश्यक असुन बालमहोत्सवासारखे कार्यक्रम बालकांमधील गुणांना वाव मिळवुन
देतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्रीमती
लोंढे यांनी बालमहोत्सव आयोजनामागची भूमिका सविस्तरपणे विषद केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तालुका संरक्षण
अधिकारी अमोल फदाट यांनी केले तर आभार बी.जे. मुंढे यांनी मानले.
कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास विभागातील
सहाय्यक लेखाधिकारी श्री निर्मळ, श्री
गणगरे, तालुका संरक्षण अधिकारी एस.एस.गोरे, एन.ए. काकडे, अशोक भुसारी, श्रीमती मिनाक्षी
शिंदे, आवेश खान, आर.एस. सुर्यवंशी, एम.झेङ फारुकी, बी.व्ही. बिराजदार, गजानन राठोड,
नितीन धुमाळ, भगवान गिते यांच्यासह मुलांची
मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******
No comments:
Post a Comment