जालना, दि. 1
– जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, जिल्हा आजारी उद्योग पुनर्वसन
समिती तसेच जिल्हास्तरीय स्थानिक लोकांना रोजगारा प्रधान्य समितीची बैठक जिल्हाधिकारी
शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक
निलेश निकम, व्यवस्थापक किरण जाधव, विद्युत महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री भालशंकर,
एमएसएसआयडीचे श्री शिरोळे, गोपाल मानधने, पंकज लड्डा, अनिल तलरेजा, पूर्णा ॲग्रोटेक,
जाफा्रबादचे विष्णू पवार, सम्यक मसाले क्लस्टरचे श्री दाभाडे, लेदर क्लस्टर, मंठाचे
श्री वाघमारे यांच्यासह सबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री जोंधळे
म्हणाले की, एम.आय.डी.सी. क्षेत्रातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. तसेच एमआयडीसी परिसरातील अंतर्गत स्ट्रीट लाईटसही
नादुरुस्त असल्याच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. एमआयडीसी परिसरातील रस्ते तातडीने
दुरुस्त करण्याबरोबरच स्ट्रीट लाईटही सुरळीत सुरु राहतील यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने
या संदर्भात् काम करण्याच्यासुचनाही श्री जोंधळे यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात
मोठ्या प्रमाणात मोसंबीचे उत्पादन होते. या
मोसंबीवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना करत हा
उद्योग करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित
अधिकाऱ्यांना केल्या.
*******
No comments:
Post a Comment