जालना –चर्मकार व दलित समाजाच्या उद्धारासाठी काम करीत असलेल्या
व्यक्ती व संस्थांनी सन 2016-17 च्या संत रविदास पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे
आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी केले आहे.
या पुरस्कारासाठी अर्ज करणारी व्यक्ती चर्मकार व दलित समाज, सामाजिलक
दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक असावेत. सामाजिक कल्याण क्षेत्रात कमीत कमी 15 वर्षे काम
केलेले असावे. पुरुषांसाठी वयोमर्यादा 50 किंवा
त्यापेक्षा जास्त तर स्त्रींयासाठी 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र
ह्या गोष्टींचा विचार केला जाणार नाही. पुरस्कार
मिळण्यास आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे सभासद किंवा कोणतेही पदाधिकारी पात्र असणार
नाहीत. या पुरस्कारासाठी अर्ज करणारी संस्था समाजकल्याण क्षेत्रात चर्मकार व दलित समाजाच्या
उन्नतीसाठी, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागरण आदी क्षेत्रात
काम करणाऱ्या संस्था पुरस्कारासाठी पात्र असतील. स्वयंसेवी संस्था, पब्लीक ट्रस्ट ॲक्ट
1950 व सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार पंजीबद्ध असावी. समाजकल्याण क्षेत्रातील सेवा
व कार्य 10 वर्षाहून अधिक झालेली असावी. विशेष
मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थासाठी ही अट अपवाद म्हणून शिथील करण्यात येईल. सामाजिक संस्था ही राजकारणापासून अलिप्त असावी.
या पुरस्कारासाठीचे
प्रस्ताव तीन प्रतीमध्ये 25 जुलै, 2016 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय,
जालना येथे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले
आहे.
*******
No comments:
Post a Comment