Wednesday 6 July 2016

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दानवे कुटुंबियांचे सांत्वन

जालना, दि. 6-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि. 6 जुलै रोजी भोकरदन तालुक्यातील जवखेडा (बु.) येथे दानवे कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देऊन खासदार रावसाहेब  दानवे पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. 
            खासदार रावसाहेब दानवे यांच्या मातोश्री केशरबाई दादाराव पाटील दानवे यांचे वृद्धापकाळाने 5 जुलै रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर जवखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दानवे कुटुंबियांच्या दुखा:त सहभागी होत कुटुंबातील आमदार संतोष दानवे पाटील, निर्मलाताई दानवे, अप्पासाहेब दानवे पाटील, सुलाबाई तडेकर, आशाबाई मुकेश पांडे, उषा महेश आकात, रंजना हर्षवर्धन जाधव यांच्यासह परिवारातील सर्वच सदस्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन
केशरबाई दादाराव दानवे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.   
            याप्रसंगी  विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री  राजकुमार बडोले, गृह राज्यमंत्री राम शिंदे, आमदार सर्वश्री अब्दुल सत्तार, चैनसुख संचेती, नारायण कुचे,अतुल सावे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर  यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार उपस्थित होते.

*******

No comments:

Post a Comment