Tuesday 30 August 2016

महाअवयव दान अभियानानिमित्त आयोजित भव्य रॅलीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ विद्यार्थ्यांसह नागरिकांनी नोंदविला उत्स्फुर्त सहभाग

जालना -  महा अवयवदाना संदर्भात जनमानसामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 2016 या कालावधीत जिल्ह्यात महाअवयवदान अभियान राबविण्यात येत असून  त्याअनुषंगाने दि. 30 ऑगस्ट, 2016 रोजी जालना शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  गांधीचमन येथे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
            यावेळी रामेश्वर भांदरगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्री राठोड, बालकामगार प्रकल्पचे मनोज देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी  आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            गांधीचमन येथून रॅलीची सुरुवात होऊन मस्तगड, सुभाष चौक, काद्राबाद, मंगळ बाजार मार्गे निघून शिवाजी पुतळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.  या रॅलीमध्ये जेईएस, दानकुंवर,                   डॉ बारवाले या महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, बालकामगार प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी, बदनापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासह नागरिकांनी या रॅलीमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत अवयव दान, श्रेष्ठ दान अशा आशयाचे फलक हाती घेऊन नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी जनजागृती केली. 
            या रॅलीमध्ये डॉ. व्ही.व्ही. इंगे, डॉ. म्हस्के, डॉ. बी.के. नागरे, डॉ. एस.जी. पंडित, डॉ. ए.एस. खरात, डॉ. जगन्नाथ खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते श्री केळवदे, डॉ. राजेंद्र गाडेकर, डॉ. शिगेदार, प्रकाश मेटकर, डॉ. सुनिता गोलाईत, डॉ. एस.व्ही. कुलकर्णी, डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. नितेश अग्रवाल यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

******* 






No comments:

Post a Comment