जालना - राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमिन
आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत
कै. सुमनताई बहुउदेशीय सेवाभावी संस्था, सातोना बु. ता.परतूर जि.जालना या संस्थेची
जय किसान फिरती माती पाणी परिक्षण प्रयोगशाळा या फिरत्या मृद चाचणी प्रयोगशाळेचे उदघाटन
जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, मोतीबाग, जालना येथे फित कापून करण्यात आले.
यावेळी औरंगाबादचे विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी पी.डी. लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा
माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष आळसे, कृषी उपसंचालक
बी.बी.धालगडे, मृदचाचणी अधिकारी एस.जी. टिक्कस, औरंगाबादचे कृषी अधिकारी बी.व्ही. कुलकर्णी
आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी
फिरत्या मृद चाचणी प्रयोगशाळेची संपूर्ण पहाणी करुन पाणी परिक्षण कशा प्रकारे करण्यात
येते याची तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. या फिरत्या प्रयोगशाळेसह कृषी विभागाकडे उपलब्ध
असलेल्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शेतजमीनीच्या माती परिक्षणाचे
उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्याच्या सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना देत शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनीची आरोग्य पत्रिका मिळाल्यामुळे
पीक लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचेही श्री जोंधळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
दशरथ तांभाळे यांनी जिल्ह्यात एक शासकीय मृद चाचणी प्रयोगशाळा व कृषि विज्ञान केंद्राकडे
मृद चाचणी प्रयोगशाळा उपलब्ध असून मृद आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत जिरायत क्षेत्रातून
10 हेक्टर क्षेत्रालय एक व बागायत क्षेत्रातून 2.5 हेक्टर क्षेत्राला एक अशा प्रकारे
मृत नमुने तपासणीकरिता काढण्यात आलेले असून त्याद्वारे त्या गटातील शेतकऱ्यांना जमीन
आरोग्य पत्रिका वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
***-***
No comments:
Post a Comment