Saturday 6 August 2016

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्यालयामार्फत वृक्षांचे संगोपन

जालना – 1 जुलै रोजी राज्यात 2 कोटी वृक्ष लागवड मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली.  जालना जिल्ह्याला देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. राष्ट्रीय बालकामगार प्रक्लप, जालना यांच्यावतीने या मोहिमेंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय ते अंबड चौफुली रोडच्या दोनही बाजुस वृक्ष लागवड करण्यात आली होती.  या लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्यात येत असून या झाडांची देखरेख, झाडाच्या बाजुला असलेले गवत काढणे, झाडांना वेळेवर पाणी देण्याबरोबरच जी झाडे व्यवस्थित लावली गेलेली नाहीत अशी झाडे व्यवस्थित लावण्यात येत असून या कामासाठी प्रकल्प संचालक मनोज देशमुख, विशेष प्रशिक्षण केंद्रातील शिक्षण निर्देशक क्षेत्रिय अधिकारी मदत करत असल्याचे प्रकल्प संचालकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

******* 

No comments:

Post a Comment