Tuesday 2 August 2016

सर्वसामान्यांच्या अडी-अडचणी समजुन घेऊन तत्परनेते सोडवाव्यात – जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

जालना – महसुल विभाग हा प्रशसनाचा कणा आहे.  नागरीसेवेचा दर्जा महसुल विभागासच प्राप्त झालेला असून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या तत्परतेने सोडविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महसुल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  व्यासपीठावर सेवानिवृत्त अपरआयुक्त श्री लवांदे, ॲड राम शेलकर, उप विभागीय अधिकारी सर्वश्री चिंचकर, श्रीमंत हारकर, अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, लेखाधिकारी श्री देशपांडे आदींची उपस्थिती होती.
            यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत सर्व कामे करण्याचा मान महसुल विभागास प्राप्त झाला आहे.  सर्वसामान्य तसेच गोरगरीब जनतेची कामे अधिकाऱ्यांनी समजून घेऊन ती तत्परनेते सोडवावीत.  शासकीय नोकरीमध्ये पगार घेऊन सर्वसामान्यांची सेवा करण्याची संधी आपणास प्राप्त झालेली आहे.  या संधीचे प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने व पारदर्शकपणे काम करुन सर्वांना समान न्याय, त्यांचा असलेला हक्क मिळवून देऊन जनतेचा दुवा घ्यावा. 
            जालना जिल्हयाने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमामध्ये भरीव काम केले असून  येणाऱ्या काळातसुद्धा सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संघटीतपणे काम करावे. जेणेकरुन जालना जिल्हा    कोणत्याही विकासाच्या बाबतीत मागे राहणार नाही, असा विश्वासही श्री जोंधळे यांनी व्यक्त केला.
            यावेळी सेवानिवृत्त अपर आयुक्त श्री लवांदे म्हणाले की, सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला त्यांचे हक्क व समान न्याय मिळवून देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्पर असले पाहिजे.  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायद्याचं परिपूर्ण असं ज्ञान संपादन करुन त्यांच्या कामात सचोटी, पारदर्शकता व जबाबदारीने व विनाआक्षेप काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            यावेळी ॲड राम शेलकर यांनी जमीन कायदा याबाबत तर लेखाधिकारी श्री देशपांडे यांनी आहरण व संवितरण अधिकारीयांची जबाबदारी व कर्तव्ये या विषयावर उपस्थितांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. तहसिलदार महेश सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती योगिताखटावकर यांनी केले तर आभार उप विभागीय अधिकारी अरविंद लोखंडे यांनी मानले.
            या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये उप विभागीय अधिकारी सर्वश्री अरविंद लोखंडे, श्रीमंत हारकर, तहसिलदार एल.डी. सोनवणे, महेश सावंत, लघुलेखक एस.बी. सुर्यवंशी, नायब तहसिलदार पी.यु. कुलकर्णी, संदीप ढाकणे, ए.डी. पुरी, अव्वल कारकून बी.एस.गीर, मंडळ अधिकारी आर.ई. घुले, सुनिल कारमपुरीकर, तलाठी सय्यद युनुस, लिपीक श्रीमती ज्योती वाघ, शिपाई श्री खंडागळे, समाधान गायकवाड आदींचा समावेश होता.
            कार्यक्रमास महसुल विभागातील अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

******* 

No comments:

Post a Comment