जालना, दि. 31 - सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या जयंती
निमित्ताने शहरात एकता दौडचे
आयोजन करण्यात आले होते. शहरातील
मस्तगड येथे सरदार वल्लभभाई
पटेल यांच्या प्रतिमेस जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन केले व एकता
दौडला हिरवी झेंडी दाखवुन
शुभारंभ केला.
याप्रसंगी नगराध्यक्षा श्रीमती
संगीता गोरंट्याल, सिद्धीविनायक मुळे, डॉ. सचदेव, तहसिलदार
श्रीकांत भुजबळ, उपअधिक्षक श्री. देशपांडे, उपशिक्षणधिकारी श्री. मापारी, जिल्हा शल्य चिकित्सक
एम. के. राठोड, जिल्हा क्रिडा अधिकारी श्रीमती प्रबोधिनी अमृतवाड, केशव कानफुडे, श्री.
भोरे, श्रीमती संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी आदींनी वल्लभभाई
पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करुन अभिवादन केले
व एकता दौडमध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी उपस्थितांना राष्ट्रीय
एकात्मतेची शपथ दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय कायंदे यांनी
केले. मस्तगड येथुन सुरु
झालेली ही रॅली मंमादेवी, सुभाषचंद्र
बोस पुतळा, पाणीवेस, काद्राबादमार्गे शिवाजी
पुतळा येथे येऊन विसर्जित
करण्यात आली. या दौडमध्ये
नुतन प्रशालेच्या विद्यार्थिनी, फन रन ग्रुपचे सदस्य, एन.सी.सी. चे विद्यार्थी,
डॉक्टर्स, पोलीस दलाचे जवान, यांच्यासह सर्व
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह
शहरातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग
नोंदवला.
No comments:
Post a Comment