जालना, दि. 14 -
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्यूरो, पुणे, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य व स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महा मतदार जनजागृती अभियानाचे उद्घाटन
जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या हस्ते रिबन कापून व व्हॅनला झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात
करण्यात आले. यावेळी फिल्ड आउटरिच
ब्यूरो, औरंगाबादचे सहा. निदेशक, निखिल देशमुख, प्रबंधक, संतोष देशमुख आदी उपस्थित
होते.
या अभियानामध्ये फिरते प्रदर्शन वाहन व सांस्कृतिक
(लोककला) कार्यक्रमाद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. दिनांक 14 व 18 ऑक्टोबर पर्यंत जालना, परतूर, भोकरदन व बदनापुर मतदारसंघातील 15 ते 20 ठिकाणांना रोज हे फिरते प्रदर्शन वाहन भेट
देईल. नागरिकांना मतदानाचे महत्व
पटवून देण्याकरिता या महा
मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment