जालना,दि.26: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
योजनेचा राष्ट्रीय पातळीवर शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर
प्रदेशातील गोरखपूर येथे नुकताच संपन्न झाला असुन जिल्हास्तरावरही जिल्हाधिकारी रवींद्र
बिनवडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 7 हजार 429 शेतकरी
कुटूंबाच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे एकुण एक कोटी 48 लाख 58
हजार रुपये जमा करण्यात आले असल्याची
माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली असुन या
योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकरी कुटुंबास प्रतीवर्ष 6 हजार रुपये तीन
टप्प्यांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय
क्षेत्रीय यंत्रणेमार्फत पात्र कुटूंबांच्या अंतिम करुन संकेत स्थळावर अपलोड
करण्यात येत आहेत. आज दि. 26 फेब्रुवारी,
2019 रोजीच्या स्थितीनुसार जालना जिल्ह्यातील एक लाख 67 हजार 533 पात्र शेतकरी
कुटुंबांची माहिती PM-KISAN पोर्टलवर आपलोड करण्यात आले असुन जिल्ह्यातील इतर
पात्र शेतकरी कुटंबांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे काम गतीने करण्यात येत
आहे.
जालना जिल्ह्यांतर्गत आर्थिक सहाय्य वितरणासाठी
प्रमाणित केलेल्या पहिल्या बॅचमध्ये एकुण 7 हजार 429 लाभार्थ्यांचा समावेश करण्यात
आला असुन ऑनलाईन पडताळणी आधारे बॅचनिहाय ऑनलाईन पद्धतीने अर्थसहाय्य पात्र
लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी,
जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*******
No comments:
Post a Comment