Monday 4 February 2019

कृत्रिम रेतनाची लॅब औरंगाबादेत सुरु करणार -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · प्रायोगिक तत्वावर गायींचा विमा उतरविणार · मुख्यमंत्री पशुधन योजना राज्यात लागू होणार



      जालना, दि. 4 – शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन हा उत्तम मार्ग आहे. पशुपालनात विविध जातींचे संवर्धन होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कृत्रिम लिंग निर्धारित  रेतन लॅब महत्वाची आहे. म्हणून ही लॅब मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज येथे केली. त्याचबरोबर प्रायोगिक तत्वावर गायींचा विमा उतरविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
            येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील विस्तीर्ण अशा पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा अखिल भारतीय पशुस्तरावरील महा पशुप्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समांरभात            श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले.  यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन व मस्त्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन व मस्त्यव्यवसाय,  वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सर्वश्री आमदार नारायण कुचे, प्रशांत बंब, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, प्रधान सचिव अनूपकुमार, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप, भास्कर आंबेकर, रामेश्वर भांदरगे, संतोष सांबरे, संजय खोतकर, अभिमन्यू खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले,  देशातले सर्वात भव्य असे हे महाएक्स्पो प्रदर्शन आहे. देशात पशुपक्ष्यांच्या प्रजातीला एकत्र करण्याचे काम या प्रदर्शनाच्या माध्यमातन झाले आहे. पशुसंवर्धन, चारा याबरोबरच पशुपक्ष्याच्या संवर्धनाचे प्रशिक्षण येथे अनुभवयास मिळाले. एवढचे नव्हे तर प्रदर्शन शेतकरी आणि पशुपालकांसाठी आदर्श अशी कार्यशाळा ठरली आहे.  पाच लाख शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. ही या प्रदर्शनाची उपयुक्तता आहे.  शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडव्यवसाय निवडणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतीला पशुपालनाची जोड दिली तेथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत. शासनामार्फत पशुपालकांसाठी 243 कोटी रुपयांची जनावरे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. याचा फायदा बहुसंख्य लाभार्थ्यांना झालेला आहे. पशुखाद्याबरोबरच पशुपालकांना कृत्रिम लिंग निर्धारित  रेतन लॅब महत्वाची ठरणार आहे, असेही ते म्हणाले. 
            राज्यात मराठवाडा आणि विदर्भ विभाग दुध उत्पादनात आघाडीवर होते. परंतु या भागातील शेतकरी कापूस, सोयबीन पिकांकडे वळल्यामुळे चारा उत्पादनात घट झाली. पर्यायाने या भागात दुधाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी चारा उत्पादनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.  शासनामार्फत दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी लिटर मागे पाच रुपये प्रमाणे 500 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे.  त्यापैकी 250 कोटी रुपयांचे अनुदान दुध उत्पादकांना वाटप करण्यात  आले आहे. पशुपालकांसाठी जेनेरिक औषधी आणि रुग्णवाहिका महत्वाची आहे. त्यामुळे पशुवसंवर्धन विभागाने पशुंसाठी असलेली जेनेरीक औषधी पशुपालकांना उपलब्ध व्हावी. तसेच पशुंसाठी आवश्यक रुग्णवाहिका याबाबतही तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्री. फडणवीस यांनी दिल्या.
            पशुसंवर्धन विभागाला नावलौकिक मिळवून देण्याचा मान पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनाच जातो. या विभागात  नोकरभरती होणे आवश्यक असल्याने ही भरती संपूर्णरित्या पुर्ण करण्याचे आदेशही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.
            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारतर्फे सुरु केलेल्या योजनांचीही अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे राबविण्यात राज्य आघाडीवर आहे. या केंद्राच्या योजनांमधून राज्यात नीलक्रांती झाली आहे.  त्याचबरोबर राज्याच्या महामेष योजनेतून मेंढीपालन मोठ्याप्रमाणात वाढलेले आहे. पशुपालकांसाठी वृक्ष संवर्धन, पशुपक्षी संवर्धन महत्वाचे असून  यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी यावेळी केले. राज्यमंत्री श्री खोतकर यांनी गायींच्या संवर्धनासाठी त्यांचा विमा उतरविण्यात यावा याबाबत प्रास्ताविकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी ही योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी दिली.
            पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री पशुधन योजना राबविणार असल्याची घोषणा  यावेळी केली.
            राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी या महाएक्स्पोचा लाभ घेतला आहे. कोट्यवधी रुपयांचे पशुधन या प्रदर्शनात दाखल झाले आहे. ही जालन्यासह राज्यातील शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाने संधी निर्माण करुन दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कायम शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने भरीव निधीची तरतूद केलेली आहे.
            प्रास्ताविकात राज्यमंत्री श्री.खोतकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या या एक्स्पो उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी दिला आहे. या प्रदर्शनात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व पशुपक्षी यात दाखल झालेले आहेत. दोन दिवसात पाच लाख शेतकरी बांधवांनी या ठिकाणी भेट दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रदर्शनात दाखल झालेल्या पशुपालकांना बक्षीसांचे वितरणही करण्यात आले. सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी दुग्धव्यवसायिकांच्या यशकथा या पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले. महाएक्स्पोच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांचा मुख्यमंत्री             श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, पशुपालक, शेतकरी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पशुपालकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण
पशुपालकांचे नाव
गटांचा प्रकार
बक्षीसांचा प्रकार
रक्कम
श्री. माणिक निवृत्ती जाधव रा. हासेगाव ता. औसा जि. लातूर
देवणी  गटात वळु
प्रथम
1,00,000/-
श्री. विनायक गुरुनाथ चव्हाण रा. विळेगाव ता. देवणी जि. लातूर
देवणी  नर गट 
प्रथम
1,00,000/-
श्री. महादेव नारायण आकमार रा. शिरडशहापूर ता. औंढा जि. हिंगोली
देवणी  गाय गट 
प्रथम
1,00,000/-
श्री.बालाजी यादवराव तिडके रा. कुणकी ता. जळकोट जि. लातूर
देवणी  गट
कालवड
प्रथम
1,00,000/-
श्री.दत्तात्रय रामभाऊ आर्दड रा. टाकळी ता. घनसावंगी जि. जालना
गीरगायगट
प्रथम
1,00,000/-
श्री.  दत्ताराम तुकाराम दुमनल रा. जोगलगाव ता. पालम जि. परभणी
संकरित एचएफ गट
प्रथम
1,00,000/-
श्री.बळीराम गोविंद शिंदे  ता. पंढरपूर जि. सोलापूर
खिल्लारगट गाय
प्रथम
1,00,000/-
श्री. सुनिल बाळासाहेब पवार रा. विखेडे ता. मोहोळ           जि. सोलापूर
खिल्लार कालवड गट
प्रथम
1,00,000/-
श्री. सत्यजीत एकनाथ जाधव रा. इस्मालपूर ता. वाळवा जि. सांगली
खिल्लारगट
कालवड
प्रथम
1,00,000/-
श्री. नामदेव कोंडीबा पवार रा. कडलस ता सांगोला जि. सोलापूर
खिल्लारगट वळु
प्रथम
1,00,000/-
श्री. रणजीत हनुमंत जाधव रा. सिध्देवाडी ता. पंढरपुर जि. सोलापूर
खिल्लारअदात वळू
प्रथम
1,00,000/-

 \











No comments:

Post a Comment