Tuesday 18 December 2018

अल्पसंख्याक समाजाला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रस्ताव सादर करा – जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन



            जालना, दि. 18 – अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत.  शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात असुन या ठिकाणी अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.  अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते. 
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, शहा आलमखान, एकबाल पाशा, लियाकत अलीखान, अब्दुल रज्जाक बागवान, बाबा रत्नाकर कसबे,  लेवी निर्मल, पी डी लोंढे, शेख अफसर शेखजी, भास्कर शिंदे, श्रीमती कुरेशी हुरबी अब्दुल मजीद, रुकसाना अहेमद कुरेशी नेर, ऐजाज तसरीन, फरद्यन फयाजोद्दिन अन्सारी, शेख रियाज शे. गणी, शेख इमाम, रज्जाक बागवान, शब्बीर पटेल, लियाकत अली खान, एकबाल कुरेशी, तय्यब बापु देशमुख, सय्यद जावेद तांबोली,  शाह आनम खॉन मियाखॉन, शेख अफसर शेखजी, शेख इमाम शेख, श्रीमती शेख नियामवबी अयुब, श्रीमती आशा बेगम शेख चॉद, पठाण फेरोजखान हस्तेखान, शेख युनुस लालमियॉ, फय्याज भाई, नसरुलाल खान शफखीलाखान, श्रीमती रुकसाना अहेमद कुरेशी, श्रीमती अबेदा बी शेख महेबुब, शेख फेरोज शेख अजीज, फरान फय्याज अन्सारी, श्रीमती कुरुशी एजाज नसरीन, एस ओ बनगे, सु दि.उचले, एच आर वाघले, श्रीमती आर व्ही टाक  आदींची उपस्थिती होती. 
जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले की, अल्पसंख्याक समाजाचे बरेच प्रश्न आहेत.  अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी तसेच अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडे निधीची कमतरता नाही परंतू ठराविकच बाबींसाठी प्रस्ताव सादर करण्यात येतात.  नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र व ग्रामीण भागात असलेल्या अल्पसंख्याक समाजासाठी रस्ते, वीज, शादीखाना, स्मशानभूमी यासारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले.  
अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या योजनांची माहिती समाजातील प्रत्येकाला व्हावी यासाठी योजनांचे शासन निर्णय प्रत्येकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. तसेच समाजातील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीमध्ये संधी मिळावी यासाठी भरतीपूर्व परीक्षेमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात यावे.  अल्पसंख्याक समाजाचे असलेले प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचेही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अल्पसंख्याक समाजाच्या विकासाबाबत अनेकविध उपयुक्त अशा सुचनांबरोबरच त्यांच्या असलेल्या अडी-अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर विषद केल्या. 
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात नायब तहसिलदार श्रीमती मयुरा पेरे यांनी अल्पसंख्याकासाठी असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व अपंग शाळांमध्ये पायाभुत सुविधा, डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण येाजना,अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात पायाभूत व मुलभूत सुविधा, 12 व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत विकास कार्यक्रम, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कामांची विस्तृतपणे माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन नायब तहसिलदार योगिता खटावरकर यांनी केले. 
कार्यक्रमास अल्पसंख्याक सामाजातील नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. -*-*-*-*




No comments:

Post a Comment