Wednesday 19 October 2022

जायकवाडी धरणातुन गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 


 

    जालना दि. 19 (जिमाका) :- कार्यकारी अभियंता जायकवाडी प्रकल्प पैठण, यांच्या संदेशानुसार आज दि. 19 ऑक्टोबर रोजी प्रकल्पाचा जीवंत पाणीसाठा 100 टक्के आहे व  पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस  होत असुन पाणलोट क्षेत्रातील नदी नाल्याद्वारे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे एकुण 18 द्वारे 3.0 फुट उंचीवर उघडून एकुण 56 हजार 592 क्युसेक विसर्ग गोदावरी नदीमध्ये सुरु राहील. पाण्याची आवक पाहुन विसर्ग वाढविणे, कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध रहावे. उपविभागीय अधिकारी (अंबड,परतुर) व तहसिलदार (अंबड, घनसावंगी, परतुर) यांनी नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांना सतर्क राहण्याबाबत तसेच चल मालमत्ता चिजवस्तु,वाहने, जनावरे,पाळीव प्राणी व शेती अवजारे इत्यादी साधन सामग्री सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत दवंडीद्वारे सुचित करावे व पुरापासुन सावध राहण्यासाठी आपल्या स्तरावरुन ईशारा देण्यात यावा,  असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment