Wednesday 19 October 2022

खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 


 

    जालना दि. 19 (जिमाका) :-  खडकपुर्णा प्रकल्प  पुर नियंत्रण कक्ष, ता. देऊळगावराजा यांच्या संदेशानुसार आज दि. 19 ऑक्टोबर रोजी प्रकल्पाचा जीवंत पाणीसाठा 100 टक्के आहे व  पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस  होत असुन पाणलोट क्षेत्रातील नदी नाल्याद्वारे खडकपुर्णा प्रकल्पात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे एकुण 13 द्वारे 0.30 मीटरने उघडून एकुण 15 हजार 147.99 क्युसेक विसर्ग नदीमध्ये सुरु राहील. पाण्याची आवक पाहुन विसर्ग वाढविणे, कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध रहावे. उपविभागीय अधिकारी (परतुर) व तहसिलदार (मंठा) यांनी नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांना सतर्क राहण्याबाबत तसेच चल मालमत्ता चिजवस्तु,वाहने, जनावरे,पाळीव प्राणी व शेती अवजारे इत्यादी साधन सामग्री सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत दवंडीद्वारे सुचित करावे व पुरापासुन सावध राहण्यासाठी आपल्या स्तरावरुन ईशारा देण्यात यावा,  असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment