जालना,
दि. 18 (जिमाका):- नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन
देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्ट-अप व नाविन्यता यात्रा दुसरा टप्पा जिल्हास्तरीय सादरीकरण
सत्रात निवड झालेल्या प्रथम अक्षय विजय चव्हाण, कृषी क्षेत्र-सेल्फ ड्राईव्ह ट्रेलर, द्वितीय सारंग वाकोडीकर, ई प्रशासन क्षेत्र-QR कोड बेस्ड अटेंडन्स
मॅनेजमेंट सिस्टीम आणि तृतीय पवन राजु दळवी, कृषी
क्षेत्र -वील स्प्रे पंप या पहिल्या
तीन नवउद्योजकांना मत्सोदरी शिक्षण
संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, नागेवाडी औरंगाबाद रोड, जालना येथे दि. 19 ऑक्टोंबर, 2022 रोजी आयोजित रोजगार
मेळाव्यामध्ये पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र स्टार्ट-अप
व नाविन्यता यात्रा दुसरा टप्पा जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचे दि.13 ऑक्टोंबर,
2022 रोजी जे. ई. एस. महाविद्यालय, जालना
येथे आयोजन करण्यात आले होते. सादरीकरण सत्रास नोंदणी केलेल्या 59 पैकी 43 नागरिकांनी
स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय असलेल्या कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा इ.), ई प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा व गतिशीलता आणि इतर
क्षेत्रातील या 07 क्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे जिल्हास्तरीय तज्ञ
समितीसमोर सादरीकरण केले होते.
जिल्हास्तरीय विजेत्यांची
घोषणा व
पारितोषिक समारोह
जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रास
नियुक्त तज्ञ परीक्षण समितीच्या परीक्षणाअंती कौशल्य, रोजगार,
उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीव्दारे प्रथम श्री.अक्षय
विजय चव्हाण, कृषी
क्षेत्र-सेल्फ ड्राईव्ह ट्रेलर, द्वितीय श्री.सारंग वाकोडीकर,
ई प्रशासन क्षेत्र -QR कोड बेस्ड अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीम आणि तृतीय श्री.पवन राजु दळवी,
कृषी क्षेत्र -वील
स्प्रे पंप
या क्षेत्रातील जिल्हास्तरावर
पहिल्या तीन उत्कृष्ट व्यवसाय नवसंकल्पनांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रात या विजेत्या तीन नवउद्योजकांना मत्सोदरी शिक्षण संस्थेचे
कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, नागेवाडी औरंगाबाद रोड, जालना येथे दि. 19 ऑक्टोंबर,
2022 रोजी सकाळी ९ वाजता पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय विजेत्यांची
घोषणा व
पारितोषिक समारोह -
प्रत्येक जिल्हयातील सादरीकरण सत्रातील सर्वोत्तम 3
संकल्पनांमधून
राज्यस्तरीय निवड तज्ञ समितीसमोर अंतिम विजेत्यांची निवड झालेली असून, श्री. सारंग
वाकोडीकर यांच्या ई प्रशासन या क्षेत्रातील QR कोड बेस्ड अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीम व्यवसाय
नवसंकल्पनेची राज्यस्तरावर प्रथम विजेते म्हणून निवड झाली असून, मा.
राज्यपाल यांचे हस्ते दि. 16 ऑक्टोबर, 2022 रोजी राजभवन,
मुंबई येथे
पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला आहे. तसेच, सदर विजेत्यांना
पेटेंट सहाय्य, इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल,निधी साठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या
संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, तसेच सॉफ्टवेअर क्रेडीटस, क्लाऊड क्रेडीटस इत्यादी सारखे इतर लाभही पुरविण्यात येणार आहेत.
अशी सहायक आयुक्त माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment