Saturday 13 July 2019

वॉटरग्रीड योजनेच्या कामांची पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पहाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते *योजनेचे लकरच लोकार्पण १७६ गावांच्या वॉटरग्रीड योजनेची उर्वरित कामे गतीने पुर्ण करा पालकमंत्री बबनराव लोणीकर



जालना, दि. 13  – जालना परतुर व मंठा तालुक्यातील 176 गावांसाठी ग्रीड पद्धतीने तयार करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामांची राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दि. 13 जुलै रोजी रोहिना बु. येथील जलशुद्धीकरण केंद्र व मापेगाव येथील उद्भव कामांना प्रत्यक्ष भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पहाणी केली. या योजनेचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार  असुन योजनेचे उर्वरित काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, भुजंगराव गोरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव श्री. वेलारासू, मुख्य अभियंता श्री जगतारे, अधीक्षक अभियंता अजय सिंग, गणेशराव खवणे, बी.डी. पवार, अनिल खंदारे, रमेश भापकर, रामेश्वर तनपुरे, दिगांबर मुजमुले, सुदाम प्रधान, रंगनाथ येवले, हनुमंत उफाड, अशोक डोके, अशोक वायाळ, कार्यकारी अभियंता श्री रबडे, श्री डाकोरे, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, तहसिलदार भाऊसाहेब कदम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, परतूर,मंठा व जालना तालुक्यातील १७६ गावांसाठी  राज्यातील पहिल्या असलेल्या वॉटरग्रीड योजनेचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे. या योजनेची स्थापत्य कामे ८० टक्के व यांत्रिकी सह विद्युत कामे ७५ टक्के पूर्ण झाली आहेत.  या योजनेला अखंडित वीज पुरवठा व्हावा तसेच वीजेअभावी पाणी पुरवठ्यामध्ये खंड पडू नये यासाठी मापेगाव येथील एक्सप्रेस फिडर हे परतूर येथील 220 केव्ही उपकेंद्रावरून 8 दिवसात जोडून सुरू करण्याबरोबरच तीनही ठिकाणचे सोलर ऊर्जा प्रकल्प 1 महिन्याच्या आत पुर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. 
  या वॉटरग्रीड योजनेत समाविष्ट असलेल्या १७६ गावांपैकी १२४ गावांना पूर्वी टँकर द्वारे, विहीर अधिग्रहण द्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता . त्यामुळे या गावांचा पिण्याचे पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविण्या करीता १७६ गावांची ग्रीड पाणी पुरवठा योजना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत विशेष मंजूर करून घेण्यात आली होती . या योजनेची मूळ किंमत 234 कोटी 41 लक्ष इतकी असून या योजनेची  स्थापत्य कामे आर. ए .घुले, पालघर यांच्यामार्फत करण्यात येत आहे.  त्यानंतर मंजूर झालेल्या ९२ गावांच्या ग्रीड पाणी पुरवठा योजनेत बऱ्याच गावांची पाईप लाईन व १७६ ग्रीड योजनेची पाईपलाईन एकमेकांना समांतर येत असल्यामुळे पाईप लाईन ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोन्हीही योजना सुधारित करण्यात आल्या. सुधारित योजनेमध्ये ९२ गावांच्या ग्रीड योजनेतील ५८ गावांचा समावेश १७६ ग्रीड योजनेत करण्यात आला व १७६ ग्रीड योजनेतील ६१ गावांचा समावेश ९२ गावांच्या ग्रीड योजनेत करण्यात आला असल्यामुळे आता  या योजनेत १७३ गावांचा समावेश आहे.  या  योजनेचा स्रोत निम्न दुधना प्रकल्प असून या योजनेत परतूर तालुक्यातील ८१, मंठा तालुक्यातील ५१ व जालना तालुक्यातील ४१ गावांचा समावेश आहे.योजनेचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात करण्यात आला असून या योजनेची धारित मंजुरी  किंमत रु. २४३ कोटी ३४ लक्ष इतकी असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. 
   जालना, परतूर व मंठा तालुक्यातील गावांसाठीची ही योजनेचे काम लवकरच पुर्ण होणार असुन या योजनेच्या पुर्णत्वानंतर ही गावे टंचाईमुक्त होऊन गावांना मुबलक प्रमाणात  शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे शक्य होणार असून या गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. 
  या योजनेच्या कामाच्या  प्रगती बाबत माहिती देताना अधीक्षक अभियंता अजय सिंग म्हणाले की, या योजनेच्या उदभवाची कामे प्रगतीपथावर असून त्यातील जुन्या मापेगाव बु. येथे निम्न दूधनाच्या जलाशयात उध्दभव विहीर व पंपगृह (१२ मी व्यास,जमिनीखाली १२ मी) असून २१ मी उंचीचे काम पूर्ण होऊन प्रगती ९० टक्के आहे.  आर.सी.सी जोडपूल लांबी २७० मी चे काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे. अशुद्ध पाण्याची ऊर्ध्ववाहिनी (७०० मिमी व्यास, लांबी १५२०० मी ) चे काम ८८ टक्के पूर्ण झाले असून १५०५० मी. पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र(क्षमता -३२ दलली) रोहिना  बु. जवळ परतूर आयटीआय च्या मागे प्रस्तावित असून त्याचे कामे ८५ टक्के झाले असून येथेच ३३. ८० लक्ष ली क्षमतेचा संप बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. वाटूर फाटा येथे २४.९० लक्ष ली क्षमतेचा संप चे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. या योजनेअंतर्गत शुद्ध पाण्याची ५०० ते १५० मिमी  व्यासाची  डी. आय. पाईप लाईन एकूण लांबी ९४ किमी पैकी ९० किमी पाईप प्राप्त असून ८५ किमी  पाईप लाईन टाकण्यात आली आहे. या योजने अंतर्गत  तांत्रिकदृष्ट्या १२  झोन प्रस्तावित असून एका झोन मध्ये १२ ते १८ गावांचा समावेश आहे. या एका झोनकरीता एक मुख्य संतुलन टाकी प्रस्तावित करण्यात आली  असुन  १२  ची कामे सुरु  असून ९४ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मुख्य संतुलन टाक्यांपासून गावातील पाण्याच्या उंच टाकीपर्यंत पाणी नेण्यासाठी ५०० ते १०० मिमी व्यास डी आय व एचडीपी आय पाईपलाईन  एकूण लांबी ५७७ किमी पैकी ५७२ किमी पाईप प्राप्त झाले असून ४५२ किमी पाईप लाईन टाकण्यात आली असून ८३ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.  ६७ गावांमध्ये नवीन जलकुंभ प्रस्तावित केले असून ६० जलकुंभाचे कामे प्रगतीपथावर असून ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तसेच जलशुद्धीकरण केंद्राजवळ कार्यालय इमारत, विश्रामगृह, गोडाऊन आदी कामे प्रगतीपथावर असून ४२ टक्के काम पुर्ण झाले आहे. या योजनेत ३७ गावांमध्ये ५७ किमी  वितरण व्यवस्था टाकण्यात येणार ६० टक्के कामे पूर्ण असून  या शिवाय ९६ गावांमध्ये नवीन वितरण व्यवस्था टाकण्याची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहे.   अशा प्रकारे स्थापत्य कामे आता पर्यंत प्रगती ८० टक्के असून  आतापर्यंत या कामांवर १४८ कोटी रुपये खर्च झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
  या पाहणी दौऱ्यादरम्यान पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
-*-*-*-







No comments:

Post a Comment