Sunday 14 July 2019

मंठा तालुक्यात पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ जिल्ह्यातील एकही गाव, वाडी व वस्ती पक्या व मजबुत रस्त्यांवाचून वंचित राहणार नाही - पालकमंत्री बबनराव लोणीकर



            जालना, दि. 14 - गावाचा, जिल्ह्याचा, राज्याच्या व देशाच्या विकासामध्ये रस्त्यांची फार मोठी भूमिका असुन दळणवळण अधिक सुलभ व जलदगतीने होण्यासाठी रस्तेविकास हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.   शासनाने रस्ते विकासावर भर दिला आहे.  गेल्या चार वर्षात मतदार संघातील 200 गावात डांबरी व पक्या रस्त्यांची कामे करण्यात आली असून येणाऱ्या काळात जिल्ह्यातील एकही गाव, वाडी व वस्ती पक्या व मजबुत रस्त्यांवाचून वंचित राहणार नसल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हृयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
            मंठा तालुक्यातील कर्नावळ येथे 25 लक्ष रुपये किंमतीच्या मुख्य रस्ता ते कर्नावळ रस्ता डांबरीकरण, गावअंतर्गत सिमेंट रस्ते व आर.ओ वॉटर फिल्टर कामाचा शुभारंभ पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर  भुजंगराव गोरे, गणेशराव खवणे, पंजाबराव बोराडे, राजेश म्हस्के, कल्याणराव खरात, संभाजी खंदारे, शिवदास हनवते, संदीप गोरे, अविनाश राठोड, सतीष निर्वळ, विठ्ठलराव काळेख्‍ उद्धवराव गोंडगे, कैलासराव बोराडे, माऊली वायाळ, शेख एजाज, भगवानराव राठोड, कैलास चव्हाण, तुकाराम राठोड, किसन खेत्रे, नामदेव राठोड, शंकर जाधव संजय राठोड आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले, जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात येत आहे.  ग्रामीण भागातही पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे.   जिल्ह्यातील प्रत्येक गावात विकास कामे करण्यात येत असुन कर्नावळसारख्या गावाला विकास कामांसाठी एक कोटीपेक्षा अधिक रुपयांचा निधी देण्यात आला आहे.  पूर्वीच्या काळात विकास कामांसाठी अत्यंत तोकडा निधी गावांना मिळत होता.  परंतू विद्यमान शासनाने प्रत्येक गावच्या विकास कामाला प्राधान्‍ दिले आहे.  आपण मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यापासुन जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासावर भर दिला असल्याचे सांगत वीज, पाणी, रस्ते यासारख्या मुलभूत गरजांसाठी जिल्ह्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचुन आणला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, दळणवळणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासासाठी मंत्रीपदाची धुरा सांभाळताच आपण जिल्ह्यातील संपुर्ण रस्त्यांची माहिती घेऊन पुढील पाच वर्षात करावयाच्या रस्त्यांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. गेल्या चार वर्षाच्या काळात 200 गावांमध्ये पक्के व डांबरी रस्ते तयार करण्यात आली आहेत. गावांना रस्ते व्हावेत, शेतकऱ्यांना त्यांचा माल वेळेवर बाजारामध्ये नेण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला जलदगतीने वाहतुक करता यावी यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्ते तयार करण्यात येत आहेत. या रस्त्यांचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. येणाऱ्या पाच वर्षात हा रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारीही या कंत्राटदारांवर निश्चित करण्यात आली असुन येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वाडी,वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या, दर्जेदार व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरांसह ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटरच्या रस्त्याचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे.  येणाऱ्या दोन ते तीन महिन्यांच्या आत हा मार्ग पुर्ण करण्यात येणार असुन हा मार्ग पुर्ण झाल्यास परिसराचा विकास होण्याबरोबरच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातुन जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            उपकेंद्रावर तसेच ट्रान्सफॉर्मरवर विजेचा अतिरिक्त ताण पडल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना पुरेसा विजेचा पुरवठा करण्यात अडचणी येत होत्या. या प्रश्नावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी वीज वितरणामध्ये अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर शासनाने भर दिला असून जिल्ह्यातील जनतेला व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला सुरळीतपणे वीजेचा पुरवठा होण्यासाठी जिल्ह्यासाठी नवीन 33 केव्हीचे 49 उपकेंद्रे मंजूर करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            तेलंगणा, आंध्रप्रदेश, श्रीलंका व गुजरात राज्य तसेच इस्त्राईल देशाच्या धर्तीवर जालना, परतूर व मंठा या तालुक्यातील 176 गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांची योजना साकारली जात आहे. या येाजनेचे 90 टक्के काम पुर्ण झाले असुन येत्या महिन्याभराच्या आत या योजनेच्या माध्यमातुन जनतेलाशुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच मंठा तालुक्यातील  95 नवीन गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला असुन यासाठी 130 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पालाही गती देण्यात येत असुन औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ग्रीडचे काम अंदाजपत्रकीयदृष्ट्या एकुण 4 हजार 200 कोटीचे आहे.  त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात 2 हजार 700 कोटी रुपये व जालना जिल्ह्यात 1 हजार 500 कोटी रुपये खर्चाचे काम होणार आहे.  मेकोरेट कंपनीकडून जुलै महिन्यात बीड व परभणी जिल्ह्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा सादर होणार असुन त्यानंतर त्या जिल्ह्यांसाठीदेखील निविदा काढण्यात येतील. ऑगस्टमध्ये नांदेड व हिंगोली व सप्टेंबरमध्ये लातुर व उस्मानाबाद जिल्ह्याचे अहवाल सादर होतील.  त्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्हयातील ग्रीडच्या कामाच्या निविदा काढण्यात येणार असुन या ग्रीडच्या माध्यमातुन पिण्याला, शेतीला व उद्योगाला पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असुन या माध्यमातुन मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            मराठवाड्यात सध्या पाऊस नसल्याचे चिंतेचे वातावरण आहे.  येत्या महिनाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचे सांगत यासाठी 30 कोटी रुपयांचा निधीही मंजुर करण्यात आला असल्याची माहितीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते हेलसवाडी येथे 30 लक्ष रुपये किंमतीच्या मुख्य रस्ता डांबरीकरण, 7 लक्ष रुपये किंमतीच्या मुस्लीम कब्रस्तान अंतर्गत काम तसेच 5 लक्ष रुपये किंमतीच्या आर.ओ. वॉटर फिल्टरचा शुभारंभ, रानमळा येथे 30 लक्ष रुपये किंमतीच्या मुख्य रस्ता ते रानमळा रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ व आर.ओ. वॉटर फिल्टरचा शुभारंभ करण्यात आला.  तसेच खारी आर्डा येथे 5 लक्ष रुपये किंमतीच्या जनसुविधेंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामाचा शुभारंभ, गंगाभारतीनगर येथे केदारवाकडी विडोळी रस्ता ते गंगाभारती नगर या 20 लक्षरुपये किंमतीच्या कामाचा शुभारंभ, केदारवाकडी येथे 40 लक्ष रुपये किंमतीच्या डीपीसीअंतर्गत रस्ता डांबरीकरण व 5 लक्षरुपये किंमतीच्या अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ व आर.ओ. वॉटर फिल्टरचे उदघाटन व पाटोदा येथे 2515 अंतर्गत 30 लक्ष रुपये किंमतीच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपुजन व 10 लक्ष रुपये किंमतीच्या गावांतर्गत दोन सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
हेलसवाडी येथील कार्यक्रमास उपस्थिती  भुजंगराव गोरे, गणेशराव खवणे,संदीप गोरे, पंजाबराव बोराडे, संभाजी खंडारे, कल्याणराव खरात, राजेश म्हस्के, शिवदास हानवते,नागेशराव घारे, कैलास बोराडे, सतीशराव निर्वळ,विठ्ठलराव काळे, उद्धवराव गोंडगे, माऊली वायाळ,शेख एजाज भाई, संमदर पठाण, गंगाराम हवळे, लालमिया पटेल,चॉदमिया शेख, असाराम खाडे, अजिस बागवान, करीम पटेल
रानमळा येथील कार्यक्रमास उपस्थिती  दयाराम पवार, अविनाश राठोड, शंतनू काकडे, गणेश चव्हाळ, पवन केंधळे, सोपानराव खरात, बंडूनाना खरात, बाळासाहेब तौर, सय्यद सलाम, नितीन चाटे, राजेभाऊ खराबे, दिलीप हिवाळे, शेषनारायण दवणे, भागवत डोंगरे, नायब गोडंगे, नारायण बागल, शरद मोरे, रामेश्वर खरात, सर्जेराव बोराडे, माऊली गोडंगे, समंदर पठाण, एजाज भाई
खारी आरडा येथील कार्यक्रमास उपस्थिती  संरपच संतोष बोराडे, राजेभाऊ ढेंगळे, साळुजी भदर्गे,अंकुशराव कळणे, उपसंरपच डिंगबरराव ढेंगळे, वचिष्ठ कळणे, नारायण कळणे, दगडूबा खरात, परमेश्वर बोराडे, चंद्रकांत बोराडे
पाटोदा बु येथील कार्यकमास उपस्थिती पंजाबराव बोराडे, अंकुश आबा बोराडे, त्रंबक बापु बोराडे, उद्धवभाऊ बोराडे, प्रभाकर बोराडे तसेच केदारवाडी येथील श्रीमती हनसाबाई राठोड कार्यक्रमास उपस्थिती होते
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह महिला व  ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
-*-*-*-*






No comments:

Post a Comment