Wednesday 18 October 2017

शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी व वीजेचा पुरवठा करुन उत्पादन वाढीवर भर देणार -पालकमंत्री बबनराव लोणीकर



शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी व वीजेचा पुरवठा करुन उत्पादन वाढीवर भर देणार
n  पालकमंत्री बबनराव लोणीकर
कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन शुभारंभ
जालना, दि. 18 :- जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी व शाश्वत वीज देऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीवर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधतांना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार विलासबापू खरात, भास्कर दानवे, सिद्धीविनायक मुळे, देविदास देशमुख, सुभाष राठोड, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी  पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, राज्यावर 3 लाख 86 हजार कोटी रुपयांचे कर्ज असतानासुद्धा राज्य शासनाने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे.  विविध योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीवर भर देण्यात येत असुन जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे करण्यात आली आहेत.  यांत्रिकी विभागाकडे असलेल्या मशिनरी जालना जिल्ह्यात आणुन समानतेने जलयुक्तची कामे करण्यात आली आहेत.  राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन 11 हजार नद्यांचे खोलीकरण करण्यात आले असुन शेतीव्यवसायामध्ये यापूर्वी गुंतवणुक होत नव्हती.  परंतू राज्य शासनाने ही गुंतवणुक 26 हजार कोटी रुपयांपर्यंत केली असुन शेतीला जोडंधदे म्हणुन कुक्कुटपालन, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय या  माध्यमातुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीवर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील जनतेसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला योग्य दाबाने वीजेचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्ह्यात विजेचे जाळे निर्माण करण्यात येत असुन जिल्ह्यात 33 के.व्ही. चे 49 केंद्रे मंजुर असुन त्यापैकी 19 उपकेंद्राच्या निविदा होऊन कामे सुरु होत आहेत तर 220 के.व्ही. जालना व परतूर येथे पुर्ण क्षमेतेने केंद्र कार्यरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दलित समाजाच्या विकासासाठी असलेल्या निधीचा वापर या कर्जमाफीसाठी करण्यात येणार असल्याच्या अफवा समाजामध्ये पसरवल्या जात असुन दलित समाजाच्या विकासासाठी असलेल्या निधीतून एकही पैसा यासाठी वापरला जाणार नसल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या लक्ष्मण परिहार, भगवान जाधव, श्रीमती कावेराबाई फकीरबा परिहार, श्रीमती रुखमीनी प्रल्हाद सोसे, विजयमाला सोसे, लिलावती दादाराव मोरे, महानंदा उत्तमराव घुगरगे, शांताबाई किसन बहेर, पठाण लालाभाई रहिम, रंजित लक्ष्मण शेलुटे, दत्तू पेढणे, सोनानी जनाजी हिवाळे, मिराबाई बालासिंग चाँदा, आसराबाई शेषराव जाधव, सुभद्राबाई गेणू खरात, कौसल्याबाई भाऊसाहेब ढगे, विश्वनाथ कोचट, इंदीराबाई उमाजी गवारे, सुमनबाई आसाराम बोनगे, तुळशिराम साने, सुखदेव दाभाडे, लिलाबाई भगवान ठोंबरे, पार्वताबाई खंडू सहाने, जाफरबेग अहमदबेग मिर्झा, लताबाई अशोक गाढे या   शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक एन.व्ही.आघाव यांनी केले.  कार्यक्रमास व्ही.पी.रोडगे, डॉ. ए.बी. काशिकर, संजय देवरे, बी.टी. भोजने, पी.एच. बेरा, श्रीमती प्रेरणा शिवदास, श्रीमती ए.एम शहा, शरद तनपुरे, प्रशांत गावंडे, महेश जयरंगे, प्रदीप मघाडे, पी.आर.मोताळे, एस.जी.जडे, सुहास साळवे, गोपी चन्नू, कृष्णा कानडे, श्री. बावस्कर  यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***-***




No comments:

Post a Comment