जालना दि.18 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य नसल्यामुळे महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाव्दारे दि.27 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे जनसुनावणी घेण्यात येणार आहे. सदर जनसुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, श्रीमती रूपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत.
जालना जिल्हयातील कोणतीही तक्रारदार पिडीत महिला कोणतीही पुर्वसुचना न देता या जनसुनावणीचा लाभ घेवुन स्थानिक पातळीवर थेट जनसुनावणीस उपस्थित राहुन लेखी तक्रार,समस्या आयोगापुढे मांडु शकते. या जनसुनावणीस जालना जिल्हयातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहुन आपल्या समस्या मांडाण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment