Sunday 14 May 2017

गाळातील सत्वामुळे उत्पादकतेत भरमसाठ वाढ होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



जालना,दि,13:-  गाळमुक्त धरण- गाळमुक्त शिवार उपक्रमामुळे गाळातील सत्वाचा फायदा पिकाला होऊन उत्पादकतेत भरमसाठ वाढ होणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
             जाफ्राबाद तालुक्यातील शिंदी या गावच्या परिसरातील लघुसिंचन तलावाच्या गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार उपक्रमाच्या शुभारंभा प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्यचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर ,खासदार रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, नारायणराव कुचे,जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे सदस्य भाऊसाहेब लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            गाळ वाहून नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च शासन करणार आहे, आता फक्त या कार्यक्रमाला  लोकांचा आधार लागणार आहे. यामुळे यावर्षी तलाव- प्रकल्पांत दुप्पट पावसाचे पाणी साठणार आहे असा आशावाद व्यक्त करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदी गावाला पुढच्या वर्षी साठलेले पाणी पाहण्यासाठी पुन्हा येईल  अशी ग्वाही दिली. तलाव प्रकल्पातील गाळ शेतक-यानां मोफत नेता येईल. सर्व व्यवस्था राज्य शासन करणार असल्याने याकामी आता लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम नमूद केले.
            राज्यात 20 ते 22 हजार गावे दुष्काळाचा सामना करतात, त्यासाठी मागील दोन वर्षापूर्वी जलयुक्त शिवार आभियान शाश्वत शेतीसाठी सुरु केले. यामध्ये पावसाचा प्रत्येक थेंब माझ्या मालकीचा आहे असे समजून तो जागेवरच आडविला पाहिजे अशी भूमिका शेतक-यांनी बाळगावी असेही आवाहन शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            प्रारभी खासदार रावसाहेब दानवे यांनी शिंदी या शेवटच्या टोकावर असलेल्या गावांत देखील गाळयुक्त धरण-गाळमुक्त शिवार योजनेचा शुभारंभ करुन शेतक-यांना दिलासा  दिल्याचे सांगितले. गावक-यातर्फे मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळ वाहून नेणा-या ट्रॅक्टर्सना हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ्‍ केला.
            आगमन होताच जलसंपदा विभागाचे अधिकारी यशवंत गच्चे, कविराज कुच्चे यांनी स्वागत केले. या तलावातून 12 हजार क्यूबीक मीटर गाळ काढल्याचे नियोजन आहे.
*******  

       

No comments:

Post a Comment