जालना, दि.
8 (जिमाका) :-
टंचाईशी निगडीत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई
नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक
02482-223132 आणि 1077 असा आहे.
जालना
जिल्हयात सन 2023-24 व 2024-25 अंतर्गत दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे
जिल्हयातील जनतेकडून टंचाईशी निगडीत जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन,
शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के
सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत
कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी
टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात
शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी विषय प्रकरणी
दूरध्वनीव्दारे किंवा प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या तक्रारी / निवेदने यांचे निरसन
टंचाई नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कक्षात अधिकारी व
कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ
यांनी कळविले आहे.
***
No comments:
Post a Comment