जालना, दि. 2 (जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत
लाभार्थ्यांचे आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न बँक खात्यामध्ये अनुदान वितरीत होण्यासाठी
लवकरच प्रारंभ होणार आहे. याशिवाय सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2022 पासुन योजनेच्या
पुढील लाभाचे हफ्ते निरंतर मिळविण्याकरीता ई- केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात
आली आहे.
याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान )
https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान
अॅपव्दारे ओटीपीव्दारे लाभार्थीना स्वतः ई - केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.
ग्राहक सेवा (सीएससी)
केंद्रावर ई - केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल. केंद्र शासनाकडुन
ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी
प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर रुपये 15 फक्त निश्चित करण्यात आला
आहे.
पी.एम. किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील ऑगस्ट-
नोव्हेंबर 2022 या कालावधीची लाभ प्राप्त होण्यापुर्वी ई - केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जालना जिल्हयातील
आधार प्रमाणित एकुण 3 लाख 54 हजार 321 लाभार्थ्यांपैकी 2 लाख 39 हजार 044 लाभार्थ्यांचे
ई - केवायसी प्रमाणिकरण पुर्ण झाले आहे. तसेच
उर्वरित 1 लाख 15 हजार 277 लाभार्थ्यांचे ई - केवायसी प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. योजनेसंदर्भात लाभार्थ्यांच्या
सोयीसाठी आणि या योजनेचा निरंतर लाभ मिळण्यासाठी वरील दोन्ही बाबींची पुर्तता करण्याचे
आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना)
केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-*-.
No comments:
Post a Comment