Monday 10 February 2020

शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसुल व बँक अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे - पालकमंत्री राजेश टोपे


            जालना, दि. 10 –  सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानुन राज्य शासन काम करत आहेसर्वसामान्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत त्वरेने पोहोचविण्यासाठी महसुल विभाग व बँकांनी समन्वयाने काम करावेतसेच विविध शासकीय कार्यालये, बँकांमध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाची वागणुक देण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
            जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आले होतेत्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.
            यावेळी अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा अधीक्ष कृषि अधिकारी बाबासाहेब शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आशुतोष देशमुख, मनोज मरकड, सतीष होंडे, कल्याण सपाटे, भाऊसाहेब कणके, राजेंद्र कोल्हे, बाळासाहेब नरवडे यांच्यासह सर्व तालुक्याचे तहसिलदार, बँकांचे व्यवस्थापक आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, दुष्काळी अनुदान न मिळाल्याच्या शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेतदुष्काळी अनुदानाची रक्कम प्रशासनाकडे उपलब्ध झाली असल्यास या निधीचे प्राधान्याने वितरण करण्यात यावेनिधी संदर्भात काही अडचण असल्यास मंत्रालयीन स्तरावर त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            पीएम किसान योजनेंसंदर्भात आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, या योजनेंतर्गत तीन टप्प्यांमध्ये लाभार्थी कुटूंबाला 6 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येतेज्या शेतकऱ्यांचे आधारलिंक, बँकखाते क्रमांक आयएफएससी क्रमांक चुकीचा नोंदविल्यामुळे योजनेच्या लाभापासुन अनेक लाभार्थी वंचित आहेत. या सर्व तांत्रिक बाबींची तातडीने पुर्तता करुन या योजनेच्या लाभापासुन एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
            निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सातत्याने नापिकीचा सामना करावा लागल्याने शेतीसाठी घेण्यात आलेले पीककर्ज फेडण्यासाठी शेतकरी राजा असमर्थ ठरला. या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असुन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ची घोषणा शासनाने केली आहे. या योजनेचा लाभ जिल्हयातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला देण्यासाठी सर्वांचे आधार क्रमांक तातडीने लिंक करुन घेण्यात यावेतजे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये तसेच 2 लाख रुपयांच्यावर ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे अशा शेतकऱ्यांकडून दोन लाखाच्या वरील रक्कम भरुन घेत या कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी शासन विचाराधीन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            संजय गांधी निराधार श्रावणबाळ  योजनेसंदर्भात आढावा घेताना जिल्ह्यातील प्रत्येक गरजु पात्र व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजेया योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदान दरमहा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल, याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            यावेळी पालकमंत्री श्री टोपे यांनी ऑक्टोबर, 2019 महाचक्रीवादळामुळे झालेले नुकसानीचे निधी वाटप, खरीप अनुदान यासह ईतर विषयांचा विस्तृत आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सुचना केल्या


No comments:

Post a Comment