तरुणांनी स्वयंरोजगाराच्यामाध्यमातुन
उद्योजक बनावे
प्राचार्य श्री गायकवाड यांचे
संवादपर्व कार्यक्रमात आवाहन
जालना,
दि. 5 – आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांनी नोकरीच्या मागे न
लागता तांत्रिक कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उद्योजक
होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.आर.
गायकवाड यांनी केले.
माहिती
व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री
गायकवाड बोलत होते.
व्यासपीठावर
जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, माहिती सहाय्यक अमोल महाजन, सहाय्यक प्रशिक्षणार्थी
सल्लागार एस.एस. जुमनाके आदींची उपस्थिती होती.
श्री
गायकवाड म्हणाले की, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना विविध
व्यवसायावर अधारित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते. आजच्या वाढत्या मागणीनुसार
युवतींसाठीही फॅशन डिझायनिंगसारखे कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यात येते. औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊन आजपर्यंत अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजक बनले
असुन विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची गरज असल्याचेही श्री गायकवाड यांनी यावेळी
सांगितले.
प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान यासह विविध योजनाच्या
माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. कौशल्यावर आधारित तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर
विद्यार्थ्यांना त्यांचा स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा
बँक योजने अंतर्गत विनातारण 50 हजार ते 10 लाखापर्यंत कर्जही उपलब्ध होत असल्याने तरुणांनी
या संधीचा अधिकाधिक प्रमाणात फायदा घेण्याचे आवाहनी श्री गायकवाड यांनी यावेळी केले.
जिल्हा माहिती अधिकारी श्री बावस्कर यांनी
गणेशोत्सवाच्या काळामध्ये संवादपर्व या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करत
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातुन शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकराज्य,
महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र या उपक्रमाद्वारे तसेच विविध वर्तमानपत्र व इलेक्ट्रॉनिक
माध्यमांद्वारे कशा प्रकारे करण्यात येते याची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे
संचलन व आभार गटनिदेशक एस.जी तोंडारे यांनी केले.
कार्यक्रमास
प्रशिक्षण संस्थेतील गटनिदेशक बी.डी. वाणी, आर.एस. साळवे, डी.के. करंगळे, बी.एस. आर्दड,
पी.डी. जुंजे श्रीमती ए. एम. कुलकर्णी, पी.यु. खताडे, जी.डी. केवट यांच्यासह विद्यार्थी,
विद्यार्थीनीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
***-***
No comments:
Post a Comment