Friday 17 February 2017

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक 2017 जिल्ह्यात सरासरी 70.69 टक्के मतदान 7 लाख 88 हजार 372 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क सर्वात जास्त 76.27 टक्के मतदान जाफ्राबाद तालुक्यात तर सर्वात कमी 66.36 टक्के मंठा तालुक्यामध्ये

जालना, दि. 17 –  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक -2017 साठी जिल्ह्यात दि. 16 फेब्रुवारी, 2017 रोजी सकाळी 7-30 ते सायंकाळी 5-30 या वेळेत मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात सरासरी 70.69 टक्के एवढे मतदान झाले असून एकूण 11 लाख 15 हजार 190 मतदारांपैकी 7 लाख 88 हजार 372 एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली असून तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे देण्यात येत आहे. कंसामध्ये एकूण मतदारांची संख्या आहे.
            भोकरदन तालुक्यामध्ये 80 हजार 300 पुरुष मतदारांनी तर 68 हजार 595 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला (209215), जाफ्राबाद 43 हजार 531 पुरुष, 38 हजार 636 स्त्री (107726),                   बदनापुर 41 हजार 566 पुरुष, 35 हजार 724 स्त्री (103174), जालना 62 हजार 565 पुरुष, 53 हजार 361 स्त्री (170386), मंठा 36 हजार 105  पुरुष, 31 हजार 02 स्त्री (101120), परतूर 39 हजार 725 पुरुष, 34 हजार 968 स्त्री (103971), घनसावंगी 57 हजार 401 पुरुष, 49 हजार 647 स्त्री (154855) तर अंबड तालुक्यामध्ये 62 हजार 200 पुरुष मतदारांनी तर 53 हजार 46 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला (164743). आठही तालुक्यात असलेल्या 5 लाख 89 हजार 238 पुरुष मतदार व 5 लाख 25 हजार 952 स्त्री मतदार असे एकूण 1115190 एवढ्या मतदारांपैकी 4 लाख 23 हजार 393 पुरुष मतदार व 3 लाख 64 हजार 979 स्त्री मतदार असे एकूण 7 लाख 88 हजार 372 एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.    जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वात जास्त 76.27 टक्के मतदान जाफ्राबाद तालुक्यामध्ये झाले तर सर्वात कमी 66.36 टक्के मंठा तालुक्यामध्ये झाले.  भोकरदन तालुक्यात 71.17 टक्के, बदनापुर तालुक्यात 74.91 टक्के, जालना तालुक्यात 68 टक्के, परतूर तालुक्यात 71.84 टक्के, घनसावंगी तालुक्यात 69.13 टक्के तर अंबड तालुक्यामध्ये 69.96 टक्के मतदान झाले.
           

*******

No comments:

Post a Comment