जालना,दि.18(जिमाका)
: राज्य शासनामार्फत 17 सप्टेंबर
ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या
अंतर्गतच महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या
गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची
माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर
‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून
नागरिकांशी थेट संवाद साधत शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती पोहोचविणे हा या ‘लोकसंवाद-2026’
उपक्रमाचा उद्देश आहे.
गणेशोत्सवाचे निमित्ताने आज दि.
18 सप्टेंबर रोजी जालना तालूक्यातील वडारवाडीचा राजा जय बजरंग गणेश मित्र मंडळ येथे
लोकसंवाद-2026 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य,
कृषी आणि महिला बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांनी देण्यात आली.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी डी. एस. बोराडे यांनी
यावेळी आरोग्य विभागातील योजनांची माहिती दिली. तर महिला बाल विकास विभागाचे अंमलबजावणी
सहाय्यक अधिकारी बी.बी. राठोड, यांनी दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विशाल शंकर पवार
यांच्यासह या कार्यक्रमास नागरिकांची उपस्थिती होती.
****

No comments:
Post a Comment