Monday, 13 July 2026

कर्जमुक्ती-2026


 

कर्जमुक्ती-2026


 

जालना येथे 15 जुलै 2026 रोजी “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”

 


जालना, दि.13 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना णिपोलिस अधीक्षक कार्यालय,जालना, यांचे संयुक्त विद्यामानाने दिनांक 15 जुलै, 2026 रोजी बॅडमिंटन हॉल,पोलीस परेड ग्राउंड, जिल्हाधिकारी कार्यालय रोड, जालना, येथे सकाळी 10ते दुपारी 4वाजेपर्यंत पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजितकरण्यातआलाआहे. यासाठी646रिक्तपदे उपलब्ध आहेत.

 

            यामेळाव्यातएचएससी, कोणतेही पदवीधर, आयटीआय ट्रेडधारक (फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, फिल्‍ड असिस्टंट मॅनेजर, अप्रेन्‍टीस ट्रेनी, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, ब्रांच ऑप्रेशनल मॅनेजर, संगणक ऑपरेटर,अप्रेंटिस, ड्रायव्हर, सेल्सएक्झिक्युटिव्ह, सर्व्हिस अॅडव्‍हायझरअसिस्टंट टेक्न‍िशियन, CMYKPY TRAINEE इत्यादी पात्रताधारक नोकरी इच्छूक उमेदवारासाठी एकूण 646 रिक्त पदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 19 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये भारत फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, जालना यांची 40 पदे,एनआरबी बेअरिंग्ज लिमिटेड, जालना., यांची 70 पदे, एल. जी. बालकृष्णन अँड ब्रदर्स प्रा. लि, जालनायांची 25 पदे,विक्रम टी प्रोसेसर प्रायव्हेट लिमिटेड, जालना यांची 6 पदे, कालिका स्टील अलॉयस लिमिटेड, जालनायांची 10 पदे,भाग्यश्री रोलिंगमिल प्रा.लि., यांची 20 पदे, लीलाई इलेक्ट्रिकल्स, जालनायांची03पदे, श्री. माऊली मोटार ड्रायव्हिंग, जालनायांची04पदे,अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जालनायांची75पदे,आई इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, जालनायांची10पदे, स्टेट बँक ऑफ इंडिया लाइफ इन्शुरेंस जालना यांची 77 पदे,ॲक्सिस बँकजालना यांची 10 पदे,कलश सीड्स, त्रपती संभाजी नगरयांची 20 पदे,टेक्नो क्राफ्ट फॉर्म वर्क लिमिटेड,त्रपती संभाजी नगर यांची 90 पदे,गरवारे हायटेक लिमिटेड, त्रपती संभाजी नगर यांची50 पदे,पोलिस अधीक्षक कार्यालय, जालना यांची 90 पदे,पोलीस ट्रेनिंग सेंटर, जालना यांची 11 पदे,देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था, जालना यांची 20पदे जालना हॉस्पिटल, जालना यांची 15पदे असून या मेळाव्यासाठी वरील19 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड भरती करणार आहेत.

                        

            या सुवर्ण संधीचा रोजगार जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि किमान पाच प्रतीत रिझ्युम/बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे आणि आधारकार्ड/सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह सकाळी 09 वाजता उपस्थितरहावे.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापर्यं सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in तसेच केंद्र शासनाच्या www.ncs.gov.inयासंकेतस्थळावर नोकरी साधक म्हणूननोंदणीकरावी. आपल्या होमपेजवरील Job Fair  हा पर्याय निवडा.जालना जिल्हा निवडा फिल्टर बटनावर क्लिक करा.रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा [SPECIAL JOB FAIR- 2 (2026-27) JALNA]या ओळीतील ॲक्शन मेनुतील दुस-या बटनावर क्लिक करा. I Agree हा पर्याय निवडा. पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिक्त पदांना Apply बटनावर क्लिक करा.यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन या दुरध्वनी क्रमांकावर02482-299033वर संपर्क करावा असे आवाहन सहायकआयुक्त, कौशल्यविकास, रोजगार उद्योजकता, गणेश चिमणकर,  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

 

 

जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम उत्साहात संपन्न



 


            जालना, दि.13 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना रोजगार, करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जालना यांच्या वतीने दि. 13 जुलै 2026, सोमवार रोजी महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

            सदर कार्यक्रम गणेश चिमणकर, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास अनिल तलरेजा, अध्यक्ष, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार समिती, जालना यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

            या सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण, करिअर समुपदेशन, रोजगार मेळावे, कॅम्पस प्लेसमेंट, इंटर्नशिप, स्वयंरोजगार व उद्योजकता विकासाबाबत मार्गदर्शन तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी परस्पर सहकार्य करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होऊन उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्यास चालना मिळणार आहे.

            कार्यक्रमादरम्यान जालना जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांचे प्राचार्य/प्लेसमेंट अधिकारी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, कौशल्यवृद्धीसाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनासोबत समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल परिहार यांनी केले, तर आभार प्रदर्शन दत्ता जाधव यांनी केले.

            सदर उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कौशल्य विकास अधिकारी विशाल येवले तसेच अमोल बोरकर, नितीन लोकडे, प्रदीप डोळे, कैलास काळे, रविंद्र पाडमुख, विशाल जगरवाल, दीपक पालवे व गणेश सुपारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

 

Friday, 10 July 2026

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित सुरक्षा मंत्र: आधुनिक जगात एक पाऊल पुढे कार्यशाळेस विद्यार्थीनी व महिलांचा उत्स्फुत प्रतिसाद

 



 

जालना, दि.11 (जिमाका): जागतिक युवा कौशल्य दिन (15 जुलै) निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, जालना व जालना जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनी व महिलांसाठी सुरक्षा मंत्र: आधुनिक जगात एक पाऊल पुढे ही कार्यशाळा घेण्यात आली.

सदर कार्यशाळेचे उद्घाटक विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक जालना यांनी महिला सुरक्षेसाठी जालना पोलिस दलाकडून राबविले जाणारे उपक्रमाची माहिती दिली व आत्मस्वंरक्षणासाठी महिलांनी सेल्फ डिफेन्स शिकणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र, गणेश चिमणकर यांनी कौशल्य विकासाद्वारे आजच्या युवतींचे सक्षमीकरण करून सक्षम राष्ट्राची उभारणी करता येईल हा संदेश दिला. सदर कार्यशाळेत जालना जिल्ह्यातील नामांकित शाळा व महाविद्यालयाच्या 90 विद्यार्थींनी व महिला यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे स्वसंरक्षणाची तंत्र आत्मसात केले. कार्यशाळेच्या समारोपात गीता नाकाडे, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती, यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल येवले, कौशल्य विकास अधिकारी,जालना, संजय सोनवणे, जालना पोलिस दल व दत्ता जाधव, कनिष्ठ‍ कौशल्य विकास अधिकारी तसेच डॉ अमोल परिहार, रविंद्र पडमुख, विशाल जगरवाल व दिपक पालवे यांनी परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

‘माय भारत' पोर्टलवर युवकांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 


जालना, दि.11 (जिमाका):   युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या 'माय भारत' नोंदणी मोहिमेत जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवा सल्लागार समितीची बैठक व्हर्च्युअल माध्यमातून पार पडली. तसेच उपस्थित सहाय्यक जिल्हाकारी डॉ. रंगमंजु तर जिल्हा युवा अधिकारी मयूरकुमार गोरमे यांनी 'माय भारत' नोंदणी मोहिमेचे सादरीकरण केले.

बैठकीत 1 जुलै ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या 'माय भारत' नोंदणी मोहिमेच्या नियोजनाचा व अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्रसेना (NCC), स्काऊट-गाईड तसेच विविध युवा मंडळांच्या माध्यमातून  15 वर्षांवरील युवक-युवतींची 'माय भारत' पोर्टलवर मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्याचे निर्देश दिले.

ही मोहीम तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी आणि नोंदणी प्रक्रियेला गती मिळावी यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'माय भारत नोडल अधिकारी' आणि 'माय भारत अॅरम्बेसेडर' यांची नियुक्ती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

  ग्रामीण व शहरी भागातील युवक मंडळांना अधिक सक्षम करून त्यांना थेट 'माय भारत' पोर्टलशी जोडण्यावर या मोहिमेत भर दिला जाणार आहे. तसेच जिल्ह्यात नवीन युवक मंडळांची निर्मिती करून त्या माध्यमातून युवकांचे संघटन अधिक मजबूत केले जाईल. वार्षिक कृती आराखड्यांतर्गत प्रस्तावित असलेल्या विविध राष्ट्रीय व विभागीय कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय विभागांमध्ये समन्वय स्थापित केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने विकसित भारत पदयात्रा, युथ क्लब डेव्हलपमेंट कॅम्पेन, स्पोर्ट्स मीट, नशा मुक्त भारत अभियान यांसारख्या महत्वपूर्ण कार्यक्रमांचा समावेश असून, या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे युवा पिढीमध्ये जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा युवा  अधिकारी मयूरकुमार गोरमे यांनी दिली.

या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी, समाजकल्याण अधिकारी , राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, स्काऊट-गाईड व इतर अधिकारी  व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-*-

 

 

विशेष वृत्त कर्जमाफीसाठी आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य

 


जालना,दि.10(जिमाका): राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आता शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांकाशिवाय कर्जमाफी अथवा प्रोत्साहनपर लाभ कोणत्याही परिस्थितीत दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक विष्णु रोडगे यांनी केले आहे.

योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज, जे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत होते आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जमीनधारणेचे क्षेत्र विचारात घेतले जाणार नसून, एका किंवा अनेक बँकांमधील मिळून कमाल दोन लाख रुपयांपर्यंतची मुद्दल व व्याजासह थकबाकी थेट संबंधित कर्ज खात्यात जमा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येणार आहे.

याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनाने दिलासा दिला आहे. सन 2022-23, सन 2023-24 आणि सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

अॅग्रीस्टॅक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी प्रथम आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे. त्यानंतर अॅग्रीस्टॅक पोर्टलवर जाऊन नोंदणी पूर्ण करावी. नोंदणी झाल्यानंतर मिळणारा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक संबंधित पीक कर्ज खाते असलेल्या बँकेत जमा करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हा क्रमांक आधीपासून उपलब्ध आहे, मात्र त्यांनी तो अद्याप बँकेत सादर केलेला नाही, त्यांनीही तो तातडीने बँकेकडे सादर करावा.

अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांकाशिवाय कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर लाभाची रक्कम खात्यात जमा होणार नसल्याने पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता आवश्यक नोंदणी करून संबंधित बँकेत माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक  विष्णु रोडगे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-