Wednesday, 11 March 2026

दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सव उत्साहात लोकसेवेचे ध्येय आणि मूलभूत संकल्पनांचे ज्ञान यशासाठी आवश्यक - उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे

 


* जालना ग्रंथोत्सव-2025 : ‘मी धर्मवीर’ नाटिकेने शिवकालीन इतिहास जिवंत…

 

जालना, दि.11 (जिमाका) :-  स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात निस्वार्थी वृत्ती आणि कार्यक्षमता हेच यशाचे खरे गमक आहे. केवळ शासकीय नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने नाही, तर गावाचा विकास आणि जनतेची सेवा करण्यासाठी अधिकारी होण्याचे ध्येय बाळगावे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना केवळ पुस्तकी वाचन न करता विषयांच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यावर भर देणे आवश्यक आहे. जोपर्यंत विषयातील संकल्पना स्पष्ट होत नाही, तोपर्यंत केवळ पाठांतराचा उपयोग होत नाही. पाया भक्कम असेल तर यश हमखास मिळते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतील अभ्यासाची सुरुवात नेहमी मूलभूत संकल्पनेपासून करा. तरी स्पर्धा परीक्षेत लोकसेवेचे ध्यये आणि मूलभूत संकल्पनांचे ज्ञान यश प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ‘जालना ग्रंथोत्सव-2025’ आयोजित करण्यात आला आहे. बुधवार दि. 11 मार्च रोजी या ग्रंथोत्सवात ‘स्पर्धा परीक्षा काळाची गरज’ या विषयावर आयोजित परिसंवादात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र तौर होते. तर डॉ. संजीवनी तडेगावकर, डॉ. प्रभाकर शेळके, प्रा.राजेंद्र भोसले, उपशिक्षणाधिकारी संजय कायंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

समाजासाठी आणि देशासाठी काम करण्याची ओढ ज्याच्या मनात आहे, तोच एक उत्तम अधिकारी बनू शकतो. एक अधिकारी म्हणून आपण घेतलेल्या निर्णयाचा समाजावर काय दूरगामी परिणाम होईल, याचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेचे क्षेत्र आव्हानात्मक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक राहून तयारी करावी, मात्र त्याच वेळी आपल्याकडे ‘प्लॅन बी’ सुद्धा तयार असावा. यश मिळाले नाही तरी निराश न होता, पर्यायी मार्गाचा विचार करून जिद्दीने पुढे जावे. प्रशासनात येताना तुमची वृत्ती ही केवळ नोकरीची नसून ती सेवा करण्याची असावी. एक अधिकारी म्हणून आपण घेतलेल्या निर्णयाचा समाजावर काय दूरगामी परिणाम होईल, याचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनात येताना तुमची वृत्ती ही केवळ नोकरीची नसून ती सेवा करण्याची असावी. स्पर्धा परीक्षेत सर्व विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. केवळ पुस्तकी कीडा न होता, चालू घडामोडींचे सखोल ज्ञान आत्मसात करावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. सुत्रसंचालन डॉ. प्रभाकर शेळके यांनी केले तर आभार सतीश जाधव यांनी मानले. यावेळी ग्रंथप्रेमी, ग्रंथालयाचे संचालक, ग्रंथपाल, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मी धर्मवीर नाटिकेने शिवकालीन इतिहास जिवंत

ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी 1.30 वाजता ‘मी धर्मवीर’ या नाटिकेचे ओजस्वी सादरीकरण करण्यात आले. ऐतिहासिक काळात झालेला अन्याय आणि जुलूम याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेला लढा यात प्रभावीपणे मांडण्यात आला. रायरेश्वर मंदिरातील स्वराज्याची शपथ आणि आग्रा भेटीतील थरार पाहून उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. या नाटिकेने संपूर्ण सभागृहात चैतन्य निर्माण केले होते.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 108                                                                      दि. 11 मार्च, 2026

14 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

जालना, दि.11 (जिमाका) :-  न्यायालयातील प्रलंबित वादांमधून सुटका करून घेण्यासाठी आणि वेळ, पैसा व मानसिक ताण वाचवण्यासाठी जालना जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची संधी चालून आली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपापसातील वाद सामोपचाराने मिटवून वेळ, पैसा आणि मानसिक ताण वाचवावा. या लोकअदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी केले आहे.

लोकअदालतीमध्ये प्रामुख्याने मोटार अपघात विमा दावे आणि कौटुंबिक वाद, बँकांची वसुली प्रकरणे, वीज वितरण कंपनीशी संबंधित वाद, सर्व प्रकारचे दिवाणी दावे आणि तडजोडपात्र फौजदारी गुन्हे, औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणे आदि प्रकारची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. तरी संबंधितांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 109                                                                       दि. 11 मार्च, 2026

अमृतचा वॉशिंग्टन विद्यापीठाशी मदतीचा हात

जालना, दि.11 (जिमाका) :- महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणांना आता केवळ राज्यातच नव्हे, तर जागतिक स्तरावर आपली उद्योजकता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्यात नुकताच धोरणात्मक भागीदारीचा करार झाला आहे. या भागीदारीमुळे स्थानिक नवउद्योजकांना आता थेट अमेरिकेतून तांत्रिक आणि आर्थिक बळ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमृत संस्थेच्या माध्यमातून राज्यातील गुणवंत तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. या प्रयत्नांना आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनाची आणि मार्गदर्शनाची जोड मिळणार आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे फाऊंडेशन आणि त्यांच्या स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरने यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. या करारामुळे जागतिक दर्जाच्या संशोधनाला चालना मिळणार असून, महाराष्ट्रातील ग्रामीण व निमशहरी भागातील स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेची दारे उघडली जाणार आहेत.

वॉशिंग्टन विज्ञान-तंत्रज्ञान विद्यापीठाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या भागीदारीची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण करारावेळी विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरच्या कार्यकारी संचालिका प्रिया कोठारी आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी ऑनलाइन स्वरूपात उपस्थिती लावून या करारावर शिक्कामोर्तब केले आहे. असे अमृतचे जिल्हा व्यवस्थापक नितिन खेकाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 110                                                                       दि. 11 मार्च, 2026

 

 

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्लेसमेंट ड्राईव्ह;

13 मार्चला 22 जागांसाठी थेट मुलाखती

 

          जालना, दि.11 (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शुक्रवार, दि. 13 मार्च 2026 रोजी विशेष प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत होणाऱ्या या मोहिमेत नामांकित संस्थांमध्ये रिक्त असलेल्या 22 पदांसाठी पात्र उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना येथे घेतल्या जाणार आहेत.

              या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये प्रामुख्याने रेणुका देवी नागरी सहकारी बँक आणि गणपती नेत्रालय या सारख्या नामांकित संस्था सहभागी होत आहेत. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना संबंधित कंपनीकडून मिळणाऱ्या वेतनाव्यतिरिक्त शासन निर्णयानुसार त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार रुपयांपर्यंतचे मासिक विद्यावेतन देखील दिले जाणार आहे.  इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला येण्यापूर्वी राज्य शासनाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in किंवा केंद्र शासनाच्या www.ncs.gov.in या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डवरील 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्लेसमेंट ड्राईव्ह' या टॅबवर क्लिक करून जालना जिल्ह्याची निवड करावी आणि संबंधित पदांची माहिती घ्यावी.असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 111                                                                       दि. 11 मार्च, 2026

 

जैवविविधतेत पक्षी-प्राणी यांचे महत्त्व मोलाचे

असून त्यांच्या संरक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

                                                                                        - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

              जालना, दि.11 (जिमाका) :- जैवविविधतेचे संतुलन राखण्यात पक्षी व वन्यप्राण्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून पर्यावरण संवर्धनासाठी त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पक्ष्यांचे अधिवास जपणे, झाडे लावणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

              महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभाग, वन प्रशिक्षण संस्था जालना तसेच महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना येथील वन प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा प्रशासकीय संकुलात प्रथमच विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना पी. एम. मिन्नू, विभागीय वन अधिकारी सुरेश वडदे, सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अजित पुकळे, वन प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक अजय जाधव, महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा निसर्ग कट्टा संस्थेचे संस्थापक अमोल सावंत, पक्षीमित्र संघटनेचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर गिराम, मयूर साबळे आणि सुभाष पारे यांची उपस्थिती होती.

                        कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजन व पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली व स्व.श्री मारुती चितमपल्ली यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी व्हिडिओ संदेशद्वारे या कार्यक्रमास शुभेच्छापर संदेश देऊन पर्यावरण संरक्षण हे आपले संविधानिक जबाबदारी असल्याचे सांगितले.

              जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, पर्यावरणातील संतुलन राखण्यासाठी पक्षी व प्राणी अत्यंत आवश्यक घटक आहेत. अनेक पक्षी कीड नियंत्रण, परागीभवन तसेच बियांचे प्रसारण करण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे शेती, जंगल आणि पर्यावरण या तिन्ही घटकांसाठी त्यांचे अस्तित्व आवश्यक आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे अधिवास कमी होत असून त्यांच्या संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशील होण्याची गरज आहे.विद्यार्थ्यांनी पक्षीनिरीक्षणाची आवड जोपासून पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजात पोहोचवावा. पक्ष्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची संमेलने महत्त्वाची ठरतात. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम व पर्यावरणाबद्दलची जबाबदारी वाढविण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

              या पक्षीमित्र संमेलनाचे प्रस्ताविक विभागीय वन अधिकारी सुरेश वडोदे यांनी करून विद्यार्थी पक्षी मित्र संमेलनाचा उद्देश सांगितला व सामाजिक वनीकरण विभागाकडून राष्ट्रीय हरित सेना व पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्हाभरात घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमा बाबत माहिती दिली. तर महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा निसर्ग कट्टा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सावंत यांनी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्याबाबत सांगून माझे पक्षी अभयारण्य या विषयावर स्लाइड शोद्वारे सादरीकरण केले. महाराष्ट्रात शालेय पक्षी मित्र संमेलन हा उपक्रम अमोल सावंत यांच्या संकल्पनेत सुरू करण्यात आला आहे . जालना येथील प्रसिद्ध पक्षी निरीक्षक तथा महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर गिराम यांच्या जालना जिल्ह्यातील पक्षी वैभव या विषयावर आधारित छायाचित्राचे प्रदर्शन दाखवून जालना जिल्ह्याचे पक्षी वैभव यावर स्लाईड शो सादर केला. सर्व विद्यार्थ्यांसाठी पक्षी चित्रकला स्पर्धा घेऊन , पक्षासाठी कृत्रिम घरटे निर्मिती कार्यशाळा, प्रश्नमंजुषा, व्याख्याने इ.उपक्रम घेण्यात आले आहे. या विद्यार्थी पक्षी संमेलनाचा उद्देश असा आहे की जालना जिल्ह्यात जास्तीत जास्त विद्यार्थी पालक शिक्षक यांना पक्षी निरिक्षण आणि पक्षाबाबतीत जास्तीत जास्त माहिती होणे आणि त्या बाबतीत जनजागृती करणे हा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी चित्रकला स्पर्धा, प्रश्न मंजुषा व इतर स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय , तृतीय क्रमांक प्राप्त व सहभागी झालेल्या विद्यार्थांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

              चित्रकला स्पर्धेचे मूल्यांकन कलाशिक्षक परिमल पेडगावकर व अमोल मोरे यांनी केले. पक्षी संमेलनात सहभाग नोंदवलेल्या सर्व शाळांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निवेदक मनिषा पाटील यांनी केले.यामध्ये जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून इको क्लबच्या निवडक दोन शाळांचे प्रत्येकी 15 ते 20 विद्यार्थी व प्रत्येक शाळेतून दोन शिक्षक सहभागी झाले होते. जिल्हा मास्टर ट्रेनर मधुकर गायकवाड, जालना राष्ट्रीय हरीत सेना तथा महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटनेचे मयूर साबळे , जीवनराव पारे विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र पक्षी मित्र आजीवन सभासद सुभाष पारे तसेच समस्त विभागातील वनअधिकारी, वनपाल, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 112                                                                       दि. 11 मार्च, 2026

 

 ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

·         मार्च ते मे 2026 दरम्यान विविध मंडळांत शिबिरे

·         नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तातडीने निराकरण

 

                      जालना,दि.11(जिमाका) :- राज्य शासनाच्या आदेशानुसार जालना तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. 1 राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या महसुली संबंधित अडचणी व तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासह विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या शिबिरांमध्ये महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत नोंदी अद्ययावत करणे, डिजिटल सेवा पोर्टलवरील प्रकरणांचा निपटारा तसेच सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी अंतर्गत सेवा देण्यात येणार आहेत. मार्च ते मे 2026 या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

         कार्यक्रमानुसार 14 मार्च रोजी जालना तालुक्यातील सावंगी तलाव मंडळात निरखेडा रामेश्वर मंदीर येथे, बदनापूर तालुक्यात रोशेगाव मंडळात शिवाजी विद्यालय रोशेगाव येथे, अंबड तालुक्यातील धनगरपिंप्री मंडळात मंगल कार्यालय धनगरपिंप्री येथे,  घनसावंगी तालुक्यात राणीउंचेगाव मंडळात शारदा मंगल कार्यालय राणी उंचेगाव येथे, परतूर तालुक्यात श्रीष्टी मंडळात जि.प.शाळा श्रीष्टी येथे, मंठा तालुक्यात तळणी मंडळात जि.प.शाळा तळणी येथे, भोकरदन तालुक्यात जानेफळ दाभाडी मंडळात महादेव मंदीर जानेफळ दाभाडी येथे, आणि जाफ्राबाद तालुक्यातील कोळेगाव मंडळात जि.प.शाळा भारत बु. येथे हे शिबिर सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 113                                                                       दि. 11 मार्च, 2026

 

ग्रामीण भागातील महिलांनी छोट्या उद्योगांच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावे

-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

जालना,दि.11(जिमाका) :-  ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून छोटे-छोटे उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जालना शहरातील डॉ. फ्रेझर बॉईज हायस्कूल येथे दि. 7 मार्च ते 11 मार्च 2026 या कालावधीत ग्राम विकास विभाग व पंचायत राज विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद जालना उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण स्वयंसहायता समूहांच्या महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार व पारंपरिक उत्पादनांची भव्य प्रदर्शनी व विक्री शिबिर 'जानकी महोत्सव' आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीला भेट देऊन पाहणी करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना पी. एम. मिन्नू, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सुनिल कुमार पठारे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीमती स्मिता पवार, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद जालना श्रीमती सविता शालघर, उप जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती नम्रता चाटे, उप जिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती सुकेशिनी कांबळे-पगारे, उप जिल्हाधिकारी रोहयो श्रीमती मनिषा दांडगे, उप जिल्हाधिकारी भूसंपादन श्रीमती मनिषा देशपांडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग श्रीमती कोमल कोरे, तहसीलदार श्रीमती छाया पवार, गटविकास अधिकारी बदनापूर श्रीमती ज्योती राठोड, गटविकास अधिकारी अंबड श्रीमती ज्योती कवडदेवी, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती संगिता भागवत, जिल्हा अभियान व्यवस्थापक शैलेश चौधरी यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांकडे अनेक कौशल्ये व पारंपरिक ज्ञान आहे. या कौशल्यांचा उपयोग करून विविध लघुउद्योग उभारता येतात. स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळू शकते. महिलांनी घरगुती व्यवसाय, हस्तकला, अन्नप्रक्रिया, शिवणकाम, तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांवर आधारित उद्योग सुरू करून स्वतःचा व कुटुंबाचा आर्थिक विकास साधावा. सोबतच महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करून उत्पादनांची विक्री वाढवता येते. तसेच बाजारपेठेची माहिती घेऊन उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. नवीन उद्योगांविषयी माहिती घेऊन ते उभारण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.या प्रदर्शनीत ग्रामीण स्वयंसहायता समूहांच्या महिलांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, मसाले, पापड, लोणची, हस्तकला वस्तू, सजावटीच्या वस्तू, कपड्यांवरील भरतकाम आदी पारंपरिक व दर्जेदार उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. नागरिकांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध वस्तूंची खरेदी केली. या वेळी संबंधित विभागाचे अधिकारी, स्वयंसहायता समूहांच्या महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली असून त्यांच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळणार आहे.

-*-*-*-*-

 

Friday, 6 March 2026

जालना जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-1 शिबीरादरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणा प्रयत्न करणार - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जालना, दि. 6 (जिमाका) :- महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" टप्पा 1 आयोजित करण्यात येणार आहे. या कालावधीत आयोजित शिबीरादरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणा प्रयत्न करणार आहेत असे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले. दि. 5 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाभरात दि. 7 मार्च 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वव समाधान शिबीर अभियान टप्पा 1 च्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, प्रभारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुकेशिनी कांबळे-पगारे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वव समाधान शिबिरांच्या माध्यमातून शासनाकडून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण योजना तसेच लोकाभिमुख प्रशासनासाठी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय व योजनांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबीरा दरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय योजनांशी संबंधित प्रलंबित समस्या या शिबिरांच्या माध्यमातून तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी संबंधित गावातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्या, अडचणी, तक्रारी ह्या मंडळ अधिकारी यांच्याकडे देणे बंधनकारक राहील. संबंधित मंडळात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे त्या दिवशी संबंधित विभागाचे अधिकारी या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच या शिबीरा दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून जालना जिल्ह्यात एकूण 65 ठिकाणी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” आयोजित करण्यात येणार असून मंडळ स्तरावर या शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक शिबिरात महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, सामाजिक न्याय, कृषी, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जांची तात्काळ दखल घेतील. 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत मंडळ व नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर राबविण्यात येणार असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांचे महसूल विषयक प्रश्न तात्काळ निकाली काढणे हा प्रमुख उद्देश आहे. प्रत्येक तालुक्यात एकदिवसीय समाधान शिबिरे आयोजित करून प्रलंबित फेरफार, 7/12 दुरुस्ती, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे यांसारख्या सेवा ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ तत्त्वावर देण्यात येणार आहेत.अभियानाच्या पूर्वतयारीत गावनिहाय प्रलंबित प्रकरणांची यादी तयार करून शिबिरापूर्वी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. ७/१२ व ८अ उताऱ्यांचे अद्ययावतीकरण, डिजिटल ७/१२ ची जनजागृती, तसेच एकवेळच्या अधिमूल्य भरणा पद्धतीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करावे. तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणे, संपादन व अकृषी परवानगी नोंदींची अद्ययावत माहिती शिबिरात उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच ‘एक खिडकी व्यवस्था’ प्रभावीपणे राबवून सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहतील .शिबिरांची व्यापक प्रसिद्धी करून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी सोशल मीडिया, स्थानिक माध्यमे व दवंडीचा वापर करण्यात येणार आहे. *अभियानातंर्गत शिबीरांची पूर्व तयारी करण्यासाठीच्या मार्गदर्शक सुचना :* अ) शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग २ जमिनी भोगवटदार वर्ग १ मध्ये परावर्तित करण्यात आल्या किंवा नाहीत याची तपासणी मंडळ स्तरावर करणे व अशा काही जमिनी वर्ग १ मध्ये परावर्तित करणे बाकी असल्यास त्याबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुर्वतयारीच्या कालावधीत प्रक्रिया पुर्ण करावी व अद्यावत नोंदीसह ७/१२ लाभार्थ्यांना वितरीत करावे. ब) जिवंत ७/१२ मोहिमेअंतर्गत यापुर्वीच शासनामार्फत सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व गावा मध्ये ७/१२ वाचन पूर्ण करून प्रलंबीत नोंदीच्या याद्या तयार कराव्या व त्याअनुषंगाने दुरूस्तीबाबत कार्यवाही शिबीरापुर्वी पुर्ण करून घेणे. शिबीरात अद्यावत अभिलेख अर्जदारांना उपलब्ध करून द्याव्या. क) सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज शिबीरापुर्वी भरून घेणे व समितीच्या बैठकीचे आयोजन करून लाभ मंजुर करून घ्यावे व शिबीरात मंजुरी आदेशाचे वितरण करावे. ड) तुकडेबंदी कायद्याविरूध्द दिनांक १५.११.१९६५ ते १५.१०.२०२४ पर्यंत प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमीनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतरण बाबत गावनिहाय यादी तयार करावी. इ) नोंदणीकृत दस्ताचे आधारे रद्द झालेली, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लघंनामुळे ७/१२ मधील इतर अधिकारातील खरेदीदारांचे नाव, इतर अधिकारात नोंदविलेले शेरे, तसेच नव्याने प्राप्त अर्जाविषयी फेरफार घेणे. अनोंदणीकृत व्यवहाराविषयी गाव निहाय माहिती गोळा करून नोंदणीकरीता नोंदणी विभागाकडे पाठविणे. ७/१२ अद्यावत करून शिबीराच्या दिवशी अद्यावत ७/१२ चे वाटप करावे ई) मंडळ स्तरावरील सर्व शाळांचा आढावा घेऊन दाखले वाटप न झालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करणे. शाळेमध्ये Camp Mode वर विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरून घेणे. शिबीराच्या दिवशी दाखल्यांचे वाटप करावे. उ) उपविभागीय स्तरीय समितीने शासन निर्णय क्र.लवेसू२०२५/प्र.क्र.०२/पाणंद रस्ते, दिनांक १४/१२/२०२५ नुसार शिर्बीर आयोजित करावायाच्या मंडळातील पाणंद रस्त्यांची प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतला उपलब्ध करुन द्यावे. ऊ) मंडळातील सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वाटपासाठी बाकी राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करणे. तसेच संबंधीत शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुर्वतयारीच्या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करावी व शिबीरात पट्टे वाटप करावे. *समाधान शिबीर - प्रमुख वैशिष्ट्ये* *शिबीर स्थळी मिळणार १५ पेक्षा जास्त महसुली सेवा* * प्रलंबित फेरफार * ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती *डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उता-यांचे वाटप *उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र * नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र * अकृषिक (NA) परवानगी * अकृषिक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा * नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती * सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे * विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप * तुकडेबंदी कायद्यांच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा * घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज * अॅग्रीस्टॅक आणि पी. एम. किसान नोंदणी * भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्यावत केली जाणार *अभियानाची विशेष उद्दिष्टे* * दिव्यांग व्यक्तिंना कृत्रीम अवयव वाटप * शासन मंजूर घरकुल लाभार्थीना प्रत्येकी ५ ब्रास वाळु वाटप * एकल महिलांना सर्व लाभ एका ठिकाणी देणे. * असंघटीत कामगारासाठी विशेष आरोग्य शिबीर * कृषी विभाग विविध योजना माहिती व प्रधानमंत्री माती परीक्षण योजना शिबीर * आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड बाबत मार्गदर्शन करणे *जिल्हातील शिबीरांचे ठिकाण व दिनांक :- 7 मार्च 2026 जालना- देवमूर्ती, बदनापूर- बावणे पांगरी, अंबड-जामखेड, घनसावंगी-कुंभार पिंपळगाव, परतुर- आष्टी, मंठा- पांगरी गोसावी, भोकरदन- राजुर, जाफ्राबाद-माहोरा 14 मार्च 2026- जालना- नेर, बदनापूर- रोषणगाव, अंबड-धनगर प्रिंप्री, घनसावंगी-राणी उंचेगाव, परतुर- श्रीष्टी, मंठा-तळणी, भोकरदन- जानेफळ दाभाडी, जाफ्राबाद-कोळेगाव . 22 मार्च 2026- जालना- सावंगी तलाव, अंबड- शहागड, घनसावंगी- रांजणी, भोकरदन- धावडा. 28 मार्च 2026- जालना-विरेगाव, बदनापूर-शेलगाव, अंबड- वडीगोद्री, भोकरदन- आव्हाना. 6 एप्रिल 2026- जालना- रामनगर, भोकरदन- पिंपळगाव रेणुकाई 10 एप्रिल 2026 जालना- वाघ्रुळ जहागीर, बदनापूर- चिखली, अंबड-ताड हदगाव, घनसावंगी-पानेवाडी, परतुर- वाटुर, मंठा-ढोकसाळ, भोकरदन- केदारखेडा, जाफ्राबाद- टेंभुर्णी 17 एप्रिल 2026- जालना- पाचन वडगाव, बदनापूर- दाभाडी, अंबड-गोंदी, घनसावंगी-अंतरवाली टेंभी, परतुर- सातोना खुर्द, मंठा- माळतोंडी, भोकरदन- हसनाबाद, जाफ्राबाद-वरुड बुद्रुक. 24 एप्रिल 2026- जालना-सेवली, बदनापूर- बदनापूर ग्रामीण, अंबड-सुखापुरी, घनसावंगी-जांब समर्थ,परतुर- परतुर ग्रामीण, मंठा- जयपूर, भोकरदन- दानापूर, जाफ्राबाद- कुंभारझरी. 2 मे 2026- जालना- गोलापांगरी, अंबड- रोहिलागड, परतुर-कोकाटे हदगाव, मंठा- मंठा शहर, भोकरदन- सिपोरा बाजार. 8 मे 2026- जालना मनपा, बदनापूर नगर पंचायत, नगर परिषद अंबड, नगर पंचायत तिर्थपुरी,नगर परिषद परतुर, नगर पंचायत मंठा, नगर परिषद भोकरदन, नगर पंचायत जाफ्राबाद. 15 मे 2026- नगर पंचायत घनसावंगी, भोकरदन- आन्वा जिल्हातील सर्व नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. -*-*-*-*-

 

जालना जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-1

शिबीरादरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या

सोडविण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणा प्रयत्न करणार

-         जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

जालना, दि. 6 (जिमाका) :- महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" टप्पा 1 आयोजित करण्यात येणार आहे. या कालावधीत आयोजित शिबीरादरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणा प्रयत्न करणार आहेत असे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.

दि. 5 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाभरात दि. 7 मार्च 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वव समाधान शिबीर अभियान टप्पा 1 च्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, प्रभारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुकेशिनी कांबळे-पगारे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वव समाधान शिबिरांच्या माध्यमातून शासनाकडून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण योजना तसेच लोकाभिमुख प्रशासनासाठी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय व योजनांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबीरा दरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय योजनांशी संबंधित प्रलंबित समस्या या शिबिरांच्या माध्यमातून तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी संबंधित गावातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्या, अडचणी, तक्रारी ह्या मंडळ अधिकारी यांच्याकडे देणे बंधनकारक राहील. संबंधित मंडळात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे त्या दिवशी संबंधित विभागाचे अधिकारी या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच या शिबीरा दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून जालना जिल्ह्यात एकूण 65 ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” आयोजित करण्यात येणार असून मंडळ स्तरावर या शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक शिबिरात महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, सामाजिक न्याय, कृषी, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जांची तात्काळ दखल घेतील. 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत मंडळ व नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर राबविण्यात येणार असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांचे महसूल विषयक प्रश्न तात्काळ निकाली काढणे हा प्रमुख उद्देश आहे. प्रत्येक तालुक्यात एकदिवसीय समाधान शिबिरे आयोजित करून प्रलंबित फेरफार, 7/12 दुरुस्ती, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे यांसारख्या सेवा ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ तत्त्वावर देण्यात येणार आहेत.अभियानाच्या पूर्वतयारीत गावनिहाय प्रलंबित प्रकरणांची यादी तयार करून शिबिरापूर्वी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. ७/१२ व ८अ उताऱ्यांचे अद्ययावतीकरण, डिजिटल ७/१२ ची जनजागृती, तसेच एकवेळच्या अधिमूल्य भरणा पद्धतीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करावे. तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणे, संपादन व अकृषी परवानगी नोंदींची अद्ययावत माहिती शिबिरात उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच ‘एक खिडकी व्यवस्था’ प्रभावीपणे राबवून सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहतील .शिबिरांची व्यापक प्रसिद्धी करून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी सोशल मीडिया, स्थानिक माध्यमे व दवंडीचा वापर करण्यात येणार आहे. *अभियानातंर्गत शिबीरांची पूर्व तयारी करण्यासाठीच्या मार्गदर्शक सुचना :* अ) शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग २ जमिनी भोगवटदार वर्ग १ मध्ये परावर्तित करण्यात आल्या किंवा नाहीत याची तपासणी मंडळ स्तरावर करणे व अशा काही जमिनी वर्ग १ मध्ये परावर्तित करणे बाकी असल्यास त्याबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुर्वतयारीच्या कालावधीत प्रक्रिया पुर्ण करावी व अद्यावत नोंदीसह ७/१२ लाभार्थ्यांना वितरीत करावे. ब) जिवंत ७/१२ मोहिमेअंतर्गत यापुर्वीच शासनामार्फत सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व गावा मध्ये ७/१२ वाचन पूर्ण करून प्रलंबीत नोंदीच्या याद्या तयार कराव्या व त्याअनुषंगाने दुरूस्तीबाबत कार्यवाही शिबीरापुर्वी पुर्ण करून घेणे. शिबीरात अद्यावत अभिलेख अर्जदारांना उपलब्ध करून द्याव्या. क) सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज शिबीरापुर्वी भरून घेणे व समितीच्या बैठकीचे आयोजन करून लाभ मंजुर करून घ्यावे व शिबीरात मंजुरी आदेशाचे वितरण करावे. ड) तुकडेबंदी कायद्याविरूध्द दिनांक १५.११.१९६५ ते १५.१०.२०२४ पर्यंत प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमीनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतरण बाबत गावनिहाय यादी तयार करावी. इ) नोंदणीकृत दस्ताचे आधारे रद्द झालेली, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लघंनामुळे ७/१२ मधील इतर अधिकारातील खरेदीदारांचे नाव, इतर अधिकारात नोंदविलेले शेरे, तसेच नव्याने प्राप्त अर्जाविषयी फेरफार घेणे. अनोंदणीकृत व्यवहाराविषयी गाव निहाय माहिती गोळा करून नोंदणीकरीता नोंदणी विभागाकडे पाठविणे. ७/१२ अद्यावत करून शिबीराच्या दिवशी अद्यावत ७/१२ चे वाटप करावे ई) मंडळ स्तरावरील सर्व शाळांचा आढावा घेऊन दाखले वाटप न झालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करणे. शाळेमध्ये Camp Mode वर विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरून घेणे. शिबीराच्या दिवशी दाखल्यांचे वाटप करावे. उ) उपविभागीय स्तरीय समितीने शासन निर्णय क्र.लवेसू२०२५/प्र.क्र.०२/पाणंद रस्ते, दिनांक १४/१२/२०२५ नुसार शिर्बीर आयोजित करावायाच्या मंडळातील पाणंद रस्त्यांची प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतला उपलब्ध करुन द्यावे. ऊ) मंडळातील सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वाटपासाठी बाकी राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करणे. तसेच संबंधीत शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुर्वतयारीच्या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करावी व शिबीरात पट्टे वाटप करावे.

*समाधान शिबीर - प्रमुख वैशिष्ट्ये* *शिबीर स्थळी मिळणार १५ पेक्षा जास्त महसुली सेवा* * प्रलंबित फेरफार * ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती *डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उता-यांचे वाटप *उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र * नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र * अकृषिक (NA) परवानगी * अकृषिक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा * नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती * सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे * विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप * तुकडेबंदी कायद्यांच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा * घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज * अॅग्रीस्टॅक आणि पी. एम. किसान नोंदणी * भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्यावत केली जाणार *अभियानाची विशेष उद्दिष्टे* * दिव्यांग व्यक्तिंना कृत्रीम अवयव वाटप * शासन मंजूर घरकुल लाभार्थीना प्रत्येकी ५ ब्रास वाळु वाटप * एकल महिलांना सर्व लाभ एका ठिकाणी देणे. * असंघटीत कामगारासाठी विशेष आरोग्य शिबीर * कृषी विभाग विविध योजना माहिती व प्रधानमंत्री माती परीक्षण योजना शिबीर * आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड बाबत मार्गदर्शन करणे

*जिल्हातील शिबीरांचे ठिकाण व दिनांक :- 7 मार्च 2026 जालना- देवमूर्ती, बदनापूर- बावणे पांगरी, अंबड-जामखेड, घनसावंगी-कुंभार पिंपळगाव, परतुर- आष्टी, मंठा- पांगरी गोसावी, भोकरदन- राजुर, जाफ्राबाद-माहोरा 14 मार्च 2026- जालना- नेर, बदनापूर- रोषणगाव, अंबड-धनगर प्रिंप्री, घनसावंगी-राणी उंचेगाव, परतुर- श्रीष्टी, मंठा-तळणी, भोकरदन- जानेफळ दाभाडी, जाफ्राबाद-कोळेगाव . 22 मार्च 2026- जालना- सावंगी तलाव, अंबड- शहागड, घनसावंगी- रांजणी, भोकरदन- धावडा. 28 मार्च 2026- जालना-विरेगाव, बदनापूर-शेलगाव, अंबड- वडीगोद्री, भोकरदन- आव्हाना. 6 एप्रिल 2026- जालना- रामनगर, भोकरदन- पिंपळगाव रेणुकाई 10 एप्रिल 2026 जालना- वाघ्रुळ जहागीर, बदनापूर- चिखली, अंबड-ताड हदगाव, घनसावंगी-पानेवाडी, परतुर- वाटुर, मंठा-ढोकसाळ, भोकरदन- केदारखेडा, जाफ्राबाद- टेंभुर्णी 17 एप्रिल 2026- जालना- पाचन वडगाव, बदनापूर- दाभाडी, अंबड-गोंदी, घनसावंगी-अंतरवाली टेंभी, परतुर- सातोना खुर्द, मंठा- माळतोंडी, भोकरदन- हसनाबाद, जाफ्राबाद-वरुड बुद्रुक. 24 एप्रिल 2026- जालना-सेवली, बदनापूर- बदनापूर ग्रामीण, अंबड-सुखापुरी, घनसावंगी-जांब समर्थ,परतुर- परतुर ग्रामीण, मंठा- जयपूर, भोकरदन- दानापूर, जाफ्राबाद- कुंभारझरी. 2 मे 2026- जालना- गोलापांगरी, अंबड- रोहिलागड, परतुर-कोकाटे हदगाव, मंठा- मंठा शहर, भोकरदन- सिपोरा बाजार. 8 मे 2026- जालना मनपा, बदनापूर नगर पंचायत, नगर परिषद अंबड, नगर पंचायत तिर्थपुरी,नगर परिषद परतुर, नगर पंचायत मंठा, नगर परिषद भोकरदन, नगर पंचायत जाफ्राबाद. 15 मे 2026- नगर पंचायत घनसावंगी, भोकरदन- आन्वा जिल्हातील सर्व नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

-*-*-*-*-

जानकी महोत्सव -2026 व मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन; नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन

 


जालना, दि. 6 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण स्वयं सहाय्यता समूहांमार्फत तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनांच्या विक्रीस प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय जानकी महोत्सव – 2026 व मिनी सरस विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. 7 ते 11 मार्च 2026 या कालावधीत डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूल, आझाद मैदान समोर, जालना येथे भरविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी परिवारासह भेट देवून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटातील महिलांची उत्पादीत उत्पादने व खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या गुणवत्तापूर्ण व घरगुती उत्पादनांचे एकूण 80 स्टॉल्स उभारण्यात येणार असून, नागरिकांना ग्रामीण भागातील दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या स्टॉल्समध्ये गावठी पद्धतीने तयार केलेले मसाले, हळद, मिरची पावडर, पापड, खारोडी, धपाटे पीठ, ढोकळा पीठ, विविध डाळी, बाटी पीठ, विविध फरसाण, गावठी तूप, अॅपल जॅम, मध, गोड पदार्थ, घोंगडी, योगा मॅट, पत्रावळी, लाकडी खेळणी आदी विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील अस्सल चविष्ट शाकाहारी व मांसाहारी जेवण, तसेच दहीधपाटे, झुणका-भाकर, भरीत-भाकरी, मिसळ, वडापाव अशा विविध खाद्यपदार्थांची चवही नागरिकांना चाखता येणार आहे. ग्रामीण महिला बचत गटांनी तयार केलेल्या या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी जालना जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदी करावी व महिलांच्या उद्यमशीलतेला पाठबळ द्यावे, असे आवाहन प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

Thursday, 5 March 2026

सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांचा दौरा जालना, दि.5 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि.8 मार्च 2026 रोजी नागपूर येथून जालना येथे सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन व राखीव. सोमवार दि.9 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत सफाई कर्मचारी संघटनेसोबत बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध कर णे व त्यांचे पुर्नवसन करणेबाबतचा अधिनियम 2013ची अंमलबजावणीबाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारणासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतील. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत महानगरपालिका आयुक्त यांच्यासमवेत नॅशनल ॲक्शन फॉन मॅकनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टमची जालना जिल्ह्यातील अंमलबजावणी तसेच मा. उच्च न्यायालयात दाखल ‍रिट याचिकानूसार लाड पागे समितीच्या शिफारसीप्रमाणे प्रलंबित प्रकरणे व त्याबाबत कर ण्यात आलेली कारवाई, सफा ई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजनाबाबचा आढावा घेतील. त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन. दुपारी 4 नंतर शासकीय विश्रामगृह जालन येथे राखीव. -*-*-*-*-

 

सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष

शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांचा दौरा

 

जालना, दि.5 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि.8 मार्च 2026 रोजी नागपूर येथून जालना येथे सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन व राखीव.

सोमवार दि.9 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत सफाई कर्मचारी संघटनेसोबत बैठकीस उपस्थिती.  दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात हाताने मैला उचलणाऱ्या   सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध कर णे व त्यांचे पुर्नवसन करणेबाबतचा अधिनियम 2013ची अंमलबजावणीबाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारणासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतील.   दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत महानगरपालिका आयुक्त यांच्यासमवेत नॅशनल ॲक्शन फॉन मॅकनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टमची जालना जिल्ह्यातील अंमलबजावणी तसेच मा. उच्च न्यायालयात दाखल ‍रिट याचिकानूसार लाड पागे समितीच्या शिफारसीप्रमाणे प्रलंबित प्रकरणे व त्याबाबत कर ण्यात आलेली कारवाई, सफा ई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजनाबाबचा आढावा घेतील. त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन. दुपारी 4 नंतर शासकीय विश्रामगृह जालन येथे राखीव.

-*-*-*-*-

समाज कल्याणच्या पुरस्कारासाठी अर्ज करावेत जालना, दि.5 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवकांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. सन 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षांतील पुरस्कारांसाठी इच्छुक पात्र संस्था तसेच उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जालना समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजू एडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. समाजकल्याण क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि वैयक्तिक स्तरावर उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यामध्ये सहभागी होऊ शकतात. दोन्ही वर्षांच्या (2024-25 व 2025-26) पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी कामाची गणना 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील कामगिरीवर आधारित असेल. वर्षासाठी आणि ज्या विशिष्ट पुरस्कारासाठी अर्ज केला जात आहे, त्या पुरस्कारासाठी शासनाने विहित केलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. -*-*-*-*-

 

समाज कल्याणच्या पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 

जालना, दि.5 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवकांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. सन 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षांतील पुरस्कारांसाठी इच्छुक पात्र संस्था तसेच उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जालना समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजू एडके  यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

समाजकल्याण क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि वैयक्तिक स्तरावर उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यामध्ये सहभागी होऊ शकतात. दोन्ही वर्षांच्या (2024-25 व 2025-26) पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी कामाची गणना 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील कामगिरीवर आधारित असेल. वर्षासाठी आणि ज्या विशिष्ट पुरस्कारासाठी अर्ज केला जात आहे, त्या पुरस्कारासाठी शासनाने विहित केलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

-*-*-*-*-

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जालना, दि.5 (जिमाका) :- आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जालना जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. या अफवेमुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, जालना जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. अतिरिक्त इंधन साठा करण्याची कोणतीही गरज नसून नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप कंपन्यांच्या विक्री अधिकारी आणि प्रतिनिधींना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इंधन तुटवड्याबाबत चुकीची माहिती किंवा अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनाधिकृत माहितीवर विश्वास न ठेवता, अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

 

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा;

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

जालना, दि.5 (जिमाका) :- आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जालना जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. या अफवेमुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, जालना जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. अतिरिक्त इंधन साठा करण्याची कोणतीही गरज नसून नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप कंपन्यांच्या विक्री अधिकारी आणि प्रतिनिधींना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  इंधन तुटवड्याबाबत चुकीची माहिती  किंवा  अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनाधिकृत माहितीवर विश्वास न ठेवता, अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथाचा हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ

 


• जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रसिध्दी मोहिमेची सुरुवात

 

जालना,दि.5(जिमाका): जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांची तसेच जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय जालना यांच्या वतीने आयोजित डिजिटल चित्ररथाला आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार-प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रचार-प्रसिध्दी करणार असुन, यामुळे नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळणार असुन, या योजनांचा लाभ घेण्यास देखील मदत होणार आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ते योजना, पीएम सुर्यघर मुफ्त बीजली योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, बालविवाह प्रतिबंध कायदा:2006, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या योजनांचा समावेश आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जातीतील लाभार्थींना शेळ्या/मेढ्यांचे गट व दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, सौर उर्जा संयंत्र बसविणे, ग्रामीण भागातील महिलांना विविध साहित्य पुरविणे या योजनांचा समावेश आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (नवीन विहिर व जुनी विहिर दुरुस्ती), अनुसूचित जातीतील लाभार्थींना शेळ्या मेढ्यांचे गट व दुभत्या जनवरांच्या गटाचा पुरवठा करणे, रमाई आवास योजना (शहरी व ग्रामीण) आणि अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींकरीता तालुकास्तरावर 100 शासकीय निवासी शाळा या योजनांवर आधारित भित्तीपत्रिकांचे देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच या डिजिटल चित्ररथाद्वारे जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांनी तयार केलेल्या बालविवाह मुक्त जालना, वन स्टॉप सखी सेंटर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना आणि अनुसूचित जातीतील नागरिकांसाठी गटई स्टॉल योजना या योजनावर आधारित लघु माहितीपट देखील दाखवून प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ, लघु माहितीपट आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सूचित कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता पवार, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ निरिक्षक गणेश अंभोरे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, साक्षी उगले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, संरक्षण अधिकारी श्री. कुलकर्णी, संतोष मुसळे, उपसंपादक (अ.का.) मिलिंद तुपसमिंद्रे, श्रीमती पुष्पा धनाईत, प्रतिभा इंगळे, विष्णु जायभाये, संतोष पाखरे, महिला बाल विकास विभाग आणि सखी वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती.                  

                            *****