Wednesday, 15 July 2026

विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात जालना जिल्ह्याचा राज्यात ठसा • मतदार यादीतील मॅपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात जालना जिल्ह्याचा राज्यात ठसा • मतदार यादीतील मॅपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात जालना जिल्ह्याचा राज्यात ठसा • मतदार यादीतील मॅपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात जालना जिल्ह्याचा राज्यात ठसा • मतदार यादीतील मॅपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात जालना जिल्ह्याचा राज्यात ठसा • मतदार यादीतील मॅपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

 





जालना, दि. 15 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत सन 2002 पूर्वीच्या मतदार यादीतील मतदारांची नावे सध्याच्या मतदार यादीशी मॅपिंग करण्याचे काम पूर्ण झाले असून, जालना जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व त्यांच्या पथकांचा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

भारत निवडणूक आयोगाने 14 मे 2026 रोजी जाहीर केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार महाराष्ट्रासह 16 राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमानुसार 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटी देऊन मतदारांना गणना प्रपत्र (Enumeration Form) वाटप, अर्ज भरण्यास सहाय्य व डिजिटायझेशनची प्रक्रिया राबवत आहेत.

जालना जिल्ह्यात 16 लाख 82 हजार 723 मतदार असून आतापर्यंत 13 लाख 54 हजार 924 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून त्याची टक्केवारी 80.52 आहे. यामध्ये 99-परतूर मतदार संघात 3 लाख 30 हजार 377 मतदारापैकी 2 लाख 87 हजार 310 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 86.96 आहे. 100-घनसांगवी मतदारसंघात 3 लाख 28 हजार 606 मतदारापैकी 2 लाख 99 हजार 535 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 91.15 आहे. 101-जालना विधानसभा मतदारसंघात 3 लाख 58 हजार 637 मतदारापैकी 2 लाख 3 हजार 398 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 56.71 आहे. 102-बदनापूर मतदारसंघात 3 लाख 38 हजार 936 मतदारापैकी 2 लाख 86 हजार 409 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 84.50 आहे. 103-भोकरदन मतदारसंघात 3 लाख 26 हजार 167 मतदारापैकी 2 लाख 78 हजार 272 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 85.32 आहे.

अभियानाच्या अनुषंगाने 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आला असून, 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील, तर अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार मॅपिंगचे काम प्रभावीपणे पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा आज सत्कार करण्यात आला. या अभियानात परतूर, घनसावंगी, जालना, बदनापूर आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंना गौरविण्यात आले. या सत्कारमूर्तीमध्ये शरद मुंढे, सुनिल गवई, श्रीमती कालिंदा दवंडे, श्रीराम बहीर, मुकेश गाडेकर, बी. आर. वाघमारे, रमेश मान्टे, श्रीमती शिवगंगा बारगाजे, दिपक मोहिते, शिवाजी ठाकूर, ए. पी. इंगळे या बीएलओंचा समावेश आहे.

मतदार यादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने विशेष सखोल पुनरीक्षण अभियान अत्यंत महत्त्वाचे असून, नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 

जालना, दि.15 (जिमाका):  राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे शनिवार, दि. 18 जुलै, 2026 रोजी दुपारी 1.50 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. दुपारी 2.00 वाजता जालना जिल्हा वार्षिक नियोजन समिती व विविध शासकीय आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, जालना  सायंकाळी 5.15 वाजता  छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-*-

फळ पिक विमा योजना मृगबहार 2026 बहार मध्ये विक्रमी नोंदणी

 

जालना, दि.15 (जिमाका):  पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना अंतर्गत मृगबहार 2026 साठी विमा नोंदणी 27 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुरू झाली. गतवर्षी मृगबहार 2025 मध्ये या योजनेमधील एकूण विमा अर्ज संख्या 52 हजार 121 होती.

चालू वर्षी मृगबहार मध्ये द्राक्ष, पेरू, लिंबू ,सीताफळ ,मोसंबी ,संत्रा, डाळिंब, चिकू या पारंपारिक पिकांबरोबर अंजीर व हळद या नवीन पिकांचा समावेश पहिल्यांदा करण्यात आला. या पिकांसाठी असलेली प्रती हेक्टर विमा संरक्षित रक्कम पुढीलप्रमाणे आहे . द्राक्ष विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 3 लाख 80 हजार रुपये  शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 19 हजार रुपये प्रति हेक्टर, पेरु विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 70 हजार  रुपये शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 3 हजार 500 रुपये प्रति हेक्टर,  लिंबू विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 80 हजार शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 4 हजार रुपये प्रति हेक्टर, सीताफळ विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 70 हजार शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 3 हजार  500रुपये प्रति हेक्टर,मोसंबी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 1 लाख रुपये  शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 5 हजार रुपये प्रति हेक्टर, संत्रा विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 1 लाख रुपये  शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 5 हजार रुपये प्रति हेक्टर, डाळिंब विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 1 लाख 60 हजार रुपये  शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 8 हजार रुपये प्रति हेक्टर, चिकू  विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 70 हजार रुपये  शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 3 हजार 500 रुपये प्रति हेक्टर,अंजीर विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 1 लाख 60 हजार रुपये  शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 8 हजार रुपये प्रति हेक्टर, हळद विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 1 लाख  80 हजार रुपये  शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 9 हजार रुपये प्रति हेक्टर,

या योजनेत अंजीर व सीताफळ या पिकासाठी विमा योजनेत सहभागाचा अंतिम दिनांक 31 जुलै आहे. तर उर्वरित सर्व पिकांसाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक 14 जुलै 2026 पर्यंत होता. यामध्ये 14 जुलै 2026 पर्यंत 81 हजार 523 विमा अर्जांची नोंदणी झाली. गतवर्षीच्या तुलनेत 29 हजार 402 विमा अर्ज वाढले असून ते  गतवर्षीच्या तुलनेत 156 टक्के आहेत.

यात प्रामुख्याने हळद पिकासाठी सर्वाधिक 41 हजार 595 विमा अर्ज असून त्या खालोखाल संत्रा – 10 हजार 237, डाळिंब – 8 हजार 63 अर्ज आहेत. जिल्हा निहाय सहभाग पाहिला असता सर्वाधिक सहभाग नांदेड 13 हजार 875  असून त्या खालोखाल परभणी-12 हजार 162 हिंगोली-11 हजार 910  व अहिल्यानगर-11 हजार 35 असा  आहे.हळद पिकासाठी लागू केलेल्या विमा योजनेस परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात अभूतपूर्व  प्रतिसाद मिळाला आहे. अंजीर व सीताफळ या पिकासाठी अद्याप 31 जुलै पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्याचबरोबर बँके मार्फत सादर होणाऱ्या अर्जांमुळे या संख्येत वाढ होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी या फळपीक विमा योजनेस अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. योजनेतील सर्व सहभाग हा  NCIP या online पोर्टल च्या माध्यमातून होतो.  योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकरी यांनी digitalcropsurvey न चुकता करावा , जेणेकरून त्यांचा विमा अर्ज अपात्र होणार नाही . अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा अभ्यास करून विमा योजनेत सहभाग घेणेबाबत निर्णय घ्यावा .  

अमृतची लाभदायी योजना व्यवसाय कर्जावरील व्याज परतावा

 


 

जालना, दि.15 (जिमाका):   महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येणारी वैयक्तिक व्याज परतावा योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींना उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी प्रभावी आर्थिक आधार देत आहे.या योजनेचा लाभ खुल्या प्रवर्गातील अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींना मिळतो, ज्यांना शासनाच्या कोणत्याही स्वतंत्र विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही.

स्वतःचा उद्योग, व्यवसाय किंवा सेवा उपक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल उभारणीसाठी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत कमाल 15 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर जास्तीत जास्त 12 टक्के दराने दोन वर्षांचा व्याज परतावा दिला जातो. या योजनेमुळे उद्योजकांचा आर्थिक भार कमी होऊन स्वयंरोजगाराला चालना मिळत असून, नवउद्योजकांना व्यवसाय अधिक सक्षमपणे उभारण्याची संधी उपलब्ध होत आहे.

आवश्यक कागदपत्रे - आधार कार्ड,  पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) / शाळा निर्गम प्रमाणपत्र / जातीचा सक्षम कागदोपत्री पुरावा, वार्षिक उत्पन्नाचा दाखला (रु. 8 लाखांपेक्षा कमी) , अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)संपर्क: अमृत जिल्हा कार्यालय,  दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना  मो.7391065474 जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  केले आहे.

-*-*-*-*-*-

 

Tuesday, 14 July 2026

आरोग्याच्या निर्देशांकामध्ये सुधारणा करा अन्यथा कार्यवाही होणार -----जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 




जालना, दि.14 (जिमाका): जिल्हास्तरीय कृतीदल समितीची सभा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. नियमित लसीकरण, गोवर रुबेला निर्मुलन, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम (एनक्युएएस), एच.पी.व्ही. लसीकरण, इत्यादी बाबत आढावा घेतांना काही निर्देशांकामध्ये काम कमी असल्याचे निदर्शनास आले तेव्हा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी स्पष्ट निर्देश दिले की, आरोग्याच्या निर्देशांकामध्ये सुधारणा, गुणात्मक काम करा अन्यथा सक्त कार्यवाही करण्यात येईल.

एच.पी.व्ही. लसीकरण जिल्ह्यात अत्यंत कमी असुन ते वाढविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ. कृष्णकांत कनवारिया यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक यांना दिले. एच.पी.व्ही. लसीकरण वाढविण्यासाठी शाळांना भेटी देवुन पालकांचे समुपदेशन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाचा संपुर्ण आढावा व मार्गदर्शन सहाय्यक संचालक, आ.से. कुष्ठरोग डॉ. सुधाकर शेळके यांनी घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी पल्स पोलिओ, एच.पी.व्ही. लसीकरण, गोवर व रुबेला दुरीकरण मोहिम विषयी माहिती दिली.

 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनांचा आढावा घेऊन सांगितले की, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनांचा लाभ रुग्णांना द्यावा. तसेच त्यांनी जन्म व मृत्यूचा आढावाही घेतला. रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देवुन रेफर करणे शक्यतो टाळावे. आपल्या आरोग्य संस्था नियमित स्वच्छ असाव्यात. तालुका आरोग्य अधिकारी यांनी आपल्या पी.एच.सी.ला नियमित भेटी देऊन सर्व आरोग्य उपक्रमांचा आढावा घेऊन स्वच्छता पाहणी करण्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. जयश्री भुसारे जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ. राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी विनय पवार, कौशल पाटील, प्रगती इंगवले, लायन्स क्लबचे डॉ. गिरीश पाकणीकर, आरोग्य अधिकारी डॉ. एस. झेड गवारे व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. जगदीश बनसोडे, डॉ. श्रीकांत देसाई डॉ. एन.जी.पवार, वैद्यकिय अधिक्षक, तालुका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

इंडियास्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 साठी पात्र युवक-युवतींना नोंदणी करण्याचे आवाहन

 


जालना, दि.14 (जिमाका): राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 या देशातील सर्वात प्रतिष्ठित कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, विविध सेक्टर स्किल कान्सिल तसेच औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावर निवड होण्याची तसेच जागतिक स्तरावरील वर्ल्डस्किल कॉम्पिटिशन मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

            जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. ही स्पर्धा व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टतेच्या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. 23 वर्षांखालील युवक-युवतींना कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखीच असते, हे विविध कौशल्य क्षेत्रांमध्ये आपले ज्ञान, गुणवत्ता व प्राविण्य सिद्ध करण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ आहे.

            इंडियास्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 करिता वयोमर्यादा हा एकमेव पात्रतेचा निकष असून 56 कौशल्य क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2003 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच सायबर सिक्योरिटी, इंडस्ट्री 4.0, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट सिस्टम इंटेग्रशन या टिम स्किल गटातील स्पर्धांसाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2003 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच ऑटोनॉमस मोबाईल रोबोटिक्स, काँक्रीट कन्स्ट्रक्शन वर्क आणि लँडस्केप गार्डनिंग या टिम स्किल गटातील स्पर्धांसाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2006 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.

            जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कौशल्य प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, पॉलिटेक्निक, उद्योग-आस्थापना तसेच संबंधित शैक्षणिक संस्थांनी पात्र युवक-युवतींमध्ये या स्पर्धेबाबत जनजागृती करून इंडियास्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 स्पर्धेसाठी इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गणेश चिमणकर  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


            जालना, दि.14 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून या योजनेसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून 60 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यासाठी जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमानुसार निवड मुख्यालय मुंबई यांच्याकडून उपलब्ध निधीच्या प्रमाणात केली जाते.

सदर योजनेचा अर्जकरीत असताना अर्जासोबत खालील प्रमाणे दिलेले कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्जदाराचा जातीचा दाखला सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा, अर्जदाराच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा. आधार कार्ड, राशन कार्ड झेरॉक्स प्रत, गुणपत्रक, दोन पासपोर्ट फोटो, बोनाफाईड/पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती.

अर्जदाराने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, तळमजला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येथे दि. 25 जुलै,2026 पर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एन. पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-