Tuesday, 3 February 2026

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न

 



 

जालना, दि.3 (जिमाका): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षेत संपन्न झाली.

बैठकीत जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की,  तंबाखूमुक्त तसेच आरोग्यसंपन्न समाजासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्यासोबतच विविध स्वंयसेवी संस्था, शाळा यांनी सक्रिय सहभाग घेवून प्रभावी जनजागृती करावी. शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करावी. तसेच तंबाखुमुक्त शाळा अभियान यशस्वीरीत्या पुर्ण करण्यासाठी तंबाखुमुक्त शैक्षणिक संस्था या मार्गदर्शक सुचनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शहरी आणि ग्रामिण भागात अवैधरित्या तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी, असे सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

बैठकीस अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्राथमिक संगिता भागवत, उपशिक्षणाधिकारी संजय कायंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन म्हस्के, महानगरपालीकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अतुल राजे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सल्लागार डॉ. संदिप गोरे, सायकॉलॉजीस्ट सोनाजी भुतेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा कोरडे व ग्रामीण विकास संस्थेचे विभागिय व्यवस्थापक मंगेश गायकवाड इ. सदस्य उपस्थित होते.  

-*-*-*-*-*-*-

प्रशिक्षण संस्थाना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.3 (जिमाका): जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजना अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2025-26 मध्ये प्रशिक्षण राबविण्यासाठी इच्छुक व पात्र प्रशिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. नॅशनलत स्कील डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (NSDC) यांचेकडील Skill India Digital Hub या पोर्टलवर सूचीबद्ध (Listed) असलेल्या प्रशिक्षण संस्था या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास पात्र राहणार आहेत.

प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक विहित नमुन्यातील परिशिष्टे तसेच मान्यता प्राप्त अभ्यासक्रमांची यादी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पात्र व इच्छुक प्रशिक्षण संस्थांनी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रं. ०२४८२-२९९०३३ वर कार्यालयीन वेळेत संपर्क करून विहित नमुन्यात परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव दि. 16 फेब्रुवारी, 20265पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.  

-*-*-*-*-*-*-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाच्या ऑफलाईन अर्जातील त्रुटी पुर्तता करण्यासाठी शेवटची संधी

 


जालना, दि.3 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार देय असलेली रक्कम विद्यार्थ्याच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाते. या योजनेसाठी संबधित लाभार्थ्याना त्रुटी पुर्तता करण्याबाबतचे पत्र संबधीत लाभार्थ्यांच्या मुळ पत्यावर पाठविण्यात आलेले आहे. तसेच यापूर्वी वेळोवेळी अंतीम संधी त्रुटीपुर्तता करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.

सन 2022-23 ते 2023-24 या आर्थीक वर्षातील विद्यार्थ्याना अंतीम संधी म्हणून दि. 10 फेब्रूवारी, 2026 पर्यतच्या मुदतीत आपल्या अर्जातील त्रुटी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जालना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सादर कराव्यात.

संबधित कालावधीतील लाभार्थी यांनी विहित मुदतीत त्रुटी पुर्तता सादर न केल्यास सदरील अर्ज नस्तीबदध् करण्यात येतील. व त्यानंतर सन 2022-23 ते 2023-24  या कालावधीतील कोणत्याही विद्यार्थ्याना त्रुटी पुर्ततेची संधी दिली जाणार नाही. तसेच कोणताही विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचीत राहिल्यास त्यास समाज कल्याण, जालना कार्यालय जबाबदार राहणार नाही.

त्याअनुषगांने सन 2022-23 ते 2023-24 वर्षामध्ये अर्ज सादर केलेल्या (फ्रेश व नुतनीकरण) ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यत त्रुटीची पुर्तता केलेली नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या संचीका नस्तीबध्दं करण्यात येतील यांची सर्व लाभार्थ्यानी नोंद घ्यावी. असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना राजु एडके यांनी केले आहे.   

-*-*-*-*-*-*-

 

बालकामगारांना कामावर ठेवू नये–जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 


 

जालना, दि.3 (जिमाका): जिल्ह्यात कोणत्याही आस्थापनांनी बालकामगारांना कामावर ठेवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहत दि. 30 रोजी संपन्न झालेल्या बालकामगार व वेठबिगार कृती दलाची बैठकीमध्ये जिल्हाधिकारी मित्तल बोलत होत्या. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यु.स. पडियाल यांच्यासह विविध विभागातील अधिकारी यांची उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालकामगार व वेठबिगार बाबत जन जागृती करण्याचे निर्देश दिले. तसेच 14 वर्षाच्या आतील बालकास कामावर ठेवणे व 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा असूनख् त्याबाबत 20 ते 50 हजार रु. दंड व 6 महिने ते 2 वर्ष शिक्षेची तरतुद आहे. बालकामगार कामावर ठेवल्याने बालकामगाराचे शारिरीक व मानसिक नुकसान होते. बालकामगारास अत्यंत वेदना होतात व शिक्षणाच्या वयात काम करावे लागल्याने त्यांचे संपूर्ण भविष्य उध्वस्त होते. त्यामुळे जालना जिल्ह्यात कोणत्याही आस्थापनेने, कारखान्याने अथवा हॉटेल, गॅरेज इ. चालकांनी बालकामगारांना कामावर ठेवू नये. कोणत्याही आस्थापनेवर बालकामगार काम करताना आढळून आल्यास त्या संबंधीत आस्थापना मालकाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही बालकामगारांना कामावर ठेवू नये. व बालकामगारांचे भविष्य वाचवावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.   

 

-*-*-*-*-*-*-

इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


 

जालना दि. 3 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी दि. 10 फेब्रुवारी 2026 ते दि. 18 मार्च 2026 या कालावधीत जिल्ह्यातील एकुण 79 परीक्षा केंद्रांवर तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी दि. 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत जिल्ह्यातील एकुण 102 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणर आहे.

 वरील परीक्षा केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होऊन परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नमुद परीक्षा उपकेंद्रांच्या 200 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागु करुन  प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशीत केले आहे.

या आदेशान्वये परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी आदेशात नमुद कालावधीत  सर्व सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी बुथ/फॅक्स/ झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश परीक्षेच्या दिवशी  सकाळी 8.00 वाजेपासुन सायंकाळी 8.00  वाजेपर्यंत अंमलात राहील.

-*-*-*-*-*-*

 

विशेष लेख जागतिक कर्करोग दिन : कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत रोगनिदान होणे आवश्यक

 



 

संपुर्ण जगामध्ये दरवर्षी 04 फेब्रुवारी रोजी ‘जागतिक कर्करोग दिन’ साजरा करण्यात येतो. कर्करोगाबाबत लवकर निदान होणे, प्रतिबंध करणे, उपचार व जीवनशैलीचा वापर इत्यादी विषयी जनजागृती करणे हे मुख्य उदिद्ष्ट आहेत. जागतिक कर्करोग दिनाचे प्राथमिक उदिद्ष्ट कर्करोगाचे प्रमाण व मृत्यू कमी करणे असुन, कर्करोगापासुन बचाव कसा करावा या बाबतची माहितीची जनजागृती करण्याचे उदिद्ष्ट आहे.    

असंसर्गजन्य आजारांची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे कर्करोगाबाबतची माहिती जनतेस मिळणे आवश्यक आहे.  कारण कर्करोग कोणालाही होवू शकतो.  जागतिक आरोग्य संघटनेनुसार कर्करोग हा दुसऱ्या क्रंमाकाचा सर्वात घातक आजार आहे.  अंतिम टप्प्यात असलेल्या कर्करोगामुळे मृत्यू होतो. कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची स्थिती भारतासाठी गंभीर आहे. कर्करोगामध्ये रोगांचा समुह असुन, त्यामध्ये असामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढुन शरीराच्या अवयवमध्ये पसरतात. ॲन्कोलॉजी (कर्करोगाचा अभ्यास) आणि कर्करोगावरील संशोधनासाठी प्रशिक्षण व शिक्षणासाठी सुविधा प्रदान करणे आवश्यक आहे.  ज्यामुळे कर्करोगामुळे होणारे मृत्यू टाळणे शक्य होईल.

कर्करागाच्या प्राथमिक अवस्थेत सतत अतिसार, अशक्तपणा, खोकला तोंडातुन रक्त येणे, स्तनातील गाठ, कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यात कमीत कमी किंवा कोणतेही लक्षणे आढळुन येत नाही. यासाठी मेमोग्राम, ओ.व्ही.ई., व्ही.आय.ऐ., सिटी स्कॅन, एम.आर.आय., सोनोग्राफी, बायोप्सी इ. तपासणीमुळे कर्करोग अंतिम टप्प्यामध्ये जाण्यापुर्वी कर्करोगाचे निदान होते. एच.पी.व्ही. (हयुमन पॅपिलोमाव्हायरस) लसींमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळता येतो. तसेच हिपॅटायटीस बी या लसीमुळे यकृतचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

आज कर्करोगामध्ये विविध उपचार उपलब्ध आहेत.  रुग्णांच्या शरीरामध्ये किंवा कोणत्या टप्प्यात आहे यावर उपचार पध्दती अवलंबुन आहे. कर्करोगाच्या उपचारामध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडियशन थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मानथेरपी इ. प्रकाराचा वापर केला जातो.

कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यात कमीत-कमी किंवा कोणतेही लक्षणे आढळुन येत नाही. याकरिता नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. कारण कर्करोग अंतिम टप्प्यात जाण्यापुर्वी कर्करोगाचे निदान होते. त्यामुळे पुढील मृत्यूचा धोका टळतो. लवकर निदान लवकर उपचारामुळे कमी खर्चात उपचार होतो. अर्थात उशीरा निदान झाल्यामुळे उपचार खर्चिक होतो. तसेच हॉस्पीटलमध्ये दीर्घकाळ ऑडमिट राहावे लागते.                                                                 

संतुलीत आहार, फळे, हिरवा पालेभाज्या इ. समावेश असावा. नियमित व्यायाम करणे. अतिनील किरणोत्सर्गाचा संपर्क टाळणे, प्रदुषण, तंबाखु व मद्यपानाचे सेवन करु नये.  रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्याकारणाने कर्करोगाचा धोका कमी होतो. निरोगी जीवनशैली असावी.

जालना जिल्ह्यात सन 2021 ते 2025 या कालावधीत मौखिक कर्करोगाच्या 75, 955 तपासणी करण्यात आल्यात यामध्ये  184 रोगनिदान झाले असुन, 173 औषधोपचाराखाली आहेत. तसेच स्तनाचा कर्करोगाच्या 39,432  तपासणी करण्यात आल्यात यामध्ये  142 रोगनिदान झाले असुन, 133 औषधोपचाराखाली आहेत. गर्भाशय मुखाचा कर्करोगाच्या 50,383 तपासणी करण्यात आल्यात यामध्ये  158 रोगनिदान झाले असुन, 141 औषधोपचाराखाली असल्याची माहिती जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी दिली. जिल्ह्यातील 30 वर्षावरील स्त्री / पुरुष  यांनी नियमित आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी टोल फ्रि क्रमांक 104 / 102 या हेल्पलाईनवर कॉल करावा.

-*-*-*-*-*-

Monday, 2 February 2026

मराठी साहित्य संमेलन 2026 करीता जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील शासकीय महिला अधिकारी यांना नांवे कळविण्याचे आवाहन • पहिले महिला शासकीय अधिकारी यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

 


जालना, दि.2(जिमाका) : महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंतीवर्षानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सरहद संस्था पुणे यांच्या वतीने व महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने दि. 7 व 8 मार्च, 2026 रोजी नवी दिल्ली येथे पहिले महिला शासकीय अधिकारी यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 आयोजित करण्यात येत आहे.

त्यानुसार जालना जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या प्रतिभाशाली शासकीय महिला अधिकारी यांनी त्यांची नावे संमेलनाचे प्रतिनिधी श्री. लेशपाल जवळगे  मो. ८४८४०५५२५२ यांना कळवावी असे अवाहन उपजिल्हाधिकारी  (सामान्य) नम्रता चाटे यांनी केले आहे.