Wednesday, 11 February 2026

शासकीय कार्यालयात 'विना हेल्मेट' प्रवेशाला बंदी; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे कडक आदेश

 


 

जालना, दि.11 (जिमाका) :- जालना जिल्ह्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यामध्ये होणारी प्राणहानी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज एका विशेष परिपत्रकाद्वारे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना दुचाकी चालवताना 'आय.एस.आय.' मार्क असलेले हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले आहे. तरी रस्ते सुरक्षेसाठी नागरिकांनी आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

जालना मुख्यालयातील सर्व शासकीय कार्यालयांच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे आता अनिवार्य असेल.  जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेट परिधान केलेल्या व्यक्तींनाच (कर्मचारी व अभ्यागत) प्रवेश दिला जाईल.  प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांमार्फत तपासणी केली जाईल. हेल्मेट नसलेल्या व्यक्तींना कार्यालय परिसरात वाहन लावण्यास सक्त मनाई असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागामार्फत मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

कार्यालय प्रमुखांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या नियमाची माहिती देऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी -कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी आजपासूनच लागू करण्यात आली आहे. प्रशासकीय शिस्त आणि रस्ते सुरक्षेसाठी मोटर वाहन अधिनियम 1988 मधील कलम 129 नुसार, दुचाकी चालक आणि पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट वापरणे कायदेशीररीत्या अनिवार्य आहे. प्रशासकीय स्तरावर याचा आदर्श निर्माण व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                    दि. 11 फेब्रुवारी, 2026

 

अंबड येथे 295 पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

जालना, दि.11 (जिमाका):- जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि महर्षी कणाद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि.13  फेब्रुवारी 2026 रोजी भव्य 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी केले आहे.

उमेदवारांनी सोबत बायोडाटा (5 प्रती), शैक्षणिक कागदपत्रे आणि आधारकार्डच्या छायांकित प्रती घेऊन उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून 'SPECIAL JOB FAIR- 5 (2025-26) JALNA' या पर्यायावर 'Apply' करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४८२-२९९०३३ वर संपर्क साधावा. या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ नोकरीच नाही, तर स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणाऱ्या विविध महामंडळांचे स्टॉल्स येथे लावले जाणार आहेत. रोजगार मेळाव्यात पाच नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन निवड करणार आहेत.  यामध्ये . लार्सन अँड टुब्रो ,पनवेल  120 पदे (बांधकाम क्षेत्रातील विविध पदे),  साई मॅनपावर (टोयोटा प्रा. लि.), जालना: 75 पदे,  भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि., जालना  60 पदे,  रिद्धी सिद्धी सर्विसेस, जालना: 20 पदे,  देवाश्व होंडा शोरूम, जालना 20 पदांचा  समावेश आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                    दि. 11 फेब्रुवारी, 2026

 

परळी वैजनाथ येथे महापशुधन एक्स्पो 2026 चे आयोजन

 

जालना, दि.11 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि. 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत परळी वैजनाथ (जि. बीड) येथे  'भारतीय पशुपक्षी महापशुधन एक्स्पो 2026' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अनोखा संगम ठरणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील पशुपालक, तरुण उद्योजक आणि शेतकरी बांधवांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपले ज्ञान व उत्पन्न वाढवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महापशुधन एक्स्पो 2026 या प्रदर्शनात राज्यातील व राज्याबाहेरील गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या आणि पक्ष्यांच्या विविध प्रजातींचे दर्शन घडणार आहे. तसेच आधुनिक डेअरी फार्मिंग, चारा नियोजन आणि प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स येथे असणार आहेत. तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून पशुधनाचे आरोग्य व वैज्ञानिक संगोपनावर विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे. या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान पाहता येईल. असे सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

वृत्त क्र.                                                                    दि. 11 फेब्रुवारी, 2026

 

18 फेब्रुवारीची पेंशन अदालत आता 27 फेब्रुवारीला

 

जालना दि. 11 (जिमाका) :- जालना जिल्हा परिषदेअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या पेंशन अदालतीच्या 18 फेब्रुवारीच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही अदालत शुक्रवार दि.27 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार अदालत आयोजित करण्यात आलेली आहे. तरी जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्तांनी आपल्या प्रलंबित प्रकरणाच्या संपूर्ण माहितीसह या अदालतीला दि.27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जालना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

वृत्त क्र.                                                                    दि. 11 फेब्रुवारी, 2026

सैनिक कल्याण विभागाची

14 मार्च रोजी ऑनलाईन परीक्षा

जालना, दि. 11 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग आणि त्याअंतर्गत असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या विभागातील 'लिपीक टंकलेखक' (गट-क) या संवर्गातील एकूण 72 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा टीसीएसमार्फत दि.14 मार्च 2026 रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                    दि. 11 फेब्रुवारी, 2026

 

 सोमवारी महिला लोकशाही दिन

 

जालना दि. 11 (जिमाका) :- महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, दि.16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11  ते 12 या वेळेत 'जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे' आयोजन करण्यात आले आहे.

ज्या महिलांना आपल्या तक्रारी किंवा प्रश्न मांडायचे आहेत, त्यांनी आपले अर्ज दोन प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत. महिलांनी प्रथम संबंधित तहसीलदार यांच्याकडे लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी तक्रार नोंदवावी. तालुका स्तरावर तक्रार केल्यानंतर एका महिन्याच्या आत कार्यवाही न झाल्यास, संबंधित महिला जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आपली तक्रार मांडू शकतात. तहसीलदार आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी तक्रारदारास एका महिन्याच्या आत अंतिम उत्तर देणे बंधनकारक आहे.

जिल्ह्यातील पिडीत महिलांनी आपल्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर तहसील कार्यालय आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                    दि. 11 फेब्रुवारी, 2026

 

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना;  

ई-केवायसीसाठी पोर्टल पुन्हा सुरू

 

जालना दि. 11 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतील ज्या लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्या आहेत, अशा महिलांसाठी सुधारणा करण्याची संधी दि.31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जातील त्रुटीची सुधारणा करुन या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांनी कुटुंबातील सदस्यांच्या नोकरीविषयक माहितीमध्ये नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला आहे. विशेषतः कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा स्थानिक संस्थेत नियमित/कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा कसे? तसेच कुटुंबातील सदस्य सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत किंवा कसे? या पर्यायांची निवड करताना झालेल्या चुकांमुळे पात्र महिलांना लाभ मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत.

-*-*-*-*-

 

 

 

सैनिक कल्याण विभागाची 14 मार्च रोजी ऑनलाईन परीक्षा

 


जालना, दि. 11 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग आणि त्याअंतर्गत असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या विभागातील 'लिपीक टंकलेखक' (गट-क) या संवर्गातील एकूण 72 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा टीसीएसमार्फत दि.14 मार्च 2026 रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                    दि. 11 जानेवारी, 2026

 

 सोमवारी महिला लोकशाही दिन

 

जालना दि. 11 (जिमाका) :- महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, दि.16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11  ते 12 या वेळेत 'जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे' आयोजन करण्यात आले आहे.

ज्या महिलांना आपल्या तक्रारी किंवा प्रश्न मांडायचे आहेत, त्यांनी आपले अर्ज दोन प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत. महिलांनी प्रथम संबंधित तहसीलदार यांच्याकडे लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी तक्रार नोंदवावी. तालुका स्तरावर तक्रार केल्यानंतर एका महिन्याच्या आत कार्यवाही न झाल्यास, संबंधित महिला जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आपली तक्रार मांडू शकतात. तहसीलदार आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी तक्रारदारास एका महिन्याच्या आत अंतिम उत्तर देणे बंधनकारक आहे.

जिल्ह्यातील पिडीत महिलांनी आपल्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर तहसील कार्यालय आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                    दि. 11 जानेवारी, 2026

 

 

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना;  

ई-केवायसीसाठी पोर्टल पुन्हा सुरू

 

जालना दि. 11 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतील ज्या लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्या आहेत, अशा महिलांसाठी सुधारणा करण्याची संधी दि.31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जातील त्रुटीची सुधारणा करुन या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांनी कुटुंबातील सदस्यांच्या नोकरीविषयक माहितीमध्ये नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला आहे. विशेषतः कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा स्थानिक संस्थेत नियमित/कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा कसे? तसेच कुटुंबातील सदस्य सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत किंवा कसे? या पर्यायांची निवड करताना झालेल्या चुकांमुळे पात्र महिलांना लाभ मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत.

-*-*-*-*-

 

Tuesday, 10 February 2026

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेफर इंटरनेट डे’ निमित्त विशेष कार्यशाळा संपन्न

 




जालना, दि.10 (जिमाका) : जिल्हा सूचना विज्ञान केंद्र (NIC) यांनी ‘सेफर इंटरनेट डे’ निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन, येथे आज इंटरनेटचा सुरक्षित व जबाबदारीने वापर याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. इंटरनेटचा सुरक्षित वापर, सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी तज्ञ  प्रा. संदिप काळे यांनी मार्गदर्शन केले.    

या कार्यशाळेचा मुख्य उद्देश शासकीय कामकाजात तसेच वैयक्तिक स्तरावर इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी आणि तांत्रिक बाबींबाबत माहिती देणे हा आहे.  सर्व  शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सूचना विज्ञान केंद्र यांनी केले आहे.

या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकरी शशिकांत हदगल, प्रा. संदीप काळे, जिल्हा सूचना विज्ञान केंद्राचे भूषण लोखंडे, रामेश्वर भोसले, दिपेंद्र जयस्वाल यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.  

-*-*-*-*-*-*-*-

Friday, 6 February 2026

अमृतच्या उ‌द्योगविषयक प्रशिक्षणाचे आयोजन; 9 फेब्रुवारीपासून होणार जालना येथे सुरुवात

 


 

जालना, दि. 6 (जिमाका) :- जिल्ह्यातील युवक-युवती व उ‌द्योजकांसाठी स्वयंरोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध करून देणारे उ‌द्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण, लघु उ‌द्योग प्रशिक्षण सोमवार दि.9  फेब्रुवारी 2026 पासून जालना येथे सुरू होत आहे. तरी जालना जिल्ह्यातील नवीन उ‌द्योग सुरु करू इच्छिणाऱ्या युवक-युवती व उ‌द्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणात नवीन व्यवसाय सुरू करणे तसेच चालू व्यवसायाचा विस्तार यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. उद्योग उभारणीच्या मूलभूत संकल्पना, योग्य व्यवसाय निवड, उत्पादन प्रक्रिया, खर्च नियंत्रण, नफा व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रेडिंग व ट्रेडमार्क नोंदणी यासह शासकीय योजनांचा उ‌द्योगासाठी प्रभावी वापर कसा करावा, याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

डिजीटल युगाची गरज लक्षात घेऊन प्रशिक्षणार्थीना 'अमृत पेठ' या ई-कॉमर्स विक्री माध्यमाची ओळख करून देण्यात येणार असून, त्याद्वारे जालना जिल्ह्यातील लघु उ‌द्योगांची उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्थानिक उ‌द्योगांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होऊन रोजगार निर्मितीस चालना मिळेल. अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना घेता येणार असून, वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले जालना जिल्ह्यातील पात्र नागरिक या प्रशिक्षणासाठी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी  महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे- 7391065474, जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी - 9421944752 यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                          दि. 6 फेब्रुवारी  2026

 

जिल्हा कारागृहात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न  

 

जालना, दि. 6 (जिमाका) :- जालना जिल्हा कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह बंदीची गुरुवार दि.5 फेब्रुवारी 2026 रोजी शिबिरात आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबीराचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील,डॉ.प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण 75 जणांची आरोग्य तपासणी करुन औषधी  वाटप करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर, कारागृह अधिक्षक प्रविण विभांडीत, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रज्ञा कुलकर्णी,  डॉ. ओम ढाकणे यांच्यासह कारागृहातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. असे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                          दि. 6 फेब्रुवारी  2026

 

18 फेब्रुवारी रोजी पेंशन अदालत

जालना दि. 6 (जिमाका) :- छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना उपायुक्त यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याबाबत निर्देश दिले आहेत.  त्यानूसार पेंशन अदालत दि.18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जालना जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे.

आपली प्रकरणे पेंशन अदालतीमध्ये ठेवण्यासाठी सेवानिवृत्तांनी प्रलंबित प्रश्न, अर्ज, पोस्टाने, ई-मेल किंवा हस्तपोच जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागात दि.12 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावेत. तरी पेंशन अदालतीसाठी सेवानिवृत्तांनी, कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांनी प्रकरणाच्या माहितीसह उपस्थित रहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

Thursday, 5 February 2026

जालना जिल्ह्यातील नागरिकांसाठी RBI कडून बँकिंग तक्रार निवारणाची सुविधा

 


जालना, दि.६(जिमाका): अलीकडील काळात जालना जिल्ह्यात बँकिंग व्यवहारांशी संबंधित तक्रारी, गैरसमज आणि काही अप्रिय घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना बँकिंग तक्रार निवारण व्यवस्थेबाबत स्पष्ट व अधिकृत माहिती मिळावी यासाठी जिल्हा अग्रणी बँकेकडून प्रसिद्धी करण्यात आली आहे.

बँकिंग व्यवहारांबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रथम संबंधित बँकेच्या अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणेकडे (Internal Grievance Redressal Mechanism) तक्रार दाखल करावी. प्रत्येक बँकेच्या शाखा परिसरात तसेच RBI बँकिंग ओम्बुड्समनबाबत तपशील ठळकपणे प्रदर्शित केलेले असतात.

तक्रार दाखल केल्यानंतर ३० दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास नागरिकांना थेट भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) एकात्मिक बँकिंग ओम्बुड्समन योजनेअंतर्गत तक्रार नोंदवता येते. यासाठी जिल्हा प्रशासन किंवा इतर शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.

RBI बँकिंग ओम्बुड्समन योजनेअंतर्गत एटीएम व्यवहार, खात्यातील चुकीची कपात, कर्ज व व्याजदर, चेक, डिजिटल फसवणूक, सेवा शुल्क, पेन्शन व विमा इत्यादी तक्रारींचे निवारण केले जाते. तसेच संबंधित यंत्रणेला दंडात्मक कारवाई करण्याचा आणि तक्रारदार ग्राहकांना नुकसानभरपाई देण्याचा अधिकार आहे.

नागरिक खालील माध्यमांतून तक्रार दाखल करू शकतात:

* RBI Complaint Management System (CMS) पोर्टल: https://cms.rbi.org.in,

* ई-मेल: crpc@rbi.org.in

RBI कडील तक्रार निवारण सेवा पूर्णतः मोफत, ऑनलाइन आणि पारदर्शक असून, तक्रारींचा पाठपुरावा देखील ऑनलाइन पद्धतीने करता येतो. नागरिकांनी अफवा, गैरसमज किंवा आंदोलनाचा मार्ग न अवलंबता उपलब्ध अधिकृत तक्रार निवारण यंत्रणांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केले आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 2026 कॉपीमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्याबाबत कडक निर्बंध •

   “शिक्षण ही राष्ट्रनिर्मितीची पायाभूत शक्ती असून, परीक्षा प्रक्रियेतील प्रामाणिकपणा हा त्याचा आत्मा आहे. कॉपीमुक्त परीक्षा हीच गुणवत्तेची खरी ओळख आहे.”



जालना, दि.5 (जिमाका): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी  ची परीक्षा एकुण 102 परीक्षा उपकेंद्रावर व इयत्ता 12 वीची परीक्षा एकुण 79 परीक्षा उपकेंद्रावर दि. 10 फेब्रुवारी, 2026 ते 18 मार्च, 2026 या कालावधीत जालना जिल्ह्यात पार पडणार आहेत. या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त, पारदर्शक व शांततेच्या वातावरणात पार पडाव्यात, यासाठी शासन व प्रशासनामार्फत कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

त्याअनुषंगाने, परीक्षा कालावधीत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163लागू करण्यात आले असून, परीक्षा केंद्रांच्या परिसरात जमावबंदी, अनधिकृत प्रवेश, गैरवर्तन तसेच शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही प्रकारास सक्त मनाई करण्यात आली आहे.

परीक्षा प्रक्रियेत कोणताही परीक्षार्थी, पालक, बाह्य व्यक्ती, खाजगी एजंट किंवा केंद्राशी संबंधित कर्मचारी जर कॉपी, नकल, मोबाईल फोनचा वापर, बनावट ओळखपत्र, प्रश्नपत्रिका फोडणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारात सहभागी आढळून आल्यास, त्यांच्यावर गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींविरोधात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 126 तसेच महाराष्ट्र सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) अधिनियम, 1982 चे कलम 7 अन्वये थेट गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आलेले आहेत.

परीक्षा काळात जालना जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर अत्याधुनिक सी.सी.टी.व्ही. कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, परिक्षा केंद्रातील प्रत्येक हॉल मध्ये सी.सी.टी.व्ही   बसविण्यात आलेले आहे. प्रत्ये्क परीक्षा केंद्र परीसरामध्ये   ड्रोनद्वारे टेहाळणी देखील करण्यात येणार आहे. प्रशासनामार्फत सर्व परीक्षा उपकेंद्रावर बैठे पथक व भरारी पथक नेमण्यात आलेले आहे. तसेच  पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, डिजिटल पाळत, अचानक तपासणी व तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. 

विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवा, आमिष किंवा दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, तसेच पालक व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा  दक्षता समीती अध्यक्ष आशिमा मित्तल यांनी केले आहे.



Tuesday, 3 February 2026

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न

 



 

जालना, दि.3 (जिमाका): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षेत संपन्न झाली.

बैठकीत जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की,  तंबाखूमुक्त तसेच आरोग्यसंपन्न समाजासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्यासोबतच विविध स्वंयसेवी संस्था, शाळा यांनी सक्रिय सहभाग घेवून प्रभावी जनजागृती करावी. शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करावी. तसेच तंबाखुमुक्त शाळा अभियान यशस्वीरीत्या पुर्ण करण्यासाठी तंबाखुमुक्त शैक्षणिक संस्था या मार्गदर्शक सुचनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शहरी आणि ग्रामिण भागात अवैधरित्या तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी, असे सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

बैठकीस अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्राथमिक संगिता भागवत, उपशिक्षणाधिकारी संजय कायंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन म्हस्के, महानगरपालीकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अतुल राजे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सल्लागार डॉ. संदिप गोरे, सायकॉलॉजीस्ट सोनाजी भुतेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा कोरडे व ग्रामीण विकास संस्थेचे विभागिय व्यवस्थापक मंगेश गायकवाड इ. सदस्य उपस्थित होते.  

-*-*-*-*-*-*-