Thursday, 16 July 2026

विशेष लेख शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय : कर्जमाफीच्या नव्या निकषांमुळे हजारो कुटुंबांना मिळणार नवी संजीवनी

 


 

राज्यातील शेती आजही पावसावर अवलंबून आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत पीक घेण्यासाठी घेतलेले कर्ज वेळेत फेडणे अनेकांना शक्य होत नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो.

याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 जाहीर केली आहे. मात्र सुरुवातीला काही निकषांमुळे अनेक पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.

राज्य शासनाने काय बदल केले ?

राज्य शासनाने आता कर्जमाफीचे निकष अधिक व्यापक केले आहेत. विशेष म्हणजे 2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या योजनेचा लाभ मिळणार आहे.

कोणाला मिळणार लाभ ?

नवीन आदेशानुसार खालील शेतकरी पात्र ठरणार आहेत.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना-2019 चा लाभ घेतलेले शेतकरी.

1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेले अल्पमुदत पीककर्ज.

पुनर्गठित किंवा रिफायनान्स केलेले पीककर्ज.

30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले कर्ज.

31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेले कर्ज.

सर्व बँकांमधील एकूण थकबाकी दोन लाख रुपयांपर्यंत असलेले शेतकरी.

किती मिळणार कर्जमाफ ?

योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. ही रक्कम मूळ कर्ज आणि व्याजासह असलेल्या थकबाकीवर लागू होईल.

OTS बाबतही दिलासा

पूर्वी एकरकमी समझोता (OTS) केलेल्या शेतकऱ्यांबाबत काही निर्बंध होते. शासनाने ते हटविल्याने अधिक शेतकरी योजनेच्या कक्षेत येणार आहेत.

 

प्रोत्साहनपर लाभाची अट रद्द

योजनेतील प्रोत्साहनपर लाभासाठी असलेली सन 2026-27 ची अटही शासनाने वगळली आहे. त्यामुळे लाभ मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

हा निर्णय का महत्त्वाचा ?

राज्यात अनेक शेतकरी 2019 मध्ये कर्जमाफी घेतल्यानंतरही सलग नैसर्गिक संकटांमुळे पुन्हा कर्जबाजारी झाले. अशा शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळणे अन्यायकारक असल्याची मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली होती. आता राज्य शासनाने त्यांची दखल घेत निकष बदलले आहेत.

शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल ?

या निर्णयामुळे हजारो नव्हे तर लाखो शेतकरी पुन्हा कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत. बँकांच्या थकबाकीचा ताण कमी होईल, नवीन पीककर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होईल आणि शेतीत नव्याने गुंतवणूक करण्याची संधी निर्माण होणार आहेत.

-*-*-*-*-*-

 

ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी नामांकनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


जालना, दि. 16 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार 2026 साठी नामांकने मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने ही पुरस्कार योजना सुरु केली आहे. यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे पुरस्कार योजनेत प्रथम, व्दितीय व तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येतात व काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. संकल्पनेतुन उद्योगाच्या वृध्दीसाठी व उदयोगाला चालना व गती देण्यासाठी सन 2023 पासून राज्यस्तरीय "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार" सुरु करून माध्यमातून प्रथम, व्दितीय व तृतीय, उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येत आहेत.

मंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहा-य घेवून यशस्थिपणे उद्योग उभारणी करून रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध केलेल्या मंडळाच्या यशस्वी उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व त्यांचा यथोचित सन्मान व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यस्तरीय ग्रामोद्योग भरारी पुरस्कार 2026 करिता अर्ज मागवण्यात येत आहेत.नामांकन अर्ज मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावर तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज दि.28 जुलै, 2026 पूर्वी जिल्हा कार्यालयात पाठवावेत अधिक माहितीसाठी संपर्क:- जिल्हा ग्रामोदयोग अधिकारी, जिल्हा कार्यालय  अशी माहिती  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे

-*-*-*-*-*-

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत जालना येथे पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, गाय/म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 


 

जालना, दि.16 (जिमाका):  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एमसीईडीद्वारे जालना येथे पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय गाय/ म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. 20 जुलै,2026  ते  25 जुलै, 2026 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

सुशिक्षित बेरोजागार युवक-युवती व महिलांनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करावा. हा या प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणामधून प्रशिक्षणार्थीना स्वयंरोजगाराबाबत उपलब्ध बंदीस्त शेळीपालनः शेळीपालनाची सद्य स्थिती, शेळ्यांच्या विविध जाती निवड, आदर्श गोठा, शेळ्याचे प्रमुख आजार व लक्षणे प्रतिबंधक उपाय व उपचार शेळ्याचे संतुलित आहार, गाभण शेळ्याचे व करड्याचे संगोपन इ. सखोल मार्गदर्शन या शिवाय उद्योजकता प्रशिक्षण ज्यामध्ये उद्योजकीय प्रेरणा व गुणसंपदा, कौशल्य विकास व स्वयं मुल्यांकन (मी कोण आहे) उद्योग उभारणी विविध टप्पे, आपल्या कामासाठी कुठे संपर्क करावा, उद्योग व्यवसायाची निवड, उद्योग संधी, उद्योग व्यवस्थापन, बाजार पेठ व्यवस्थापन, मार्केटिंग व संभाषण कौशल्य, विविध कार्यालय व महामंडळांच्या कर्ज विषयक माहिती, राष्ट्रीय कृत बँका नाबार्ड, यांचे कार्य व योजनांविषयी माहिती लघु उद्योग नोंदणी कर्ज व सादरीकरण व प्रक्रिया, उद्योग संदर्भात कायदे, शासकीय कर्ज योजनांची माहिती व सवलती इत्यादी बाबत तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.

  कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी हा किमान 7 वी वर्ग पास व 18  ते 50 वयोगटातील असावा तसेच स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची प्रबळ इच्छा असावी. तरी इच्छुकांनी प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी दि.20 जुलै,2026 पूर्वी,  कार्यक्रम समन्वयक वैशाली कुलकर्णी, मो.7350418492 संपर्क महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एमसीईडी) जिल्हा उद्योग केंद्र द्वारा-मराठा पार्क बिल्डिंग, विशाल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चौफुली, जालना. फोन.नं.02482-220592 येथे संपर्क करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, एमसीईडी विनोद तुपे, यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

मधकेंद्र योजनेतून उत्पन्नाची सुवर्णसंधी मधपेट्या, मधमाशी वसाहत, मधयंत्रांसाठी 50 टक्के अनुदान मधपाळांसाठी 10 दिवसांचे प्रशिक्षण

 


 

जालना, दि.16 (जिमाका):   मधपेट्या, मधमाशी वसाहत, मधयंत्रांसह 50 टक्के अनुदान; 10 दिवसांचे देणार प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणारी मधकेंद्र (मधमाशा पालन) योजना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उत्पन्न वाढविण्याची प्रभावी संधी ठरत आहे. दि. 18 जून 2019 च्या शासन निर्णयानुसार सुरू असलेल्या या योजनेचा उद्देश मधपाळांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे. या योजनेतंर्गत प्रशिक्षण, आवश्यक साहित्य, आर्थिक सहाय्य आणि तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जात असल्याची माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी दिली.

मधमाशी पालनातून मध व मेण विक्रीद्वारे चांगले उत्पन्न मिळते. तसेच मधमाश्यांच्या परागीभवनामुळे शेती पिकांच्या उत्पादनात्त 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होते. रॉयल जेली, प्रोपोलिस आणि मधमाशांचे विष यांसारख्या मूल्यवर्धित उत्पादनांची विक्रीही करता येते. कमी जागा आणि कमी भांडवलात सुरू करता येणारा हा व्यवसाय शेतीला पूरक ठरतो. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मधपेट्या, मधमाशी वसाहत, मधयंत्रे व आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. व्यवसायासाठी लागणाऱ्या खर्चापैकी 50 टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते, तर उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थ्याने भरायची असते. योजनेत तालुकास्तरावर एक दिवसीय जनजागृती शिबिरे आयोजित केली जाणार असून प्रत्येक शिबिरात 50 शेतकरी किंवा मधपाळ सहभागी होऊ शकतील. नवोदित मधपाळांसाठी 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण, तर प्रगतीशील मधपाळ व संस्थांच्या सदस्यांसाठी महाबळेश्वर येथे 20 दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. दोन्ही प्रशिक्षणांदरम्यान राहण्याची व जेवणाची सुविधा मधमाशी पालनामुळे शेती पिकांच्या उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ मंडळामार्फत मोफत उपलब्ध करून दिली जाईल. मात्र प्रशिक्षणापूर्वी लाभार्थ्याने स्वतःच्या वाट्याची 50 टक्के रक्कम जमा करणे आवश्यक आहे. याकरिता वैयक्तिक अर्जदार साक्षर, 18 वर्षांपेक्षा अधिक वयाचा असणे आवश्यक आहे. वतःची शेती असल्यास प्राधान्य दिले जाईल आणि 10 दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य आहे. प्रगतीशील मधपाळासाठी वय 21 वर्षांपेक्षा अधिक, किमान दहावी उत्तीर्ण व किमान एक एकर शेती असणे आवश्यक आहे. संस्था नोंदणीकृत असून किमान एक एकर जमीन व 500 चौ. फूट प्रशिक्षण इमारत असावी.

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, 7/12 व 8-अ उतारा (असल्यास), बैंक पासबुकची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तसेच विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागणार आहे.

या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जालना यांच्या माध्यमातून केली जात आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज सादर करण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी,महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,मराठा पार्क इमारत, दुसरा मजला, विशाल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर चौफुली, जालना-431203 दुरध्वनी.क्रं. 02482-220628येथे संपर्क साधावा, मधुक्षेत्रिक अमोल कायंदे 9834941956 तसेच dviojalna@mskvib.org या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

 

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याने जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहाचा उत्साहात समारोप

 

 

जालना, दि.16 (जिमाका):   जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा समारोप दि. 15 जुलै, 2026 रोजी बॅडमिंटन हॉल, पोलीस परेड ग्राउंड, जालना येथे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पोलिस अधीक्षक, तेघबीरसिंह संधू यांचे मार्गदर्शनाखाली "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा" उत्साहात संपन्न झाला.

जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहाची सुरुवात दि. 7 जुलै, 2026 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेच्या उद्घाटनाने झाली होती. संपूर्ण सप्ताहामध्ये रांगोळी स्पर्धा, मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण (सेल्फ डिफेन्स) प्रशिक्षण, उद्योजकांचा सन्मान, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांचा सन्मान, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत निवड झालेल्या युवक-युवतींना नियुक्तीपत्रांचे वितरण, नव उद्योजकांचा सन्मान, तसेच जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार (MoU) अशा विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

सप्ताहाच्या समारोपानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपआयुक्त, विद्या शितोळे, कौशल्य विकास, छत्रपती संभाजीनगर या होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक होते. यावेळी प्रमुख अतिथी सहायक आयुक्त, गणेश चिमणकर, कौशल्य विकास, जालना विभागस्तरीय रोजगार मेळावा समन्वय समिती सदस्य अविनाश यशवंत देशपांडे, जिल्हास्तरीय रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष, अनिल तलरेजा व समिती सदस्य, पंकज कासलीवाल, प्रगणेश केनिया, संजय मिसाळ, मनोहर खाकरे, राजेश भुतिया तसेच, पोलीस निरीक्षक, पंकज उदावंत, राखीव पोलीस निरीक्षक भाऊसाहेब वाघ, पोलीस उपनिरीक्षक, विलास पाटील, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या विविध उद्योग, कंपन्या, बँका व संस्थांच्या मुलाखत स्टॉलना भेट देऊन उमेदवारांशी संवाद साधला. त्यांनी निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. तसेच जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहादरम्यान आयोजित रांगोळी, निबंध, वक्तृत्व व इतर स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करून त्यांना सन्मानपत्रांचे वितरण करण्यात आले. "कौशल्य हीच यशाची खरी ओळख आहे. बदलत्या काळानुसार नवीन कौशल्ये आत्मसात करा, प्रत्येक संधीचे सोने करा आणि रोजगारासोबत उद्योजकतेच्याही दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करा. सक्षम, कौशल्यसंपन्न आणि स्वावलंबी युवा हीच विकसित भारताची खरी ताकद आहे." यावेळी त्यांनी युवकांना संदेश दिला.

रोजगार मेळाव्यामध्ये विविध शासकीय आस्थापना, उद्योग, कंपन्या, बँका तसेच इन्शुरन्स व फायनान्शिअल संस्थांनी सहभाग नोंदविला. मेळाव्यास 797 उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी 765 उमेदवारांनी मुलाखती दिल्या, तर 234 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता जाधव यांनी केले, तर डॉ. अमोल परिहार यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी कौशल्य विकास अधिकारी विशाल येवले तसेच अधिकारी व कर्मचारी अमोल बोरकर, नितीन लोकडे, प्रदीप डोळे, कैलास काळे, रवींद्र पाडमुख, विशाल जगरवाल, दीपक पालवे, गणेश सुपारकर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील संजय सोनवणे व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

Wednesday, 15 July 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना


 

विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात जालना जिल्ह्याचा राज्यात ठसा • मतदार यादीतील मॅपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात जालना जिल्ह्याचा राज्यात ठसा • मतदार यादीतील मॅपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात जालना जिल्ह्याचा राज्यात ठसा • मतदार यादीतील मॅपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात जालना जिल्ह्याचा राज्यात ठसा • मतदार यादीतील मॅपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात जालना जिल्ह्याचा राज्यात ठसा • मतदार यादीतील मॅपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

 





जालना, दि. 15 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत सन 2002 पूर्वीच्या मतदार यादीतील मतदारांची नावे सध्याच्या मतदार यादीशी मॅपिंग करण्याचे काम पूर्ण झाले असून, जालना जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व त्यांच्या पथकांचा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

भारत निवडणूक आयोगाने 14 मे 2026 रोजी जाहीर केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार महाराष्ट्रासह 16 राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमानुसार 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटी देऊन मतदारांना गणना प्रपत्र (Enumeration Form) वाटप, अर्ज भरण्यास सहाय्य व डिजिटायझेशनची प्रक्रिया राबवत आहेत.

जालना जिल्ह्यात 16 लाख 82 हजार 723 मतदार असून आतापर्यंत 13 लाख 54 हजार 924 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून त्याची टक्केवारी 80.52 आहे. यामध्ये 99-परतूर मतदार संघात 3 लाख 30 हजार 377 मतदारापैकी 2 लाख 87 हजार 310 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 86.96 आहे. 100-घनसांगवी मतदारसंघात 3 लाख 28 हजार 606 मतदारापैकी 2 लाख 99 हजार 535 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 91.15 आहे. 101-जालना विधानसभा मतदारसंघात 3 लाख 58 हजार 637 मतदारापैकी 2 लाख 3 हजार 398 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 56.71 आहे. 102-बदनापूर मतदारसंघात 3 लाख 38 हजार 936 मतदारापैकी 2 लाख 86 हजार 409 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 84.50 आहे. 103-भोकरदन मतदारसंघात 3 लाख 26 हजार 167 मतदारापैकी 2 लाख 78 हजार 272 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 85.32 आहे.

अभियानाच्या अनुषंगाने 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आला असून, 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील, तर अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार मॅपिंगचे काम प्रभावीपणे पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा आज सत्कार करण्यात आला. या अभियानात परतूर, घनसावंगी, जालना, बदनापूर आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंना गौरविण्यात आले. या सत्कारमूर्तीमध्ये शरद मुंढे, सुनिल गवई, श्रीमती कालिंदा दवंडे, श्रीराम बहीर, मुकेश गाडेकर, बी. आर. वाघमारे, रमेश मान्टे, श्रीमती शिवगंगा बारगाजे, दिपक मोहिते, शिवाजी ठाकूर, ए. पी. इंगळे या बीएलओंचा समावेश आहे.

मतदार यादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने विशेष सखोल पुनरीक्षण अभियान अत्यंत महत्त्वाचे असून, नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-