Thursday, 13 August 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जालना जिल्हा दौरा

 

 

जालना,दि.13 (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी जालना  जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छत्रपती संभाजीनगर येथून जालना येथे सकाळी 11.45 वाजता आगमन व रेशीम कोष बाजारपेठ, नवीन इमारत, सिरसरवाडी रोड, जालना येथील रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.10 वाजता एमआयडीसी फेस वन छत्रपती संभाजीनगर चौफुली-जालनाकडे प्रयाण करतील. दुपारी 12.15 वाजता एमआयडीसी फेस वन छत्रपती संभाजीनगर चौफुली-जालना येथे आगमन व भारतीय जनता पार्टी, जालना जिल्हा कार्यालयाच्या भूमीपूजन समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर 01.30 वाजता जालना येथुन छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


 

            जालना,दि.13 (जिमाका):  राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे प्रयाण करतील. सकाळी 10.00 वाजता आगमन व एमआयडीसी फेस वन छत्रपती संभाजीनगर चौफुली- जालना येथील भाजपा जिल्हा कार्यालय नवीन इमारत भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती राहतील. त्यानंतर  सकाळी 11.00 वाजता  रेशीम कोष बाजारपेठ, नवीन इमारत, सिरसरवाडी रोड, जालना येथे रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहतील. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, रांजणी,राणी उंचेगाव, पिंपरखेड बु. दुधना काळेगाव, हसनाबाद, शहागड, वाकुळणी येथील  सार्वजनिक आरोग्य  विभाग, जिल्हा परिष्ज्ञद, लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 1.00 वाजता जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. दुपारी 2.00 वाजता  महात्मा फुले चौक औंरगापुरा छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व मुख्यमंत्री महोदयांच्या हर घर तिरंगा अभियान रॅलीत सहभागी होतील. सायंकाळी 5.00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव.

            शनिवार, दि. 15 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथील  भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजीत शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 9.35 वाजता शासकीय वाहनाने परळी वैजनाथ जिल्हा बीडकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

 

जालना जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून ‘जलसंधारण सप्ताह’ 21 ऑगस्टला महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर; युवकांसाठी रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन स्पर्धा

 


 

जालना,दि.13(जिमाका) : मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यात 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत जलसंधारण सप्ताह, तर 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची आठवण म्हणून 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत असून, या उपक्रमांतून मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जलसंधारण सप्ताहाचा प्रमुख आकर्षण असलेल्या महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर चे आयोजन 21 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यात करण्यात येणार आहे. (Save Soil, Save Water, Secure Tomorrow) ही या उपक्रमाची संकल्पना असून, पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश देण्यात येणार आहे. या वॉकेथॉनमध्ये 15 वर्षे व त्यावरील पुरुष व महिला सहभागी होऊ शकतील. जास्तीत जास्त तीन किलोमीटर अंतराची ही वॉकेथॉन असून, सहभागींकडून मृद व जलसंधारणाची शपथही घेण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

वॉकेथॉनमध्ये लोकप्रतिनिधी, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, NCC, NSS, नेहरू युवा केंद्र, स्वयंसेवी संस्था, विविध क्रीडा व सामाजिक संघटना, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, खेळाडू, व्यापारी संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थिती, 6.15 वाजता वॉर्मअप, 6.45 वाजता मृद व जलसंधारणाची शपथ, 7 वाजता वॉकेथॉनचा प्रारंभ आणि 8 वाजता समारोप होणार आहे. प्रथम पाच विजेत्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

युवकांसाठी रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन स्पर्धा

जलसंधारण सप्ताहादरम्यान 15 ते 30 वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी 30 ते 60 सेकंदांची Instagram Reel तयार करून स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करायची असून, संबंधित अधिकृत Instagram Account ला Tag करणे तसेच #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे.

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, पारंपरिक जलसंधारण पद्धती तसेच नाविन्यपूर्ण जलसंवर्धन उपाय यांसारख्या विषयांवर रील तयार करता येणार आहे. Storytelling, Acting, Music, Dance, Animation, AI Creative, Comedy, Short Film, Before-After आणि Drone Visuals अशा विविध माध्यमांचा वापर करता येईल.

स्पर्धेचे परीक्षण विषय व संदेश, कल्पकता, सामाजिक संदेश, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता आणि Instagram Engagement या निकषांवर एकूण 100 गुणांमध्ये करण्यात येणार आहे. केवळ Likes किंवा Followersच्या आधारे विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement यांचा समतोल साधण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ या नावाने प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

शाळा-महाविद्यालयांत विविध उपक्रम

15 ऑगस्ट ते 26 जानेवारी दरम्यान जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला व पोस्टर, वाद-विवाद अशा स्पर्धांसह ‘एक शाळा–एक शोषखड्डा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देणे, जलमित्र किंवा जलदूत घोषित करणे, 21 ऑगस्ट रोजी सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करणे, मृद व जलसंधारणाची शपथ घेणे तसेच पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

अभियानाच्या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात मृद व जलसंधारणाच्या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण, अमृत सरोवरांना भेट, वृक्षारोपण, ‘एक पेड मां के नाम’ उपक्रम, लोकसहभागातून नाला, तलाव, विहीर व पाझर तलाव स्वच्छता तसेच शेततळे, शेतबंधारे, CCT व Deep CCT कामांची पाहणी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

एक रिल... मातीसाठी ! एक रिल... पाण्यासाठी! एक रिल... सुरक्षित भविष्यासाठी ! या संदेशातून युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रिल आणि वॉकेथॉनच्या नोंदणीकरीता https://register.mahaevent.co.in/ या लिंकचा वापर करण्यात आला आहे. जलसंधारण ही केवळ शासकीय जबाबदारी न राहता लोकचळवळ व्हावी, यासाठी जालना जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्व उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एन. पी. कटके यांनी केले आहे.

माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा; जलसमृद्ध महाराष्ट्र घडवा हा संदेश या अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

-*-*-*-*-*-*-

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत सीईटीच्या विद्यार्थ्यांना प्रलंबित अर्जामधील त्रुटीपूर्तता करण्याचे आवाहन

 


जालना,दि.13 (जिमाका) : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात राज्य सामाईक प्रवेश परिक्षेच्या आधारे आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विजा-अ, भज, इमाव, विमाप्र, एसईबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतून उर्तीण झालेल्या विद्यार्थ्याच्या अर्जाची पडताळणी करण्याची कार्यवाही जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या स्तरावर सुरु आहे. त्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी त्रुटी पूर्तता करणेसाठी विशेष मोहिम समिती कार्यालयामार्फत हाती घेण्यात आली आहे.

 

माहे जून 2025 ते जुलै 2026  या कालावधीत समितीकडे एकुण 14 हजार 520 अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी तब्बल 12 हजार 690 इतक्या मोठ्या संख्येने वैधता प्रमाणपत्रे निकाली काढण्यात आली असून ती ऑनलाईन स्वरुपात वितरित करण्यात आली आहेत. यात अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, एसईबीसी, विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्याचा व लाभार्थ्यांचा समावेश आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2026 पासून आजतागायत एकुण 4 हजार 300 लाभार्थ्यांना वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. वास्तविकतः जात वैधता प्रमाणपत्रासाठी कागदपत्रांची तपासणी ही अत्यंत वेळेची व गुंतागुंतीची प्रक्रिया असते. मात्र जालना समितीने ऑनलाईन व ऑफलाईन आलेल्या कागदपत्रांची अचूक तपासणी करुन ही प्रक्रिया गतिमान केली आहे. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास लाभार्थ्यांना तात्काळ कळविले जाते. लाभार्थ्यांनी त्रुटींची पूर्तता केल्यानंतर, प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन तो अंतिम मंजूरीसाठी समितीसमोर ठेवला जातो. समिती कागदपत्रांची कसून पडताळणी करुन प्रस्तावाला अंतिम मान्यता देते आणि त्यानुसार लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाते.

 

नवीन अर्ज दाखल करणारे किंवा ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत अशा अर्जदारांची फसवणूक व दिशाभूल करण्यासाठी समिती कार्यालयाच्या परिसरात किंवा बाहेर काही असामाजिक तत्व (दलाल) सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा कोणत्याही व्यक्तिवर अर्जदारांनी विश्वास ठेवू नये अणि आपली फसवणूक टाळावी, असा इशारावजा महत्वाचा इशारा जालना जात पडताळणी समितीकडून देण्यात येत आहे.

-*-*-*-*-*-*-

“पॉश” ची अंमलबजावणी न करणा-या राज्यातील 672 कार्यालयांना कारणे दाखवा नोटीसा

 


     जालना,दि.13 (जिमाका) : पॉश ॲक्ट 2013 मधील तरतुदी व सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या  आदेशानुसार पूर्तता केली नसल्यामुळे राज्यातील शासकीय व खाजगी कार्यालये, संस्था, कंपन्या, त्यांच्या शाखांची राज्याच्या महिला व बाल विकास विभागामार्फत 4,000 पेक्षा जास्त तपासणी अधिका-यांकडुन जुन 2026 पासून तपासणी सुरु केली आहे. सदयस्थितीत राज्यातील 3,579 शासकीय व 3,296 खाजगी कंपन्या /कार्यालयांची अशा एकुण 6,875 तपासण्या करण्यात आली असुन 294 शासकीय व 378 खाजगी कार्यालयांना पूर्तता न केल्याबददल जिल्हा स्तरावरुन राज्यात एकुण 672 कारणे दाखवा नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. नोटीसा दिलेल्या कार्यालयांनी विहीत वेळेत पूर्तता न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार रु 50 हजारा पर्यंत दंड आकारण्याची कारवाई संबंधीत  जिल्हा अधिकारी पॉश ॲक्ट 2013 व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहेत.

       जालना जिल्हयातील 547 शासकीय व 418 खाजगी कंपन्या/कार्यालयांची तपासणी करण्यात आली असुन 110 शासकीय व 153 खाजगी कार्यालयांना पूर्तता न केल्याबददल जिल्हा स्तरावरुन कारणे दाखवा नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालये, संस्था, कंपन्या, त्यांच्या शाखांनी Posh Act-2013 मधील तरतुदी व मा. सर्वोच्चा न्यायालय, नवी दिल्ली यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यालयाची केंद्र शासनाच्या SHE BOX PORTAL वर नोंद, अंतर्गत समितीची स्थापना व नोंद, समितीचे प्रशिक्षण, कर्मचा-यांचे प्रशिक्षण, वार्षिक अहवाल, इ. वरील पोर्टल अदययावत करणे बंधनकारक आहे. तपासणीवेळी पूर्तता केली नसल्याचे आढळून आल्यास संबंधित कार्यालये/संस्था/ कंपन्या यांचेवर अधिनियमातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल. असे कळविण्यात आले आहे.

                                                      -*-*-*-*-*-

केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेकडे पंतप्रधान शिष्यावृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 


            जालना,दि.13 (जिमाका) :  जालना जिल्हयातील माजी सैनिक/सैनिक विधवा/अवलंबित यांना कळविण्यात येते की, शैक्षणीक वर्ष 2026-27 या शैक्षणीक वर्षासाठी पंतप्रधान शिष्यावृत्ती मिळणेसाठीची प्रकरणे ही www.ksb.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे सादर करणेची कार्यवाही सुरु झालेली आहे. इयत्ता 12 वी, किंवा पदवीका (Diploma) मध्ये 60% टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मार्कानी उत्तीर्ण झालेल्या व प्रथम किंवा द्वितीय वर्षासाठी व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी दि. 1 एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत प्रवेश घेतलेल्या (कोर्सेची यादी online पहावी )

            Online भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी व उर्वरित  कागदपत्रांची छांयाकीत प्रत काढुन जिल्हा  सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावी. सदर Online फॉर्म भरण्याची  कार्यवाही सुरु असुन  शेवटची तारीख 31 डिसेंबर 2026 अशी आहे. सुधारित जोडपत्र 1,2 व 3 (2026-2027) आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची सविस्तर माहिती के.एस.बी. च्या संकेतस्थळावर (www.ksb.gov.in) उपलब्द आहे किंवा अधिक माहितीस्तव या कार्यालयात संपर्क करावा. तरी पात्र व इच्छुक माजी सैनकिांच्या पाल्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

जालना,दि.13 (जिमाका) : सन 2026-27  करीता राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शासनस्तरावरुन प्राप्त झाले असून पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज दि. 12 ऑगस्ट,2026 रोजी पासून उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्हयातील व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रम करीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर भेट देऊन परिपूर्ण अर्ज सादर करावे व त्याची एक प्रत इतर मागास बहुजन कल्याण, जालना या कार्यालयात सादर करावी असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-