जालना, दि.29 (जिमाका) : ऊसतोड कामगार आणि त्यांच्या
कुटुंबीयांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी
समन्वयाने काम करण्याची गरज असून, कामगारांच्या सुविधेसाठी तातडीने नवीन
कार्यपद्धती (एसओपी) तयार करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण
महामंडळाच्या माध्यमातून ओळखपत्रांचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संचलित
ऊसतोड कामगार प्रकल्पांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय
‘स्थलांतर पूर्व नियोजन’ समन्वय बैठकीत श्रीमती मित्तल अध्यक्षस्थानावरून बोलत
सहाय्यक समाज कल्याण सह आयुक्त स्नेहल मोदळे , जिल्हा महिला बालविकास अधिकारी आर.
व्ही. कड, शिक्षणाधिकारी, महिला व
बालविकास अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, ऊसतोड कामगार कृती समितीचे विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि
मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत ऊसतोड कामगारांचे स्थलांतर,
आरोग्य, शिक्षण, पोषण, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि सामाजिक सुरक्षा या विषयांवर
सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगारांचा डेटा ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात ते
स्थलांतरित होतात, त्या प्रशासनाशी सामायिक करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव
मांडण्यात आला. यामुळे स्थलांतरित कामगारांना तेथील शासकीय योजनांचा लाभ अधिक
प्रभावीपणे मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आरोग्य सेवांसाठी विशेष उपक्रम
ऊसतोड कामगारांच्या कामाच्या वेळा लक्षात घेऊन सकाळी लवकर अथवा सायंकाळी
आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिबिरांमध्ये मोफत आरोग्य
तपासणी व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच स्थलांतरित महिलांमधून
‘ आरोग्य सखी ’ ची निवड करून त्यांना प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देण्याची योजना
देखील बैठकीत मांडण्यात आले
शिक्षण व बाल हक्कांवर
भर
ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण
खंडित होऊ नये यासाठी मंजूर झालेल्या सर्व ‘ संत भगवान बाबा बालिका आश्रम शाळा ’
आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले.
याशिवाय ज्या मुलांकडे जन्मनोंदणी दाखले उपलब्ध नाहीत, त्यांच्यासाठी विशेष मोहीम
राबवून जन्मदाखले उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेल्पलाइनची प्रभावी
अंमलबजावणी
ऊसतोड कामगारांच्या समस्या
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध योजनांची
गावागावांत व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश समाज कल्याण विभागाला देण्यात आले.
बैठकीच्या प्रारंभी प्रकल्प संचालक
आप्पासाहेब उगले संपर्क अधिकारी भाऊसाहेब गुंजाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
तसेच जालना जिल्ह्यातील विविध योजना आणि प्रकल्प मांडणी करण्यात आली.
ऊसतोड कामगारांसमोरील समस्या, आव्हाने आणि संभाव्य उपाययोजनांवर सविस्तर
सादरीकरण केले.
उसतोड कामगार ना पाणी साठी स्थलांतर होते. या संदर्भात काम करून पाणी गावात
पाणी उपलब्ध करून गावात स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन 15 गावात
करण्यात आले आहे.
यावेळी प्रकल्प व्यवस्थापक ओकार उगले प्रकल्प समन्वयक आश्वजित जाधव अनुप
मोरे शिवाजी तायडे बिस्मीला राहुल गाढवे जिल्हा समन्वयक एकनाथ राउत राजेश
वाघमारे आदींनी ऊसतोड कामगारांच्या विविध समस्या प्रशासनासमोर मांडल्या. प्रशासन
आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे काम करून ऊसतोड कामगारांचे प्रश्न
प्राधान्याने सोडवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीच्या शेवटी केले.
-*-*-*-*-*-*-

.jpeg)

No comments:
Post a Comment