जालना,
दि.24 (जिमाका): जिल्ह्यात दि.17 जुन, 2026 ते दि. 26 जुन,2026 या कालावधीत
मोहरम सण साजरा होणार आहे. दि. 26 जुन,2026 रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती
(तिथीप्रमाणे) व छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे.तसेच दि. 29
जुन,2026 रोजी वटपोर्णिमा इत्यादी सण, जयंती, उत्सव साजरे होणार आहेत. या सण,
उत्सव, जयंतीच्या अनुषंगाने जिल्ह्यात व शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित
होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरीक एकत्र येत असतात.
तसेच मराठा
आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव,धनगर समाज तसेच बंजारा समाज एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करावा
यासाठी विविध प्रकारचे आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनुचित
प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारात येत
नाही.
तसेच महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात
एकमेकांविरुध्द गटबाजी व आरोप प्रत्यारोप विविध कारणांवरुन सुरु आहे. तसेच
शेतक-यांचे विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे,
निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची
आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता
येत नाही.
त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना
प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार
पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा
त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर
शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा
स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे
किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही.
व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने
भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे
प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा
नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा
कोणतीही वस्तु बाळगणार नाही.
तसेच अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना
प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका,
मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कामावरील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी यांना
लागु होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा
आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना,
अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या
परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा
यांना लागु राहणार नाही.
हा आदेश संपुर्ण
जिल्ह्यासाठी दि.24 जुन,2026 रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते दि. 7 जुलै,202 रोजीचे रात्री
12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment