Monday, 22 September 2025

जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी जालना शहरातील बाधीत भागाची केली पाहणी

 





जालना,दि.22(जिमाका): जालना शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे जिल्हाधिकारी श्रीमती आाशिमा मित्तल यांनी आज प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी जालना शहरातील बसस्थानक परिसर, कोठारी नगर, भाग्यनगर, भोईपुरा यासह अन्य भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. तसेच झालेल्या वित्त व जिवित हानीबद्दल तात्काळ पंचनामे करण्याचे संबंधीतांना आदेश दिले. यावेळी महानगर पालिका आयुक्त संतोष खांडेकर आदींची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment