Tuesday, 29 July 2025

आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींना आवाहन


 

 जालना दि. 29 (जिमाका) :- आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि. 2 जानेवारी 2018 पूर्वी हयात नसल्यास त्यांच्या पक्षात हयात जोडीदार पती, पत्नी केवळ अशा व्यक्तीनी अनुज्ञेय असलेले मानधन मिळण्याकरीता दि. 15 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासन पुरक  पत्रासोबतच्या परिशिष्ट "ब" मधील  शपथपत्र अर्जासोबत जोडून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे दि.25 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले आहे.

            शासन पुरक पत्रासोबतच्या परिशिष्ट "अ" मधील अ.क्र. 12 मध्ये नमूद केल्याप्रमाणे  डी. आय. आर (आणीबाणी) खाली राजनैतिक अथवा सामाजिक कारणासाठी अटक झालेल्या  संबधितांनी  जिल्हा पोलीस अधिक्षक, कारागृह अधिक्षक यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावेत.  अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक हा शासन निर्णय निर्गमीत झाल्याच्या दिनांकापासून 90 दिवसापर्यंत राहील. कोणत्याही परिस्थितीत दि.25 सप्टेंबर 2025 नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. याची आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि.2 जानेवारी 2018 पूर्वी हयात नसल्यास त्याच्या पश्चात हयात जोडीदार पती, पत्नी अशा व्यक्तींनी नोंद घ्यावी. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

                                                         दि. 29 जुलै, 2025

No comments:

Post a Comment