अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासनात गतिमानता व
लोकाभिमुखता
आणण्यासाठी अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा
-
जिल्हाधिकारी आशिमा
मित्तल
जालना,
दि.8 (जिमाका) :- राजीव गांधी प्रशासकीय
गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यालयांना व कर्मचाऱ्यांच्या
कामाची नोंद त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये घेतली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व
शासकीय कार्यालये, संस्था आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासनात गतिमानता व
लोकाभिमुखता आणण्यासाठी या अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
आशिमा मित्तल यांनी केले आहे.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेविषयी
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार दि.8 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता बैठक
घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह संबंधित यंत्रणेचे
अधिकारी उपस्थित होते.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा या अभियानाचा
कृती कालावधी प्रतिवर्षी दि.20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर असा असतो. योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी
दि.16 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. या योजनेचे अर्ज
स्विकारण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा पोर्टल
विकसीत करण्यात आले असून या संकेतस्थळाची लिंक pragatiabhiyan.maharashtra.gov.in
अशी आहे.स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची मुदत दि.16 ते 31 ऑक्टोबर 2025 अशी
असून वेळापत्रक शासन निर्णयातील परिशिष्ट क मध्ये दर्शविण्यात आले आहे. प्रस्ताव
तपासणीसाठी तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य अशा चार स्तरावर निवड समित्या
असतील. तालुकास्तरील प्रस्ताव जिल्हा समितीकडे, जिल्हास्तरावरील प्रस्ताव विभागीय
समितीकडे आ णि विभागीय स्तरावरील प्रस्ताव राज्य समितीकडे पाठविले जातील. कार्यालयीन व्यवस्थापन, सेवांची गुणवत्ता,
लोकाभिमुखता, ई-गव्हर्नस,संसाधनाचा प्रभावी वापर, तंटा व तक्रार मुक्त कार्यालय आणि
नाविण्यपूर्ण संकल्पना, उपक्रम अशा सात प्रमुख कार्यक्षेत्रावर ही स्पर्धा आधारीत
असणार आहे. तरी शासकीय संस्था, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय सुधारणाबाबत आपले
प्रस्ताव शासन निर्णयात नमुदप्रमाणे कार्यवाही करुन पाठवावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी
आशिमा मित्तल यांनी दिले आहेत.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment