जालना,
दि.26(जिमाका): जालना
जिल्ह्यातील युवकांच्या उद्योग विषयक कल्पनेनुसार आपला स्वतंत्र उद्योग सुरु करुन उद्योजक
होण्यासाठी मॅजिक इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून सुवर्णसंधी निर्माण झाली असल्याचे
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी
सांगितले.
येथील हुतात्मा जनार्दनमामा नागापुरकर शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात सुरु करण्यात आलेल्या मॅजिक इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटन
प्रसंगी श्री. लोढा हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक
श्री. अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, कौशल्य विकास विभागाच्या विभागीय
उपआयुक्त विद्या शितोळे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर, व्यवसाय
शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक पुरूषोत्तम देवतळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व
प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर आणि शासकीय आयटीआयचे प्राचार्य प्रविणकुमार उखळीकर, मॅजिक
संचालक मंडळाचे आशिष गर्दे, रितेश मिश्रा, नितीन काबरा, सुनील रायठ्ठा, प्रसाद कोकिळ,
केदार देशपांडे, प्रशांत देशपांडे, मिलिंद कांक, सुरेश तोडकर तसेच मॅजिकची यंग टीमचे
यशराज पिट्टी आणि अनुज बन्सल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. लोढा पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी
आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात उतरवून मॅजिक इन्क्युबेशन सेंटरच्या सहकार्याने
कौशल्याधारित उद्योग सुरू करून “आयडीया ते इन्कम टॅक्स धारक”हा प्रवास साध्य करावा. आपल्या
नाविन्यपूर्ण कल्पना उद्योगामध्ये रूपांतरित करून त्या माध्यमातून स्वतःचे उत्पन्न
वाढविणे व रोजगार निर्मिती करणे एवढ्यावरच न थांबता. त्यांनी आपले उत्पन्न वाढवून आयकरधारक
होण्याची संधी या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. आई-वडिलांच्या
अपूर्ण राहिलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी युवक-युवतींनी नवकल्पना मांडून
यशस्वी उद्योजक व व्यवसायिक बनावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमास उपस्थित उमेदवारांशी
संवाद साधून, आयटीआयमध्ये कोणते अभ्यासक्रम अपेक्षित आहेत याबाबत त्यांनी प्रत्यक्ष
विचारणा केली. यावेळी उमेदवारांनी सुचविलेल्या ड्रोन ऑपरेटर, सोलार टेक्नीशियन, इलेक्ट्रिक
व्हेइकल टेक्नीशियन, ब्युटी थेरपिस्ट आदी अभ्यासक्रम दि. 08 ऑक्टोबर, 2025 पर्यंत हमखास
रोजगार देणारे प्रशिक्षण म्हणून सुरू करण्याचे निर्देश व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
विभागास त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल म्हणाल्या
की, जिल्ह्यातील युवकांना मॅजिक सेंटरच्या माध्यमातून आपला स्वत:चा स्टार्टअप सुरु
करण्याची संधी निर्माण झाली आहे. अशी संधी
देणारा हा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. या मॅजिक सेंटरमुळे भविष्यात खुप चांगले
परिणाम आपणांस पाहण्यास मिळणार आहे. उद्योग उभारण्यासाठी लागणारे डिझाईन आणि भांडवल
यासाठीचे मार्गदर्शन व मदन या सेंटरद्वारे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत-जास्त
नवसंकल्पनाधारकांनी मॅजिक इन्क्युबेशन सेंटरमध्ये आपली नोंदणी करून, यशस्वी उद्योजक
बनावे. तसेच ग्रामीण भागातील नवसंकल्पनाधारक युवक-युवतींसाठी तालुकास्तरावर मॅजिकप्रमाणे
व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौशल्य विकास विभागाचे
कौशल्य विकास अधिकारी भुजंग रिठे, आत्माराम दळवी, डॉ. अमोल परिहार, अमोल बोरकर, प्रदीप
डोळे, दिपक पालवे, अमर तुपे तसेच मॅजिकचे अधिकारी राघवेंद्र कुलकर्णी, शशीकांत तिवारी,
प्रिती कामठे, कृष्णा टेकाळे, आयेशा मन्सुरी, मिरा चितांमणी, गौरव पटेल यांनी सहकार्य
घेतले.
यावेळी कार्यक्रमास येथील जिल्ह्यातील उद्योजक,
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी-कर्मचारी
व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.