जालना,(जिमाका) दि.3: शेतकऱ्यांना पायाभूत सोयी सुविधा देवून त्यांचे
बळकटीकरण करण्याचे शासनाचे प्राधान्य आहे. जालना जिल्ह्यामध्ये, परिसरातील रेशीम उत्पादक
शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी, रेशीम कोशांची खरेदी व विक्री करण्यासाठी खुली बाजारपेठ
उभारली आहे. बाजारपेठेचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच ही बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी
खुली करण्यात येईल. त्यामुळे, या भागातील रेशीम उत्पादन व उत्पादकता वाढणार असल्याचे
प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या
अभिभाषणात केले.
-*-*-*-*-*-

No comments:
Post a Comment