जालना, दि. 26
(जिमाका) :- कृषी
विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरातील आझाद मैदानावर जालना जिल्हा कृषी महोत्सव दि.27 ते
31 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जालना जिल्हा कृषी महोत्सवात सहभागी व्हावे,
असे आवाहन आत्मा नियामक मंडळाचे
अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जालना डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे
बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन
देण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांचे माध्यमातून
शेतकऱ्यांना आपाआपसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन
दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दिंगत होऊ शकतो. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा
शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊन जागतिक पातळीवरील
स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील. याकरिता जालना जिल्ह्यात दि.27 मार्च 2025 ते 31मार्च 2025 या कालावधीत कृषी महोत्सव चे आयोजन कृषी विभाग , कृषी तंत्रज्ञान
व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे संयुक्त
विद्यमाने जालना शहरातील आझाद मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार, शेतकरी विपणन
साखळी सक्षमीकरण, समूह, गट संघटित करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता
बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल
मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, कृषी विषयक
परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणींद्वारे
शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता – खरेदीदार संमेलनाच्या
माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देणे या या योजनेचा प्रमुख
उद्देश ,
·
काय असणार आहे या प्रदर्शनात
कृषी
प्रदर्शन- कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन हा महत्वाचा घटक असून यामध्ये शासकीय
दालन, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा
समावेश आहे. जिल्हास्तरावर कृषी आणि पूरक व्यवसायाशी निगडित एकात्मिक शेती पद्धती
संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये कृषी संबंधित कृषी
तंत्रज्ञान विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, संबंधित विविध कृषी
महामंडळे यांचा सक्रिय सहभाग राहिल. शासकीय यंत्रणा बरोबरच खाजगी कंपन्या,
उद्योजक, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग घेण्यात येईल.
जिल्ह्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले
शेतकरी तसेच पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा प्रशस्तीपत्रासह यथोचित सन्मान करुन
स्मृतीचिन्ह वितरण करण्यात येतील.
जिल्हा
कृषी महोत्सवाअंतर्गत कृषी प्रदर्शन व धान्य महोत्सवात शासकीय दालनामध्ये 40
स्टॉल्स, कृषी निविष्ठा 30, कृषी तंत्रज्ञान व सिंचन 30, गृहोपयोगी वस्तू 40,
धान्य महोत्सव 20, खाद्यपदार्थ 20 अशा एकूण अंदाजे 200 स्टॉलचा समोवश असेल. शासकीय
दालनामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती व उपक्रम यांचे स्टॅाल्स असतील. या
कार्यक्रमाकरिता पुढील शासकीय विभाग, कार्यालये, यंत्रणांच्या दालनांना प्राधान्य
देण्यात येणार आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment