जालना,दि.14(जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या महिला
व बालविकास विभागाने ,समस्याग्रस्त व पिडित
महिलांना त्यांचे प्रश्न
मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या
हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा
या हेतुने जिल्हा तसेच
तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही
दिन पाळण्याचे ठरविले आहे.
त्यानुसार
तालुकास्तरावर प्रत्येक तहसील कार्यालयात
महिन्याचा चौथा सोमवार आणि
जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी
कार्यालयात प्रत्येक महिन्याचा तीसरा
सोमवार महिला लोकशाही दिन
म्हणुन पाळण्यात येत आहे. सदर
महिला लोकशाही दिनाचे आयोजन
जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या
तिसऱ्या सोमवारी सकाळी 11.00 ते 12.00 या वेळेत
करण्यात येते . दि. 17 फेब्रुवारी
2025 रोजी 11.00 ते 12.00 या वेळेत
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन
होणार आहे. सदर महिला
लोकशाही दिनात तक्रार दाखल
करु इच्छिणाऱ्या महिलांनी
आपली तक्रार दोन प्रतीत
जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी कार्यालय, जालना येथे
सादर करावी.
अर्ज स्विकृतीचे निकष खालील प्रमाणे आहेत.
तक्रार, निवेदन
वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार, निवेदन दोन
प्रतीत सादर करावे, सदरील प्रकरण
न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित
नमुन्यात व आवश्यक त्या
कागदपत्राच्या प्रतीसह सादर करावा, सेवा
व आस्थापना विषयक बाबी विचारात
घेतल्या जाणार नाहीत. निवडणुक
आचार संहिता काळात त्या-त्या
स्तरावर, विधिमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तरावर
महिला लोकशाही दिन पाळण्यात
येत नाही.
शासन
निर्णयाप्रमाणे महिलांनी प्रथम संबंधित
तहसीलदार यांचेकडे महिला लोकशाही
दिनाच्या पंधरा दिवस आधी
दोन प्रतीत तक्रार दाखल
करावी, तालुका महिला लोकशाही दिनात
एक महिन्याच्या आत कार्यवाही न झाल्यास संबंधित
महिला जिल्हास्तरीय महिला
लोकशाही दिनात तक्रार दाखल
करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही
दिनात अर्जदार महिलेस अंतिम
उत्तर शक्य तितक्या लवकर
जास्तीत-जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे
बंधन संबंधित अध्यक्ष तथा
तहसिलदार व सदस्य सचिव
तथा बालविकास प्रकल्प अधिकारी
यांची राहील. तरी महिलांनी
तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी
तालुकास्तरावर तहसील कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय
यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा
जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे जिल्हा माहिला व बाल
विकास अधिकारी यांनी कळविले
आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment