जालना, दि.17 (जिमाका) :- इयत्ता अकरावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाहभत्ता व इतर आवश्यक सुविधावर खर्च करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे. तरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी https://hmas.
योजनेतंर्गत जालना महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी तसेच बारावी नंतर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शासन निर्णयानुसार देय असलेली रक्कम मंजुर केली जाते. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रूपये २ लाख ५० हजार रुपयांच्या आत असणे अपेक्षित आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यास दहावी, अकरावी व बारावी या अभ्यासक्रमात किमान ५० टक्के गुण असणे अपेक्षीत आहे. तसेच दिव्यांगासाठी ४० टक्के गुण असणे अपेक्षीत आहे. विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५ टक्के अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यानी यापुर्वी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टलद्ववारे अर्ज सादर केले आहेत अशा विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नाही. असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment