Saturday, 6 August 2016

जालना जिल्ह्यात सरासरी 9.22 मि.मी. पावसाची नोंद

जालना - जिल्ह्यात 6 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 9.22 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
       जालना- 5.13 (463.76), बदनापूर-13.20 (475), भोकरदन-7.88(362.51),जाफ्राबाद-10.00  (331.20), परतूर-14.60 (518.80), मंठा- 0.50 (470.15), अंबड- 14.29 (451.71) घनसावंगी-8.14 (407.57) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 426.89  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 63.36 टक्के एवढी आहे.
***-***    

जालना जिल्ह्यात सरासरी 9.22 मि.मी. पावसाची नोंद

जालना - जिल्ह्यात 6 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 9.22 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
       जालना- 5.13 (463.76), बदनापूर-13.20 (475), भोकरदन-7.88(362.51),जाफ्राबाद-10.00  (331.20), परतूर-14.60 (518.80), मंठा- 0.50 (470.15), अंबड- 14.29 (451.71) घनसावंगी-8.14 (407.57) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 426.89  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 63.36 टक्के एवढी आहे.
***-***    

Friday, 5 August 2016

फिरत्या मृदचाचणी प्रयोगशाळेचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

जालना - राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमिन आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत         कै. सुमनताई बहुउदेशीय सेवाभावी संस्था, सातोना बु. ता.परतूर जि.जालना या संस्थेची जय किसान फिरती माती पाणी परिक्षण प्रयोगशाळा या फिरत्या मृद चाचणी प्रयोगशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, मोतीबाग,  जालना येथे फित कापून करण्यात आले.  
            यावेळी औरंगाबादचे  विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी पी.डी. लोणारे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष आळसे, कृषी उपसंचालक बी.बी.धालगडे, मृदचाचणी अधिकारी एस.जी. टिक्कस, औरंगाबादचे कृषी अधिकारी बी.व्ही. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी फिरत्या मृद चाचणी प्रयोगशाळेची संपूर्ण पहाणी करुन पाणी परिक्षण कशा प्रकारे करण्यात येते याची तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.  या फिरत्या प्रयोगशाळेसह कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शेतजमीनीच्या माती परिक्षणाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्याच्या सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना देत  शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनीची आरोग्य पत्रिका मिळाल्यामुळे पीक लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचेही           श्री जोंधळे यांनी यावेळी सांगितले.
            याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी जिल्ह्यात एक शासकीय मृद चाचणी प्रयोगशाळा व कृषि विज्ञान केंद्राकडे मृद चाचणी प्रयोगशाळा उपलब्ध असून मृद आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत जिरायत क्षेत्रातून 10 हेक्टर क्षेत्रालय एक व बागायत क्षेत्रातून 2.5 हेक्टर क्षेत्राला एक अशा प्रकारे मृत नमुने तपासणीकरिता काढण्यात आलेले असून त्याद्वारे त्या गटातील शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
***-*** 




Tuesday, 2 August 2016

जालना जिल्ह्यात सरासरी 14.70 मि.मी. पावसाची नोंद

जालना - जिल्ह्यात 3 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 14.70 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
            जालना- 20.00 (458.13), बदनापूर-22.80 (461.40), भोकरदन-15.63(346.13),जाफ्राबाद-8.20  (318.80), परतूर-10.40 (502.60), मंठा- 15.00 (467.50), अंबड- 16.71 (436.28) घनसावंगी-8.86 (399.43) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून    1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 424.73  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 61.71 टक्के एवढी आहे.

***-***  

सर्वसामान्यांच्या अडी-अडचणी समजुन घेऊन तत्परनेते सोडवाव्यात – जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

जालना – महसुल विभाग हा प्रशसनाचा कणा आहे.  नागरीसेवेचा दर्जा महसुल विभागासच प्राप्त झालेला असून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या तत्परतेने सोडविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महसुल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  व्यासपीठावर सेवानिवृत्त अपरआयुक्त श्री लवांदे, ॲड राम शेलकर, उप विभागीय अधिकारी सर्वश्री चिंचकर, श्रीमंत हारकर, अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, लेखाधिकारी श्री देशपांडे आदींची उपस्थिती होती.
            यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत सर्व कामे करण्याचा मान महसुल विभागास प्राप्त झाला आहे.  सर्वसामान्य तसेच गोरगरीब जनतेची कामे अधिकाऱ्यांनी समजून घेऊन ती तत्परनेते सोडवावीत.  शासकीय नोकरीमध्ये पगार घेऊन सर्वसामान्यांची सेवा करण्याची संधी आपणास प्राप्त झालेली आहे.  या संधीचे प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने व पारदर्शकपणे काम करुन सर्वांना समान न्याय, त्यांचा असलेला हक्क मिळवून देऊन जनतेचा दुवा घ्यावा. 
            जालना जिल्हयाने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमामध्ये भरीव काम केले असून  येणाऱ्या काळातसुद्धा सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संघटीतपणे काम करावे. जेणेकरुन जालना जिल्हा    कोणत्याही विकासाच्या बाबतीत मागे राहणार नाही, असा विश्वासही श्री जोंधळे यांनी व्यक्त केला.
            यावेळी सेवानिवृत्त अपर आयुक्त श्री लवांदे म्हणाले की, सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला त्यांचे हक्क व समान न्याय मिळवून देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्पर असले पाहिजे.  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायद्याचं परिपूर्ण असं ज्ञान संपादन करुन त्यांच्या कामात सचोटी, पारदर्शकता व जबाबदारीने व विनाआक्षेप काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            यावेळी ॲड राम शेलकर यांनी जमीन कायदा याबाबत तर लेखाधिकारी श्री देशपांडे यांनी आहरण व संवितरण अधिकारीयांची जबाबदारी व कर्तव्ये या विषयावर उपस्थितांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. तहसिलदार महेश सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती योगिताखटावकर यांनी केले तर आभार उप विभागीय अधिकारी अरविंद लोखंडे यांनी मानले.
            या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये उप विभागीय अधिकारी सर्वश्री अरविंद लोखंडे, श्रीमंत हारकर, तहसिलदार एल.डी. सोनवणे, महेश सावंत, लघुलेखक एस.बी. सुर्यवंशी, नायब तहसिलदार पी.यु. कुलकर्णी, संदीप ढाकणे, ए.डी. पुरी, अव्वल कारकून बी.एस.गीर, मंडळ अधिकारी आर.ई. घुले, सुनिल कारमपुरीकर, तलाठी सय्यद युनुस, लिपीक श्रीमती ज्योती वाघ, शिपाई श्री खंडागळे, समाधान गायकवाड आदींचा समावेश होता.
            कार्यक्रमास महसुल विभागातील अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

******* 

Monday, 1 August 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन संपन्न जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

जालना-  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन पाळण्यात येतो.  त्याअनुंषगाने जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिन संपन्न झाला.  या  लोकशाही दिनामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभाग एक व जिल्हा पोलीस विभागाची एक असे एकूण दोन  तक्रार अर्ज प्राप्त झाले. 
            यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून विविध विषयावर आढावा घेतांना जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की,  1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात महसूल सप्ताह राबविण्यात येणार असून या सप्ताहामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.  शासनाच्या विविध योजनांचा महिलांना लाभ देऊन हा सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            आपले सरकार या शासनाच्या वेबपोर्टलवर सर्वसामान्यांच्या तक्रारी येत असतात.  या प्राप्त तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व वेळेच्या आत नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
            2 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्यात लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन होण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देण्याच्या सुचना करत दरवर्षी जिल्ह्याला ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात येते.  प्रत्येक शासकीय विभागाला देण्यात आलेले उद्दिष्टही 100 टक्के पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            जिल्ह्यातील शासकीय इमारतीमध्ये अनेक असुविधा असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत.  यामध्ये पिण्याचे पाणी, शौचालय, विद्युत यासह शासकीय निवासस्थानामध्ये अनेक गैरसोयी असून याबाबत आवश्यक ठिकाणी डागडुजीसह आवश्यक ती सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. तसेच शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून अनेक मोक्याच्या ठिकाणी रत्यावर खड्डे पडलेले आहेत.  रस्ते दुरस्तीसह शहरातील विद्युत दिव्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचनाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी केल्या. 
            या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, तहसिलदार अनिता भालेराव, नायब तहसिलदार डीन. एन. पोटे  यांच्यासह सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*******                                 

जालना जिल्ह्यात सरासरी 4.34 मि.मी. पावसाची नोंद

जालना - जिल्ह्यात 1 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 4.34 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
            जालना- 4.75 (434.88), बदनापूर-4.00 (436.40), भोकरदन-2.38(326.77),जाफ्राबाद-1.60  (314.20), परतूर-8.60 (489.00), मंठा- 11.00 (445.75), अंबड- निरंक (415) घनसावंगी-2.43 (389.14) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून  1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 406.89  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 59.11 टक्के एवढी आहे.

***-***