जालना,
दि.28 (जिमाका) : जिल्ह्यातील गटई कामगारांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे
आणि त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल पुरविण्याची
योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याकडून सन
2025-26 या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात येत
आहेत. इच्छूक लाभार्थ्यानी त्यांचे अर्ज सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयात
दिनांक 15 जून 2025 पर्यत सादर करावेत, असे आवाहन अनंत कदम, सहायक आयुक्त, समाज कल्याण,
जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment