Friday, 17 February 2023

क्षय रुग्‍णांना पोषण आहार किट वाटपात महाराष्ट्र राज्य देशात तर जालना जिल्हा राज्यात सर्वप्रथम

 





जालना, दि. 17 (जिमाका) :- भारत सरकारने वर्ष 2025 पर्यंत  क्षयरोग    मुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुषंगाने प्रधानमंत्री टिबीमुक्त भारत अभियानांतर्गत ‘कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेशंटस’ हा उपक्रम संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत उपचाराखाली असलेल्या व संमती दिलेल्या सर्व क्षयरुग्णांना सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था व समाजातील दानशूर व्यक्ती यांनी निक्क्षय मित्र म्हणून नोंद करुन त्यांच्यामार्फत क्षयरुग्णांना अतिरिक्त पोषण आहार किट देण्याकरीता केंद्रशासनामार्फत प्रधानमंत्री टिबीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.

त्यानुषंगाने जालना जिल्ह्यातील सीएसआर अंतर्गत येणाऱ्या स्टील आसोसीएशन, विक्रम टी प्रोसेसर  यांनी डिसेंबर-2022 व जानेवारी-2023 मध्ये जालना जिल्ह्यात उपचारावर असणाऱ्या सर्व 2 हजार 295 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले आहे. क्षय रुग्णांना पोषण आहार किट वाटपामध्ये महाराष्ट्र राज्य देशात तर जालना जिल्हा राज्यामध्ये सर्वप्रथम आहे.

            प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियानातंर्गत उपचारावर असणाऱ्या सर्व क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सिएसआर अंतर्गत येणाऱ्या उद्योजकांना उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरीता आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उद्योजकांनी जालना जिल्ह्यात उपचारावर असणाऱ्या क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्यास संमती दर्शवली आणि पुढील तीन वर्ष क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्याचा त्यांचा मानस आहे. प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियानातंर्गत सहभाग नोंदविल्या बद्दल जालना जिल्हयातील विक्रम टी प्रोसेसर, कालीका स्टील, गजलक्ष्मी स्टील, गजकेशरी स्टील, ओमसाईराम स्टील, भाग्यलक्ष्मी रोलींग मिल, एस.आर.जी. पिती स्टील, गिताई स्टील, राठी स्टील, मेटारोल स्टील, महिको सिड्स व कलश सिड्स  इत्यादी उद्योजकांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment