Wednesday, 27 July 2016

माध्यमिक शाळांच्या घेण्यात येणा-या परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू

जालना -  जिल्हयात जुलै व ऑगस्ट 2016 मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शांलात प्रमाणपत्र परिक्षा 18 जुलै ते 3 ऑगस्ट 2016 पर्यंत घेण्यात येणार असल्याने परीक्षाच्या कालावधीत परिक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार हाऊ नये या करिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांनी जालना जिल्हयात अधिसूचित केलेलेल्या संबंधित परिक्षा केंद्राच्या परिसरात 200 मीटरच्या परिसरात परिक्षा चालु असतांना काही पालक परिक्षा व परिक्षा न देणारे विद्यार्थी उपद्रव करु नये म्हणुन 144 कलम लागू केले आहे.
            या परिक्षा  केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. या परिक्षा केंद्राजवळच्या 200 मीटरच्या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी बुथ, फॅक्स,झेराक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत.तसेच परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची श्क्यता असल्यने अपर जिल्हादंडाधिकारी आर.टी.इतवारे यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन दि. 18 जुलै 2016 ते  3 ऑगस्ट 2016  या कालावधीत   परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.

No comments:

Post a Comment